शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीसाठी ४ लाखांचे अनुदान देणार हो; पण कधी?

By मारोती जुंबडे | Updated: March 11, 2023 16:02 IST

मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आडकाठी कोणाची

पाथरी: वाढती महागाई, साहित्याचे वाढलेले दर लक्षात घेता शासनाने मनरेगा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी ४ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. तालुक्यात सद्यस्थितीत ४ लाख रुपये अनुदान असणाऱ्या विहिरीचे तालुक्यात एकही काम सुरू नाही. त्यासाठी मनरेगा यंत्रणेची अनास्था कारणीभूत ठरत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, असे वास्तव चित्र आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना २००८ पासून सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो. सुरुवातीला कुशल, अकुशल स्वरूपात १ लाख रुपये अनुदान दिले जात होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन २ लाख रुपये अनुदान करण्यात आले. वाढती महागाई लक्षात घेता पुन्हा अनुदान रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली. आता सिंचन विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम करण्यासाठी ही रक्कम अपुरी पडत असल्याने राज्य शासनाने २०२२-२३ वर्षात सिंचन विहिरीसाठी ४ लाख अनुदान जाहीर केले आहे. राज्य शासनाने विहिरीसाठी अनुदानात वाढ केल्याने शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल अशी अपेक्षा होती. अनुदान वाढीचे पंचायत समिती स्तरावर आदेश येऊन धडकले. मात्र योजना अंमलबजावणीसाठी यंत्रणेची अनास्था कारणीभूत ठरू लागली आहे. ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव दाखल झाले तरी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. काही प्रस्ताव मंजूर ही झाले तर काही कामे सुरू ही झाले. मात्र पुन्हा मजुरांचे मस्टर रोल जनरेट होत नसल्याने कामे बंद पडली आहेत. त्यामुळे अनुदान वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ होताना दिसत नाही.

७४ सिंचन विहिरीची कामे ठप्पमनरेगा योजने अंतर्गत कामावर मजुरांच्या हजेरी पत्रकावर ग्रामसेवक यांना प्रति स्वाक्षरी सूट देण्यात आली आहे. शासनाचा हा निर्णय झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांनी मस्टर जनरेट न करण्याचा निर्णय घेतला. पर्यायाने सार्वजनिक कामासोबतच वैयक्तिक लाभाच्या योजनेचे ही हजेरीपत्रक पूर्ण पणे बंद पडली आहेत. तालुक्यातील जवळपास ७४ सिंचन विहिरीची कामे यामुळे ठप्प झाली आहेत.

१०० प्रस्ताव दाखलशासनाचा निर्णय आल्यानंतर ग्रामपंचायत कडून जवळपास १०० पेक्षा अधिक प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल झाले. ६ प्रस्तावाला मंजुरी मिळाली. मस्टर जनरेट झाले, पुढे मात्र काम बंद पडले असा प्रकार घडत आहे. तर दुसरीकडे मनरेगा कक्षाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्या कडून चक्क माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे विभागाची काही तरी माहिती दडपून ठेवतोय का? असा प्रश्न यातून उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी