शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

विहिरीसाठी ४ लाखांचे अनुदान देणार हो; पण कधी?

By मारोती जुंबडे | Updated: March 11, 2023 16:02 IST

मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आडकाठी कोणाची

पाथरी: वाढती महागाई, साहित्याचे वाढलेले दर लक्षात घेता शासनाने मनरेगा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी ४ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. तालुक्यात सद्यस्थितीत ४ लाख रुपये अनुदान असणाऱ्या विहिरीचे तालुक्यात एकही काम सुरू नाही. त्यासाठी मनरेगा यंत्रणेची अनास्था कारणीभूत ठरत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, असे वास्तव चित्र आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना २००८ पासून सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो. सुरुवातीला कुशल, अकुशल स्वरूपात १ लाख रुपये अनुदान दिले जात होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन २ लाख रुपये अनुदान करण्यात आले. वाढती महागाई लक्षात घेता पुन्हा अनुदान रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली. आता सिंचन विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम करण्यासाठी ही रक्कम अपुरी पडत असल्याने राज्य शासनाने २०२२-२३ वर्षात सिंचन विहिरीसाठी ४ लाख अनुदान जाहीर केले आहे. राज्य शासनाने विहिरीसाठी अनुदानात वाढ केल्याने शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल अशी अपेक्षा होती. अनुदान वाढीचे पंचायत समिती स्तरावर आदेश येऊन धडकले. मात्र योजना अंमलबजावणीसाठी यंत्रणेची अनास्था कारणीभूत ठरू लागली आहे. ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव दाखल झाले तरी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. काही प्रस्ताव मंजूर ही झाले तर काही कामे सुरू ही झाले. मात्र पुन्हा मजुरांचे मस्टर रोल जनरेट होत नसल्याने कामे बंद पडली आहेत. त्यामुळे अनुदान वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ होताना दिसत नाही.

७४ सिंचन विहिरीची कामे ठप्पमनरेगा योजने अंतर्गत कामावर मजुरांच्या हजेरी पत्रकावर ग्रामसेवक यांना प्रति स्वाक्षरी सूट देण्यात आली आहे. शासनाचा हा निर्णय झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांनी मस्टर जनरेट न करण्याचा निर्णय घेतला. पर्यायाने सार्वजनिक कामासोबतच वैयक्तिक लाभाच्या योजनेचे ही हजेरीपत्रक पूर्ण पणे बंद पडली आहेत. तालुक्यातील जवळपास ७४ सिंचन विहिरीची कामे यामुळे ठप्प झाली आहेत.

१०० प्रस्ताव दाखलशासनाचा निर्णय आल्यानंतर ग्रामपंचायत कडून जवळपास १०० पेक्षा अधिक प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल झाले. ६ प्रस्तावाला मंजुरी मिळाली. मस्टर जनरेट झाले, पुढे मात्र काम बंद पडले असा प्रकार घडत आहे. तर दुसरीकडे मनरेगा कक्षाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्या कडून चक्क माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे विभागाची काही तरी माहिती दडपून ठेवतोय का? असा प्रश्न यातून उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी