शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

येलदरीतून तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग; मुसळधार पावसाने अनेक मार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:30 PM

rain in Parabhani : येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

येलदरी (ता.जिंतूर) : येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील अनेक मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शिवाय येलदरी प्रकल्पातून मागच्या तीन दिवसांपासून दहाही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे.

येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. येलदरी धरणाचे दहाही दरवाजे तीन दिवसांपासून सुरू असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे. या मुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान येलदरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच येलदरी- जिंतूर हा राज्य रस्ता तीन तासाहून अधिक वेळ बंद राहिला. तसेच येलदरी- इटोली या रस्त्यावर देखील हिवरखेडा गावजवळ ओढयाला पूर आल्याने हिवरखेडा, सावळी, घडोळी, रामप्रसादनागर, दिग्रस, ढाबा, इटोली, मांडवा ,खोलगडगा आदी १० गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. ७ सप्टेंबरपासून पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातुन पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे.पूर्णा प्रकल्पात वर्षात सरासरी ६५० ते ७५० मिमी पाऊस होतो. यावर्षी धरण परिसरात ११४० मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरात पावसाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

पिकांना बसला फटकाया पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला असून, खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी