शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अन् मी 70 हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, पवारांनी सांगितला 'तो किस्सा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:19 IST

परभणी येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचारावेळी शरद पवारांनी 70 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आठवण सांगितली.

परभणी -  मी कृषीमंत्री असताना यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. विदर्भातील शेतक्ऱ्यांच्या आत्महत्येचं मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगांना सांगितल.देशातला माझा बळीराजा आत्महत्या करतोय, तुमची आणि माझी जबाबदारी आहे, त्याची चौकशी करायची,याचं कारण शोधण्याची, त्यामध्ये धोरणात्मक बदल करण्याची. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी मी आणि पंतप्रधान लातूर आणि यवतमाळला गेलो. त्या कुटुंबातील पीडित माऊलीची मन हेलावणारी कथा ऐकून मी शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

परभणी येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचारावेळी शरद पवारांनी 70 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आठवण सांगितली. यवतमाळमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येसंदर्भात मी मनमोहनसिंग यांना सांगितलं. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी मी आणि पंतप्रधान लातूरला गेलो, यवतमाळला गेलो. त्या कुटुंबाला भेटलो, घरी गेलो तेव्हा माऊली रडत होती. तिला विचारलं का एवढं टोकाच पाऊल तुझ्या नवऱ्यानं घेतलं. रडत रडतच त्या माऊलीनं सांगितलं. पीक पाण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. बी-बीयाणं घेऊन पेरणी केली. पण, लागोपाठ दोन वर्ष पाऊस नाही पडला. दोन वर्ष दुष्काळ पडला, शेती उद्धवस्त झाली. पण, कर्जाच ओझ बाकी राहिलं, कर्ज उद्धवस्त नाही झालं. बँकेतील अधिकाऱ्यांनी कर्जामुळे घरावर जप्तीचा आदेश काढला. घरात एकुलती एक मुलगी होती, तीही लग्नाला आलेली. मुलीच्या लग्नासाठी मालकानं थोडीशी रक्कम जमवली होती. मात्र, जप्तीच्या अधिकाऱ्यांनी घरावर धाड टाकली.घरात मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कमही जप्तीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. माझ्या मालकाला हे सहज झालं नाही.आता माझ्या पोरीचं लग्न कसं होईल. तो एकच म्हणत होता. माझ्या अब्रुचा पंचनामा झाला, पै-पावण्यात माझी बेअब्रु झाली. त्यामुळं, एका रात्री कपाशीसाठी आणलेल एंडरिल तो प्याला अन् त्यान जीव सोडला. त्या माऊलीच दु:ख ऐकून मग आम्ही दोघं दिल्ली गेलो. दिल्लीत गेल्यानंतर मी पंतप्रधानांना सांगितल ही आपली जबाबदारी आहे. 

हिंदुस्तानात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असेल, तर सरकार म्हणून ती तुमची अन् माझी जबाबदारी आहे. मोठ्या मोठ्या उद्योगपतींना बँकेकडून शेकडो कोटी रुपयांची सूट दिली जाते. पण, एकर दोन एकर शेतकऱ्यांच्या डोक्यावर त्याचं पीक उद्धवस्त झालं, तर त्याला आम्ही कवडीची किंमत करत नाही, देशातलं हे चित्र बदललं पाहिजे. त्यावेळी एका हुकुमाने देशातील शेतकऱ्यांवरील 70 हजार कोटींचं कर्ज माफ केलं, अशी एक आठवण पवार यांनी आपल्या परभणीतील भाषणात सांगितली. 

विशेष म्हणजे, नुसतंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही केलं, तर व्याजाचे दर कमी केले. शेतमालाच्या किमती वाढवल्या. त्याचा परिमाण म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या. परदेशातून धान्य आयात करणारा देश जगातील 15 देशांना धान्य निर्यात करू लागला. देशातील बहाद्दर शेतकऱ्याने हे करुन दाखवलं, कारण शेतमालाला चांगला भाव मिळाला. त्यानंतर, सरकार बदलल, मोदीसाहेबांचं सरकार आलं, सक्तीची वसुली, शेतीमालाची किंमत नाही, शेतकऱ्यांच दु:खणं दूर करत नाहीत, असे म्हणत पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी मोदींना जबाबदार धरलं.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याManmohan Singhमनमोहन सिंग