वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:32+5:302021-09-13T04:17:32+5:30
परभणी शहरात शहर वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करते तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाचे पथकही वाहनधारकांवर कारवाई ...

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द
परभणी शहरात शहर वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करते तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाचे पथकही वाहनधारकांवर कारवाई करत असते. यामध्ये दोनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमाचे भंग केल्यास केवळ दंड भरून घेतला जातो असे नाही तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यास सदरील वाहनधारकांचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे निलंबनासाठी पाठविला जातो.
हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन
दारू पिऊन वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर चारचाकी वाहनात न करणे, हेल्मेटचा वापर न करणे, एखाद्याच्या अपघातास कारणीभूत ठरणे, नेहमीच वाहतूक नियमांचा भंग करणे अशा बाबी करणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध लायसन्स निलंबन करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाठविला जातो. यानंतर त्यावर कारवाई होते.
आधी तीन महिने नंतर कायमस्वरूपी
एखाद्या वाहनधारकांनी सलग दोनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमाचा भंग केल्यास सदरील वाहनधारकांना त्याची लेखी बाजू मांडण्यासाठी संधी दिली जाते. यानंतर आवश्यकता वाटल्यास आधी ३ ते ६ महिन्यांसाठी लायसन्सचे निलंबन केले जाते. यानंतर कायमस्वरूपी निलंबनाचा विचार केला जातो. परंतू, परभणीत अद्यापपर्यंत कोणाचेही कायमस्वरूपी लायसन्स निलंबन केलेले नाही.
अशी होते कारवाई
देशातील वेगवेगळ्या भागांतून विविध राज्यांचे पत्र उपप्रादेशिक परिवहन विभागाला येतात. यात ज्यांनी वाहतुकीचे नियम मोडले आहे, अशांच्या निलंबनासाठी पत्र पाठविले जाते. शहर वाहतूक शाखा दर महिन्याला ही यादी तयार करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविते. यानंतर यातील काही जणांचा निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जातो.
वर्षभरात दीडशे जणांचे लायसन्स निलंबन
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आलेल्या प्रस्तावावर रीतसर बाजू वाहनधारकांनी मांडल्यानंतर लायसन्स निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव केला जातो. वर्षभरात जवळपास १०० ते १५० जणांचे लायसन्स रद्द केले जाते.
या वर्षातील कारवाई
२०२०-२१ १५०