शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

अन् मी 70 हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, पवारांनी सांगितला 'तो किस्सा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:19 IST

परभणी येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचारावेळी शरद पवारांनी 70 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आठवण सांगितली.

परभणी -  मी कृषीमंत्री असताना यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. विदर्भातील शेतक्ऱ्यांच्या आत्महत्येचं मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगांना सांगितल.देशातला माझा बळीराजा आत्महत्या करतोय, तुमची आणि माझी जबाबदारी आहे, त्याची चौकशी करायची,याचं कारण शोधण्याची, त्यामध्ये धोरणात्मक बदल करण्याची. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी मी आणि पंतप्रधान लातूर आणि यवतमाळला गेलो. त्या कुटुंबातील पीडित माऊलीची मन हेलावणारी कथा ऐकून मी शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

परभणी येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचारावेळी शरद पवारांनी 70 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आठवण सांगितली. यवतमाळमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येसंदर्भात मी मनमोहनसिंग यांना सांगितलं. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी मी आणि पंतप्रधान लातूरला गेलो, यवतमाळला गेलो. त्या कुटुंबाला भेटलो, घरी गेलो तेव्हा माऊली रडत होती. तिला विचारलं का एवढं टोकाच पाऊल तुझ्या नवऱ्यानं घेतलं. रडत रडतच त्या माऊलीनं सांगितलं. पीक पाण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. बी-बीयाणं घेऊन पेरणी केली. पण, लागोपाठ दोन वर्ष पाऊस नाही पडला. दोन वर्ष दुष्काळ पडला, शेती उद्धवस्त झाली. पण, कर्जाच ओझ बाकी राहिलं, कर्ज उद्धवस्त नाही झालं. बँकेतील अधिकाऱ्यांनी कर्जामुळे घरावर जप्तीचा आदेश काढला. घरात एकुलती एक मुलगी होती, तीही लग्नाला आलेली. मुलीच्या लग्नासाठी मालकानं थोडीशी रक्कम जमवली होती. मात्र, जप्तीच्या अधिकाऱ्यांनी घरावर धाड टाकली.घरात मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कमही जप्तीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. माझ्या मालकाला हे सहज झालं नाही.आता माझ्या पोरीचं लग्न कसं होईल. तो एकच म्हणत होता. माझ्या अब्रुचा पंचनामा झाला, पै-पावण्यात माझी बेअब्रु झाली. त्यामुळं, एका रात्री कपाशीसाठी आणलेल एंडरिल तो प्याला अन् त्यान जीव सोडला. त्या माऊलीच दु:ख ऐकून मग आम्ही दोघं दिल्ली गेलो. दिल्लीत गेल्यानंतर मी पंतप्रधानांना सांगितल ही आपली जबाबदारी आहे. 

हिंदुस्तानात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असेल, तर सरकार म्हणून ती तुमची अन् माझी जबाबदारी आहे. मोठ्या मोठ्या उद्योगपतींना बँकेकडून शेकडो कोटी रुपयांची सूट दिली जाते. पण, एकर दोन एकर शेतकऱ्यांच्या डोक्यावर त्याचं पीक उद्धवस्त झालं, तर त्याला आम्ही कवडीची किंमत करत नाही, देशातलं हे चित्र बदललं पाहिजे. त्यावेळी एका हुकुमाने देशातील शेतकऱ्यांवरील 70 हजार कोटींचं कर्ज माफ केलं, अशी एक आठवण पवार यांनी आपल्या परभणीतील भाषणात सांगितली. 

विशेष म्हणजे, नुसतंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही केलं, तर व्याजाचे दर कमी केले. शेतमालाच्या किमती वाढवल्या. त्याचा परिमाण म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या. परदेशातून धान्य आयात करणारा देश जगातील 15 देशांना धान्य निर्यात करू लागला. देशातील बहाद्दर शेतकऱ्याने हे करुन दाखवलं, कारण शेतमालाला चांगला भाव मिळाला. त्यानंतर, सरकार बदलल, मोदीसाहेबांचं सरकार आलं, सक्तीची वसुली, शेतीमालाची किंमत नाही, शेतकऱ्यांच दु:खणं दूर करत नाहीत, असे म्हणत पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी मोदींना जबाबदार धरलं.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याManmohan Singhमनमोहन सिंग