शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

एमपीएससीच्या संधीच्या मर्यादेनंतर परीक्षांच्या वेळापत्रकांचे पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

देवगावफाटा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित आहे; परंतु, घोषित केलेल्या वेळापत्रकांचे पालन काटेकोरपणे करावे, ...

देवगावफाटा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित आहे; परंतु, घोषित केलेल्या वेळापत्रकांचे पालन काटेकोरपणे करावे, अशी अपेक्षा ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आता परीक्षा देत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या धर्तीवर नियम लागू केला आहे. या अंतर्गत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळेस परीक्षा देता येणार असून इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना ९ वेळेस परीक्षा देता येणार आहे. अनुसूचित जाती-जमातीमधील उमेदवारांना कमाल मर्यादेचा नियम लागू नाही. शासनाच्या या निर्णयाचे परभणी जिल्ह्यात अनेक उमेदवारांनी स्वागत केले. तर अनेकांनी योग्य निर्णय नसल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसंदर्भात जाहीर केलेल्या वेळापत्रकाचेच काटेकोरपणे पालन करण्याची मागणी उमेदवारांनी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मर्यादित संधीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ६ तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ९ संधी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे वेळेच्या मर्यादेत अभ्यासासाठी अधिक परिश्रम घेतील व यशस्वी होतील. वर्षानुवर्षे या प्रक्रियेत अडकून न पडता इतर पर्यायांचा विचार करण्याची संधी त्यांना मिळेल.

वैष्णवी बालासाहेब घन, सेलू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संधीची मर्यादा घालून दिली. हा निर्णय योग्य असला तरी यूपीएससीप्रमाणे वर्षभरात ठरवून दिलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे पालन केले जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेसुद्धा वर्षभराच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी केली तर विद्यार्थ्यांना लाभ होईल.

गणेश थोरे, धनेगाव ता. सेलू

एमपीएससी परीक्षेसंदर्भातील निर्णय योग्य आहे; परंतु, यूपीएससीच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जीएस १ व जीएस २ या दोन पेपरच्या एकूण गुणांच्या कटऑफवर निकाल न लावता जीएस २ पेपरला केवळ पासची मर्यादा ठेवून जीएस १ पेपरवर पूर्व तयारीचा कटऑफ लावण्याचा निर्णय घेतला तर संधी मर्यादेचा निर्णय सार्थ ठरू शकतो. शिवाय आयोगाच्या तीन रिक्त जागा तातडीने भराव्यात.

अभिषेक काळे, रवळगाव, ता. सेलू

महाराष्ट्रात सध्या विविध पदांवरील असंख्य जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अगोदार त्या तातडीने भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करावी. आयोगाने ठरवून दिलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे संधी मर्यादेचा निर्णय चुकीचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा नुकसानदायक आहे.

अर्जुन साठे, ब्रह्मवाकडी, ता. सेलू