शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ७० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ ...

दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई वाढत असतानाच आता त्यात खाद्य तेलानेही उडी घेतली आहे. मागच्या वर्षभरात खाद्यतेल सरासरी ६० रुपयांनी वाढले आहे. जागतिक स्तरावर तेलाची टंचाई निर्माण झाल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जाते.

त्याचप्रमाणे तेलबियांचे कमी असलेले उत्पादन हेही त्यासाठी एक कारण आहे. काहीही असले तरी बाजारपेठेत तेलाचे भाव कमालीचे वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दररोजच्या जेवणात तेलाचा वापर होतो. मात्र भाववाढीमुळे हे तेलच गायब करण्याची वेळ आता आली आहे.

सतत या न त्या कारणाने महागाई वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि सूर्यफूल या दोन तेलांचा सर्वाधिक वापर होतो. मागील वर्षी मार्च महिन्यात सूर्यफूल तेल १०६ रुपये किलो या दराने विक्री झाले होते. याच तेलाचे दर आता १६७ रुपयांवर पोहोचले आहेत. वर्षभरात तेलाच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत, तर मागील वर्षी ९७ रुपये किलो या दराने विक्री होणाऱ्या सोयाबीन तेलाचे दर यावर्षी मात्र १४० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे महागाईत तेलाने भर टाकली आहे.

तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने किराणावर महिन्यासाठी नियोजित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च होत आहे. त्यामुळे घरातील महिन्याचे आर्थिक बजेट विस्कळीत होत आहे. तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम अन्य खाद्यपदार्थांवरही होत असून, महागाई वाढत आहे.

-सुनीता दामोशन, गृहिणी

इंधनाच्या दरापाठोपाठ आता खाद्यतेलांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत घरातील आर्थिक नियोजन लावताना तारांबळ उडते. तेलासह मागच्या काही महिन्यांपासून गॅसच्या किमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत. शासनाने तेलांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

-आरती वाघ, प्रतिक्रिया

वर्षभरात तेलाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली तरी काही तरी पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र ६० रुपयांनी तेलाच्या किमती वाढल्याने महिनेवारी खर्चावर त्याचा परिणाम होत आहे. वाढत चाललेल्या महागाईच्या सर्वाधिक झळा मध्यमवर्गीय कुटुंबीयांना सहन कराव्या लागत आहेत.

-गृहिणी, प्रतिक्रिया

तेलबियांचे कमी झालेले उत्पादन आणि जागतिक स्तरावर तेलाची कमतरता असल्याने भाववाढ होत आहे. तेलाची आयात करावी लागू नये, यासाठीही देशात तेलाच्या किमती वाढवून तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचा धोरण असू शकते.

-अशोक जैन, व्यापारी