शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतक-यांची कोंडी : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाविनाच होत आहे सोयाबीन खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:12 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या जाहीर लिलाव, आडतीतही हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान बाजार समितीच्या मार्केट यार्डात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची व्यापा-यांकडून खरेदी करण्यात आली आहे. शेतमालाला व्यापा-यांकडून हमीभाव देण्यात आला नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या जाहीर लिलाव, आडतीतही हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याचे समोर आले आहे. १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान बाजार समितीच्या मार्केट यार्डात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची व्यापा-यांकडून खरेदी करण्यात आली आहे. मात्र या शेतमालाला व्यापा-यांकडून हमीभाव देण्यात आला नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात असणा-या किरकोळ खरेदीदारांकडून शेतक-यांचा शेतीमाल कवडीमोल दराने खरेदी केला जात होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर पर्याय म्हणून जाहीर लिलावाच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरु केली. परंतु, या लिलावातही शेतक-यांना शासनाने ठरवून दिलेला ३ हजार ५० रुपयांचा हमीभाव व्यापा-यांकडून मिळाला नाही. त्यामुळे मार्केट यार्डात जाहीर लिलावावेळेस व्यापारी व शेतक-यांमध्ये अनेक वेळा खटके उडून जाहीर लिलाव बंद पाडण्यात आले. त्यानंतर व्यापारी व कृउबा समितीने यावर उपाय म्हणून जाहीर लिलाव बंद करुन आडतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, येथेही शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापा-यांनी जाहीर लिलाव व आडतीच्या माध्यमातून आॅक्टोबर महिन्यात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. परंतु, शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालामध्ये आद्रतेचे प्रमाण अधिक असणे, मालाला डाग आदी कारणाखाली प्रति क्विंटल केवळ २२०० ते २६०० रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या ३ हजार ५० रुपयांंच्या हमीभावाकडे व्यापा-यांनी चक्क पाठ फिरवली. यामध्ये शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन या पिकावर जेवढा खर्च केला होता, तेवढाही उत्पादनातून न निघाल्याने पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करताना व्यापा-यांकडून होणारी अडवणूक पाहून जिल्हा प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाने शेतक-यांचा माल हमीभाव दराने खरेदी करताना नमूद केलेल्या निकषामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वैतागला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी केलेली उसणवारी फेडण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आपला माल खाजगी व्यापा-यांकडे विक्री करीत आहे. मात्र व्यापारीही या संधीचा फायदा घेत वाटेल त्या भावात सोयाबीनची खरेदी करीत आहेत. 

७५३ शेतक-यांनीच केली नोंदणीशासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाच्या अटी व नियमानुसार ज्या शेतक-यांना आपला शेतमाल हमीभाव केंद्रावर विक्री करावयाचा आहे. त्या शेतक-यांनी आधी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांची जुळवाजुळव शेतक-यांना करावी लागत आहे. जिंतूर हमीभाव खरेदी केंद्रावर १९० शेतक-यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यानंतर मानवत २६०, परभणी १००, गंगाखेड १३, सेलू १८०, पूर्णा १० अशा एकूण ७५३ शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली आहे. 

उत्पादनातही कमालीची घटयावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसावर जिल्ह्यातील शेतक-यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने नियोजन केलेल्या ५ लाख १६ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल २ लाख १७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. परंतु, मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जाग्यावरच करपली. तर काही भागात शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर ही पिके जगली. मात्र या पिकांच्या उता-यात यावर्षी चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. पेरणी करताना शेतक-यांनी केलेला खर्चही सोयाबीनच्या उत्पादनातून निघेनासा झाला आहे. त्यामुळे गतवर्षी सारखे याहीवर्षी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी