शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दसऱ्यात निराशा, आता फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान भरून निघण्याची आशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:41 IST

शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

- प्रशांत मुळीयेलदरी वसाहत : पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरातील आंबरवाडी शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर परवडणारी फुल शेती निवडली आहे.सुरुवातीची तोडणी साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर केली जाते. परंतु यावर्षी दसऱ्यात झेंडूस कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा झाली. यामुळेच आता शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी झेंडू लावला. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले. शेतकऱ्यांनी दसऱ्यानिमित्त झेंडू फुले मुंबई,हैद्राबाद,पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांमध्ये विक्रीस नेली होती. आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी मात्र पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला. यामुळे अनेकांनी फुलाचा ढीग तसाच सोडलयाने दसरा त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरला. आता सगळ्यात मोठा सण दिवाळी आला आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी फुले तोडणी करून मराठवाड्यासह राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडे पाठवला आहे. शेतकऱ्यांनी फुल शेतीसाठी खूप मेहनत घेतली असून चार वेळा कीडनाशक फवारणी केली आहे. त्यात पुन्हा वन्यप्राणी उपद्रव करत असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतातच होता. तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे अधिकची मजुरी देऊन फुल तोडणी करावी लागली आहे. यामुळे दिवाळीला तरी लक्ष्मी पावेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. 

नुकसान भरून निघावेझेंडू फुलांना सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर यात १० ते २० रुपये वाढ झाल्यास मागील नुकसान भरून काढण्यासाठी मदत होईल. - अर्जुन घुगे, फूल शेतकरी, आंबरवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र