शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:52 IST

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक

- प्रमोद साळवेगंगाखेड: तालुक्यातील राणीसावरगाव या छोट्याशा गावातून एक मोठी आणि प्रेरणादायी झेप घेत अवघ्या २७ व्या वर्षी डॉ. रोमा मुजमील तांबोळी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे गाव, तालुका आणि जिल्ह्यात अभिमानाची भावना ओसंडून वाहत आहे.

डॉ. रोमा यांनी आपले प्राथमिक शिक्षण ग्रामीण पार्श्वभूमीत घेतले. पुढे बी.ए.एम.एस. शिक्षण नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या जगात आपली क्षमता आजमावण्याचा निर्धार त्यांनी केला आणि नागपूर येथे UPSC स्पर्धा परीक्षेची कठोर तयारी सुरू केली. यापूर्वी त्या एम.डी. अभ्यासक्रमासाठी पात्र ठरल्या होत्या, पण त्यांचे लक्ष्य मोठे होते. देशसेवेच्या माध्यमातून जनतेचे आरोग्य जपणारे पद मिळवणे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करत नवी दिल्ली येथील केंद्रीय सरकारी आस्थापना विभागात वर्ग-१ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. बुधवारी दि.१३ रोजी सायंकाळी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात जडणघडण झालेली ही डॉक्टर आता देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आपली सेवा देणार आहे.

कुटुंबाचा संघर्ष आणि प्रेरणादायी यशडॉ. रोमा या मुजमील सरवर तांबोळी यांच्या कन्या आहेत. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय करतात. सहा मुलींना उच्च शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्यासाठी प्रत्येक संकटाशी सामना केला. आज त्या सहा मुलींमधील डॉ.सिफाना, डॉ.रोमा व डॉ.अर्शनाज या तीन मुली डॉक्टर, अंजुम ही बँक मॅनेजर, सुनेला ही केमिकल इंजिनीअर, धाकटी मुलगी सानिया ही बी.टेक. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मोठी मुलगी डॉ. शिफा तांबोळी एमबीबीएस, एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ असून उमरगा (जि. धाराशिव) येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

मुलींसाठी प्रेरणेचा दीपस्तंभगावाचे माजी सरपंच अल्ताफ सय्यद सांगतात की, "मुजमील तांबोळी यांनी मुलींना मुलांसारखेच नव्हे, तर त्याहूनही अधिक संधी दिल्या. त्यांच्या कष्टामुळे आज तांबोळी कुटुंबाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे." डॉ. रोमा तांबोळींचा हा प्रवास ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना एक नवा आत्मविश्वास देणारा आहे. मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कोणतेही स्वप्न गाठता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या यशामुळे राणीसावरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे आणि अनेक मुलींना नव्या उंचीची स्वप्ने पाहण्याची हिंमत मिळाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणFarmerशेतकरी