शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मरण झाले स्वस्त, महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून ...

परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून जातात. या सर्व मार्गांवर जड वाहनांसह अन्य वाहनांची २४ तास वर्दळ असते. यातील काही महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे तर काहींचे काम प्रगतिपथावर आहे. परभणी-नांदेड या महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या सर्वच महामार्गांवर काही ठराविक ठिकाणे अशी आहेत, जेथे किरकोळ अपघात तसेच मोठे अपघात नेहमीच घडतात. कोरोनाच्या पूर्वी आणि कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले होते. मागील काही दिवसांत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी होणारे अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू काही कमी झालेले नाहीत. यामुळे वाहनधारकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१८ ४२ ४७ २५

२०१९ ३८ ३६ १९

२०२० ३१ १२ २५

२०२१ मे पर्यंत १४ ०५ ११

लाॅकडाऊनमध्ये अपघात सुरूच

मागील वर्षी २०२० व सध्या २०२१ मेपर्यंत ४५ अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये हे अपघात झाले आहेत.

पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू

जिंतूर ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर मागील वर्षभरात रस्त्याने पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जड वाहनांसह किरकोळ छोट्या वाहनांच्या अपघातात रस्त्याने पायी जाणाऱ्या ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे पायी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

मृतांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक

राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गावर झालेल्या कोरोना काळातील आणि त्यापूर्वीच्या अपघातांमध्ये मृत्यू झालेले नागरिक सर्वच वयोगटातील असल्याचे दिसून येते. यात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

देवगाव फाट्याजवळील करपरा नदी पूल, चारठाणा वळण रस्ता, नागठाणा पाटी, ताडबोरगाव, परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा, आरळ, तेलगाव, परभणी-जिंतूर रस्ता, देवगाव फाटा-पाथरी रस्ता, जिंतूर - सेनगाव रस्ता या ठिकाणी वाहनधारकांनी काळजी घेत वाहने चालविणे गरजेचे आहे.

महामार्ग विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषण उपाध्याय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ३ प्रमुख महामार्गांवर १५० मृत्युंजय दूत नेमण्यात आले आहेत. हे दूत एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याची माहिती त्वरित महामार्ग पोलिसांना देतात. यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होत आहे. वाहन चालकाने वाहनावर नियंत्रण राहील, अशा पद्धतीने वाहने चालवावीत. यामुळे अपघात होणार नाहीत.

- त्र्यंबक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस पथक, जिंतूर.