शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

एमपीएससीच्या संधीच्या मर्यादेनंतर परीक्षांच्या वेळापत्रकांचे पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

देवगावफाटा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित आहे; परंतु, घोषित केलेल्या वेळापत्रकांचे पालन काटेकोरपणे करावे, ...

देवगावफाटा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित आहे; परंतु, घोषित केलेल्या वेळापत्रकांचे पालन काटेकोरपणे करावे, अशी अपेक्षा ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आता परीक्षा देत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या धर्तीवर नियम लागू केला आहे. या अंतर्गत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळेस परीक्षा देता येणार असून इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना ९ वेळेस परीक्षा देता येणार आहे. अनुसूचित जाती-जमातीमधील उमेदवारांना कमाल मर्यादेचा नियम लागू नाही. शासनाच्या या निर्णयाचे परभणी जिल्ह्यात अनेक उमेदवारांनी स्वागत केले. तर अनेकांनी योग्य निर्णय नसल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसंदर्भात जाहीर केलेल्या वेळापत्रकाचेच काटेकोरपणे पालन करण्याची मागणी उमेदवारांनी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मर्यादित संधीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ६ तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ९ संधी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे वेळेच्या मर्यादेत अभ्यासासाठी अधिक परिश्रम घेतील व यशस्वी होतील. वर्षानुवर्षे या प्रक्रियेत अडकून न पडता इतर पर्यायांचा विचार करण्याची संधी त्यांना मिळेल.

वैष्णवी बालासाहेब घन, सेलू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संधीची मर्यादा घालून दिली. हा निर्णय योग्य असला तरी यूपीएससीप्रमाणे वर्षभरात ठरवून दिलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे पालन केले जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेसुद्धा वर्षभराच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी केली तर विद्यार्थ्यांना लाभ होईल.

गणेश थोरे, धनेगाव ता. सेलू

एमपीएससी परीक्षेसंदर्भातील निर्णय योग्य आहे; परंतु, यूपीएससीच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जीएस १ व जीएस २ या दोन पेपरच्या एकूण गुणांच्या कटऑफवर निकाल न लावता जीएस २ पेपरला केवळ पासची मर्यादा ठेवून जीएस १ पेपरवर पूर्व तयारीचा कटऑफ लावण्याचा निर्णय घेतला तर संधी मर्यादेचा निर्णय सार्थ ठरू शकतो. शिवाय आयोगाच्या तीन रिक्त जागा तातडीने भराव्यात.

अभिषेक काळे, रवळगाव, ता. सेलू

महाराष्ट्रात सध्या विविध पदांवरील असंख्य जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अगोदार त्या तातडीने भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करावी. आयोगाने ठरवून दिलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे संधी मर्यादेचा निर्णय चुकीचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा नुकसानदायक आहे.

अर्जुन साठे, ब्रह्मवाकडी, ता. सेलू