देवगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:31+5:302021-09-24T04:21:31+5:30
पाथरी तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी कैलास संतराम गायकवाड (३५) हे २१ सप्टेंबर रोजी काही न सांगता घराबाहेर पडले. ...

देवगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पाथरी तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी कैलास संतराम गायकवाड (३५) हे २१ सप्टेंबर रोजी काही न सांगता घराबाहेर पडले. नातेवाइकांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र, त्यांचा काही शोध लागला नाही. २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास त्यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी मायताचे वडील संतराम यशवंतराव गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शेतात उत्पन्न होत नाही, वडिलांच्या नावे असलेले स्टेट बँकेचे कर्ज कसे फेडावे? या कारणावरून आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद केले. त्यावरून पाथरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जी.एम. कराड तपास करीत आहेत. मयत कैलास गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.