शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:44 IST

आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

परभणी:  भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

यावर्षी जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती नोव्हेंबरमध्येच दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थीर राहते; परंतु, यावर्षी परतीचा पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील संपूर्ण दोन महिने कोरडे गेले. परिणामी आॅक्टोबर महिन्यात भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

भूजल सर्व्हेक्षण विभागाने निश्चित केलेल्या निरिक्षण विहिरींमधील आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विहिरींच्या पाणी पातळींची नोंद घेतली. त्यात आठ तालुक्यात पाणीपातळीत घट झाली आहे. मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीची आणि यावर्षीच्या पाणीपातळीची तुलना केली असता परभणी तालुक्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये सरासरी ७.७५ मीटरपर्यंत पाणीपातळी स्थीर राहते. यावर्षी ती ८.४८ मीटरवर गेली आहे. त्यामुळे ०.७३ मीटरची घट नोंद करण्यात आली. पाथरी तालुक्यात ७.४२ मीटरवरील पाणीपातळी ८.२० मीटरवर पोहचली आहे. या तालुक्यातही ०.७८ मीटर पाणीपातळीत घट झाली आहे. 

सोनपेठ तालुक्यामध्ये पाणीपातळीत तब्बल ३.५४ मीटरने घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये पाणीपातळी सरासरी ७.३२ मीटर असते. ती यावर्षी १०.८६ मीटरवर गेली आहे. मानवत तालुक्यामध्ये २.१५ मीटरची घट आहे. तालुक्यात ४.४३ मीटरवर असलेली पाणीपातळी ६.५८ मीटर खोल गेली आहे. सेलू तालुक्यामध्ये ६.७१ मीटर असलेली पाणीपातळी ९.१२ मीटरपर्यंत खोल गेली असून २.४१ मीटरची घट झाली आहे. गंगाखेड तालुक्यामध्येही पाणीपातळीत मोठी घट आहे. या तालुक्यात ७.६२ मीटरवर असलेली पाणीपातळी ९.३३ मीटरवर पोहचली असून १.७१ मीटरची घट तालुक्यात झाली आहे.

पालम तालुक्यामध्ये ५.०९ मीटरवरुन ५.०७ मीटरवर पाणीपातळी पोहचली असून ०.०२ मीटरची घट नोंद झाली आहे. तर जिंतूर तालुक्यात ५.४१ मीटरवरील पाणीपातळी ५.८७ मीटरवर गेली असून ०.४६ मीटरची घट झाली आहे. सहाही तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अनेक पाणीपुरवठा योजनांसाठी घेतलेल्या उद्भव विहिरींची पाणीपातळी घटल्याने योजना ठप्प पडू शकतात. परिणामी टंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

८६ विहिरींचे केले निरीक्षणभूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूजलपातळीची नोंद घेण्यासाठी एकूण ८६ विहिरींचे निरीक्षण केले. त्यात परभणी तालुक्यातील १४, पूर्णा ७, पाथरी ८, सेलू १२, मानवत ४, गंगाखेड ९, पालम ७, सोनपेठ ५ आणि जिंतूर तालुक्यातील २० विहिरींचे निरिक्षण घेऊन भूजल पातळीची नोंद घेण्यात आली आहे. 

पूर्णा तालुक्यातच वाढली पातळीइतर तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाली असली तरी पूर्णा तालुक्यात मात्र ही पातळी वाढली आहे. सर्वसाधारणपणे आॅक्टोबर महिन्यात या तालुक्यामध्ये ४.९० मीटरपर्यंत पाणीपातळी असते. मात्र ती यावर्षी २.६६ वर आली आहे. याचाच अर्थ २.२४ मीटरने पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्णा तालुक्यामध्ये यावर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. इतर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी पूर्णा तालुक्यात मात्र सरासरी एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल पातळीत वाढ नोंदवली आहे.

मागील वर्षी एकाच तालुक्यात घटमागील वर्षीच्या भूजल पातळीची तुलना करता आॅक्टोबर महिन्यामध्ये केवळ पूर्णा तालुक्यात भूजलपातळीत घट झाली होती. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र भूजल पातळीत वाढ झाली. यावर्षी नेमकी उलट परिस्थिती झाली आहे. पूर्णा तालुका वगळता सर्व तालुक्यात भूजल पातळी घटली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात परभणी तालुक्यात १.५३ मीटरने भूजल पातळी वाढली होती. पाथरी  तालुक्यात २.३८, सेलू १.२८, मानवत २.४१, गंगाखेड ०.०९, पालम ०.४४, सोनपेठ ०.५२ आणि जिंतूर तालुक्यात २.२५ मीटरने भूजलपातळीत वाढ झाली होती; परंतु, पूर्णा तालुक्यात मात्र ०.१२ मीटरने भूजल पातळी खोल गेली होती. दरम्यान, यावर्षी आठ तालुक्यांमध्ये भूजल पातळीमध्ये घट झाली असल्याने या सर्व तालुक्यांमध्ये पाणी टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीWaterपाणी