शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना!

By मारोती जुंबडे | Updated: January 16, 2024 16:51 IST

निष्काळजीपणा, ओव्हरटेक पडते महागात; दिशादर्शक फलकांचाही अभाव

परभणी : जिल्ह्यातील रस्ते गुळगुळीत झाले असले, तरी एकाही रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहनाचा वेग सुसाट झाला. परिणामी, वर्षभरात ४४१ अपघात जिल्हाभरात झाले आहेत. या अपघातात २१६ जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे वाहनधारकांना निष्काळजीपणा व ओव्हरटेक चांगलेच महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांना ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गांवर ठीक ठिकाणी गतिरोधक उभारणे गरजेचे आहे.

मागील काही दिवसांपासून वाहनधारकांचे गतीवर नियंत्रण राहिलेले नाही, याच अतिवेगाने जिल्ह्यात अपघात घडत आहेत. विशेष म्हणजे गंभीर जखमींपेक्षा मयतांचा आकडा अधिक आहे. त्यामुळे सध्या अपघात झाला की थेट वाहनधारक प्रवासी यमसदनी जात असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वांत जास्त अपघात हे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर होत आहेत. जिल्ह्यात सध्या वाहनांची संख्या गतीने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला गाव तेथे रस्ता होत आहे, तसेच ग्रामीणसह शहरातील रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहनधारकांच्या गतीला नियंत्रण राहिले नाही. परिणामी अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने अपघात रोखणेही अशक्य आहे. २०२३-२४ या वर्षातील ३६५ दिवसांत ४४१ अपघात घडून त्यात २१६ जणांना आपला जीव गमवावा लागला. हे चिंताजनक आहे.

दिशादर्शक फलकासह, उपाययोजना आवश्यकमद्यपान, निष्काळजीपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, रस्त्यावरील खड्डे यासह गुळगुळीत महामार्गावरील गतिराेधकांच्या अभावामुळे जिल्ह्यात दिवसागणिक एक अपघात घडत आहे. यात अनेक कुटुंबांतील कर्त्याचा जीव जात आहे. त्यामुळे प्रशासनाने अपघाताच्या संख्येची दखल घेता प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलकासह अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गतवर्षी २१६ जणांना आपला जीव गमावला आहे.

अपघात रोखायचे, गतिरोधक टाकापरभणी-गंगाखेड, परभणी जिंतूर हे महामार्ग गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे या महामार्गावरून दुचाकीसह चारचाकी वाहने सुसाट धावत आहेत. परिणामी दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर ठिकठिकाणी गतिरोधक आवश्यक आहे; परंतु हे गतिरोधक उभारले जात नाहीत. त्यामुळे दिवसागणिक अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन या दोन्ही रस्त्यांच्या कंत्राटदारांना आदेशित करून एक किलोमीटरच्या आत प्रत्येक ठिकाणी गतिरोधक उभारण्याचे आदेशित करावे, तरच अपघातांना आळा बसेल.

रस्ता सुरक्षा अभियानाऐवजी पावत्या फाडण्यावर भरप्रशासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यासाठी पोलिस प्रशासन, आरटीओ विभाग, राष्ट्रीय परिवहन महामार्ग विभाग लाखो रुपये खर्च करते; मात्र जनजागृतीच्या नावाखाली केवळ फोटो सेशन होते. दुसरीकडे शहर वाहतूक शाखा व आरटीओ विभागाकडून जनजागृती करण्याऐवजी दुचाकी व चारचाकी वाहनांकडून पावत्या फाडण्यावरच भर दिला जातो. त्यामुळे सामान्य वाहनधारकांमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाच्या बाबतीत पुरेशी जनजागृती झालेली नाही. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीDeathमृत्यू