शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणी जिल्ह्यात भीजपावसाने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:45 AM

वीस दिवसानंतरच्या मोठ्या खंडानंतर १५ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले आहे.

परभणी : वीस दिवसानंतरच्या मोठ्या खंडानंतर १५ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

रात्रीतून जिल्ह्यात सरासरी २४.६८ मि.मी. पाऊस झाला आहे. पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. सोयाबिन, कापूस ही पिके करपून जात होती. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. त्यामुळे पावसाची नितांत आवश्यकता होती. दरम्यान, थोड्या उशिराने का होईना पण, १५ आॅगस्ट रोजी रात्री पावसाला प्रारंभ झाला. 

परभणी शहरात १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पाऊस सुरू झाला. अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर बरसला. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा भिज पाऊस आहे. गंगाखेड, सोनपेठ, मानवत, सेलू, पाथरी, जिंतूर आदी भागात प्रथमच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.बुधवारी रात्रभरातून जिल्ह्यात सरासरी २४.६८ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २५.८८ मि.मी., पालम तालुक्यात ९.६७, पूर्णा ३२.८०, गंगाखेड २५.५०, सोनपेठ २५.००, सेलू २१.८०, पाथरी २४.००, जिंतूर ३०.१७ आणि  मानवत तालुक्यात २७.३३ मि.मी. पाऊस झाला.

परभणी परिसरात ५९ मि.मी. पाऊसपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानेही १५ आॅगस्ट रोजी रात्री झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. परभणी व परिसरात ५९ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती