शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दसऱ्यात निराशा, आता फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान भरून निघण्याची आशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:41 IST

शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

- प्रशांत मुळीयेलदरी वसाहत : पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरातील आंबरवाडी शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर परवडणारी फुल शेती निवडली आहे.सुरुवातीची तोडणी साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर केली जाते. परंतु यावर्षी दसऱ्यात झेंडूस कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा झाली. यामुळेच आता शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी झेंडू लावला. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले. शेतकऱ्यांनी दसऱ्यानिमित्त झेंडू फुले मुंबई,हैद्राबाद,पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांमध्ये विक्रीस नेली होती. आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी मात्र पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला. यामुळे अनेकांनी फुलाचा ढीग तसाच सोडलयाने दसरा त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरला. आता सगळ्यात मोठा सण दिवाळी आला आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी फुले तोडणी करून मराठवाड्यासह राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडे पाठवला आहे. शेतकऱ्यांनी फुल शेतीसाठी खूप मेहनत घेतली असून चार वेळा कीडनाशक फवारणी केली आहे. त्यात पुन्हा वन्यप्राणी उपद्रव करत असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतातच होता. तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे अधिकची मजुरी देऊन फुल तोडणी करावी लागली आहे. यामुळे दिवाळीला तरी लक्ष्मी पावेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. 

नुकसान भरून निघावेझेंडू फुलांना सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर यात १० ते २० रुपये वाढ झाल्यास मागील नुकसान भरून काढण्यासाठी मदत होईल. - अर्जुन घुगे, फूल शेतकरी, आंबरवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र