शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

परभणीतील गुन्हेगारांची टोळी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

टोळी प्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड आणि टोळीतील सदस्यांनी परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार गुन्हेगारी घटना केल्या आहेत. ...

टोळी प्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड आणि टोळीतील सदस्यांनी परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार गुन्हेगारी घटना केल्या आहेत. व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या कृतीतून दुखापत करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रानिशी गैरकायद्याच्या मंडळींचा सदस्य होऊन दंगा करणे, मारहाण करणे आदी १३ गुन्हे या सदस्यांवर दाखल आहेत. या टोळीच्या संदर्भाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला असून, सदस्यांना हद्दपार करण्याची शिफारस या अहवालात केली आहे. त्यावरून दि. १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. त्यात टोळीप्रमुख लक्ष्मण गायकवाड, सदस्य अनिल अच्युत गायकवाड यांना सहा महिन्यांसाठी, तर सुरेश रामभाऊ पवार आणि आकाश राजाभाऊ जाधव यांना तीन महिन्यासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत. या आदेशानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी वरील आरोपींना जालना व बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे नेऊन सोडले आहे.

चार महिन्यांत १४ जणांना हद्दपार

जिल्हा पोलीस प्रशासनाने चार महिन्यांच्या कालावधीत १४ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यात पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची टोळी तसेच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या टोळीतील दहा सदस्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आता चार जणांना हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. यापुढेदेखील अशा पद्धतीच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. दहशत पसरविणाऱ्या व बेकायदेशीर वागणाऱ्या टोळ्यांची गैर केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिला आहे.