शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा येथील अनाथ मुलींना साऱ्या वस्तीनेच घेतले दत्तक; थाटामाटात लग्नही लावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 19:04 IST

लहानवयातच पालक गमावलेल्या चार अनाथ मुलींना कोळीवाड्यातील अख्या वस्तीनेच दत्तक घेतले.

पूर्णा (परभणी) : लहानवयातच पालक गमावलेल्या चार अनाथ मुलींना कोळीवाड्यातील अख्या वस्तीनेच दत्तक घेतले. ऐवढेच नाही तर चारही मुलींचे थाटामाटात लग्न लावले. यातील सर्वात लहान मुलीचे लग्न शुक्रवारी पार पडले. 

शहराजवळ नदी काठी कोळी समाजाची वस्ती आहे. हलाखीच्या परीस्थित असलेली येथील नागरिक मजुरी करून आपला उदर निर्वाह करतात. २००६ साली येथे राहणाऱ्या कमलाबाई साहेबराव भिसे व त्याच्या एका मुलाचा आगीत जळाल्याने मृत्यू झाला. यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर साहेबराव भिसे यांचेही निधन झाले. यामुळे भिसे परिवारातील चार मुली अनाथ झाल्या.

या चौघींवर अचानक ओढवलेल्या या परिस्थित पूर्ण कोळीवाडा त्यांच्या पाठीशी उभा राहिला. येथील नागरिकांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले. यासोबतच येथील वाल्मिक मित्र मंडळाने चौघींचीही भावासारखी काळजी घेतली. यातूनच २००८ साली सर्वात मोठी मुलगी धाराबाई, २०१० साली ज्योती, २०१४ साली वर्षा तर शुकवारी (दि. 6) सर्वात लहान मुलगी उज्वला हिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे, साहेब कदम, नितीन कदम, संतोष एकलारे, सुनील जाधव आदींची उपस्थिती होती. कोळीवाड्यातील नागरिक व वाल्मिक मित्र मंडळ यांचे या कार्यामुळे कौतुक करण्यात येत आहे. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकmarriageलग्न