शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी शहरातील सर्व मोबाईल टॉवर अनाधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:56 IST

शहरातील सर्वच मोबाईल टॉवर अनाधिकृत असून, या टॉवरचे एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील सर्वच मोबाईल टॉवर अनाधिकृत असून, या टॉवरचे एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़शहरातील मनपाच्या बी़ रघुनाथ सभागृहात सभापती सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली़ व्यासपीठावर उपायुक्त विद्या गायकवाड, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची उपस्थिती होती़ यावेळी शहरातील मोबाईल टॉवर संबंधित खाजगी एजन्सीमार्फत सर्व कामे करण्याच्या दरास मान्यता देण्याचा मुद्दा मांडण्यात आला़ त्यावर सर्वच सदस्य प्रशासनावर तुटून पडले़ यावेळी बोलताना नगरसेवक सय्यद महेबुब अली पाशा यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़ शहरातील किती मोबाईल टॉवर किती अधिकृत व अनाधिकृत आहेत याची माहिती त्यांनी मागितली़ यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सर्वच टॉवर अनाधिकृत असून, संबंधित १०६ टॉवर असलेल्या कंपन्यांकडून वर्षभरात १ कोटी ५७ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़, असे सांगितले़ यावर समितीचे सदस्य तथा माजी सभापती गणेश देशमुख यांनी अधिकाºयांना कोंडीत पकडले़ २०१४ मध्ये आपण सभापती असताना अधिकृत टॉवर असलेल्या कंपन्यांकडून दरमहा १५ हजार तर अनाधिकृत टॉवर असलेल्या कंपन्यांकडून दरमहा ३० हजार रुपये वसूल करण्याचा निर्णय झाला होता़ त्यानंतर प्रतिवर्ष १० टक्के दंडाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय झाला होता, त्याचे काय झाले? असा सवाल केला़ त्यावर संबंधित अधिकारी निरुत्तर झाले़ शहरातील अनाधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई केली नसल्याने मनपाचा महसूल बुडण्यास जबाबदार कोण आहे? असा सवाल यावेळी बाळासाहेब बुलबुले यांनी केला़ यावेळी अधिकाºयांनी या मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करून अहवाल देण्यासाठी पाच वेळा निविदा काढण्यात आल्या़ परंतु, एजन्सी मिळाली नाही, असे सांगितले़ हे कारण सदस्यांनी नाकारले़ एजन्सी मिळत नाही म्हणून नुकसान का सहन करायचे? असा सवाल करण्यात आला़ अतुल सरोदे यांनीही मोबाईल टॉवरच्या परवानग्याबाबतही दुजाभाव होता कामा नये, असे सांगितले़ प्रशास ठाकूर यांनी या संदर्भात नियमावली तयार करावी, अशी मागणी केली़ यावर शहरातील सर्व मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी पाणीटंचाईच्या विषयावर चर्चा करीत असताना नगरसेवक इम्रान हुसैनी यांनी मागील सभेत टँकर संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे काय झाले? असा जाब विचारला़ त्यावर मनपातील कर्मचाºयांनी प्रभाग समिती ब अंतर्गत टँकरची आॅर्डर काढली आहे, असे सांगितले़ वर्षानुवर्षे मनपाच्या टँकरची दुरुस्ती झाली नाही, काही भागात पाईपलाईन नाही, त्या भागातील नागरिकांनी काय करायचे असा सवाल यावेळी सरोदे यांनी केला़ यावर ज्या भागातील हातपंप बंद आहेत, ते सुरू करण्याचा व जेथे पाईपलाईन नाही ते टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ शहरातील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला़ यावेळी नगरसेविका समरीन बेगम यांनी गोरक्षण परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली़ त्यावर स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दोन वेळा पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे; परंतु, पोलिसांनी बंदोबस्तासाठीची रक्कम भरण्यास सांगितले आहे़, असे ते म्हणाले़ यावेळी सदस्यांनी अतिक्रमण बसेपर्यंत त्या भागातील स्वच्छता निरीक्षक काय करत होते? असा जाब विचारला़ यावेळी नगरसेविका उषाताई झांबड यांनी त्यांच्या प्रभागात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करूनही प्रत्यक्ष रस्ता कामास का सुरूवात झाली नाही? याचा जाब विचारला़ त्यावर सभापती देशमुख यांनी त्यावेळी निधी उपलब्ध नव्हता़ आता दलितोत्तर योजनेंतर्गत निधी दिला आहे़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईल, असे सांगितले़ यावेळी अन्य दहा विषयांना मंजुरी दिली़ यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेविका जाहेदा बेगम शेख इब्राहीम, विद्या पाटील यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला़होर्डिग्जच्या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चामनपाने जाहीर केलेल्या झिरो होर्डिग्ज धोरणाचा फज्जा उडाल्याचा प्रश्न नगरसेवक इम्रान हुसैनी, गुलमीर खान यांनी उपस्थित केला़ मनपाने झिरो होर्डिग्जचे धोरण जाहीर केले होते़ मग शहरात होर्डिग्ज लागले कसे काय? संबंधितावर काय कारवाई केली? याच्या निविदा का काढल्या गेल्या नाहीत? सहा महिन्यांत झालेल्या आर्थिक नुकसानीला कोण जबाबदार आहे? असे अ नेक प्रश्न यावेळी या नगरसेवकांनी उपस्थित केले़ यावेळी अधिकाºयांनी होर्डिग्जसाठीचे स्पॉट फिक्स करण्यााठी सर्वे करण्याकरीता एजन्सी नियुक्तीच्या निविदा काढल्या होत्या़ परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगितले़ त्यावर अशी टोलवाटोलवीची उत्तरे चालणार नाही़ मनपाने या संदर्भात ठोस कार्यवाही काय केली? असा सवाल करण्यात आला़ त्यावर मनपाचे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत़ त्यानंतर हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीMobileमोबाइलMuncipal Corporationनगर पालिका