शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

शेतक-यांची कोंडी : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाविनाच होत आहे सोयाबीन खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:12 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या जाहीर लिलाव, आडतीतही हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान बाजार समितीच्या मार्केट यार्डात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची व्यापा-यांकडून खरेदी करण्यात आली आहे. शेतमालाला व्यापा-यांकडून हमीभाव देण्यात आला नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या जाहीर लिलाव, आडतीतही हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याचे समोर आले आहे. १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान बाजार समितीच्या मार्केट यार्डात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची व्यापा-यांकडून खरेदी करण्यात आली आहे. मात्र या शेतमालाला व्यापा-यांकडून हमीभाव देण्यात आला नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात असणा-या किरकोळ खरेदीदारांकडून शेतक-यांचा शेतीमाल कवडीमोल दराने खरेदी केला जात होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर पर्याय म्हणून जाहीर लिलावाच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरु केली. परंतु, या लिलावातही शेतक-यांना शासनाने ठरवून दिलेला ३ हजार ५० रुपयांचा हमीभाव व्यापा-यांकडून मिळाला नाही. त्यामुळे मार्केट यार्डात जाहीर लिलावावेळेस व्यापारी व शेतक-यांमध्ये अनेक वेळा खटके उडून जाहीर लिलाव बंद पाडण्यात आले. त्यानंतर व्यापारी व कृउबा समितीने यावर उपाय म्हणून जाहीर लिलाव बंद करुन आडतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, येथेही शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापा-यांनी जाहीर लिलाव व आडतीच्या माध्यमातून आॅक्टोबर महिन्यात १० हजार १२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. परंतु, शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालामध्ये आद्रतेचे प्रमाण अधिक असणे, मालाला डाग आदी कारणाखाली प्रति क्विंटल केवळ २२०० ते २६०० रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या ३ हजार ५० रुपयांंच्या हमीभावाकडे व्यापा-यांनी चक्क पाठ फिरवली. यामध्ये शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन या पिकावर जेवढा खर्च केला होता, तेवढाही उत्पादनातून न निघाल्याने पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करताना व्यापा-यांकडून होणारी अडवणूक पाहून जिल्हा प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाने शेतक-यांचा माल हमीभाव दराने खरेदी करताना नमूद केलेल्या निकषामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वैतागला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी केलेली उसणवारी फेडण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आपला माल खाजगी व्यापा-यांकडे विक्री करीत आहे. मात्र व्यापारीही या संधीचा फायदा घेत वाटेल त्या भावात सोयाबीनची खरेदी करीत आहेत. 

७५३ शेतक-यांनीच केली नोंदणीशासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाच्या अटी व नियमानुसार ज्या शेतक-यांना आपला शेतमाल हमीभाव केंद्रावर विक्री करावयाचा आहे. त्या शेतक-यांनी आधी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांची जुळवाजुळव शेतक-यांना करावी लागत आहे. जिंतूर हमीभाव खरेदी केंद्रावर १९० शेतक-यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यानंतर मानवत २६०, परभणी १००, गंगाखेड १३, सेलू १८०, पूर्णा १० अशा एकूण ७५३ शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली आहे. 

उत्पादनातही कमालीची घटयावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसावर जिल्ह्यातील शेतक-यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने नियोजन केलेल्या ५ लाख १६ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल २ लाख १७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. परंतु, मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जाग्यावरच करपली. तर काही भागात शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर ही पिके जगली. मात्र या पिकांच्या उता-यात यावर्षी चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. पेरणी करताना शेतक-यांनी केलेला खर्चही सोयाबीनच्या उत्पादनातून निघेनासा झाला आहे. त्यामुळे गतवर्षी सारखे याहीवर्षी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी