शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

विहिरीसाठी ४ लाखांचे अनुदान देणार हो; पण कधी?

By मारोती जुंबडे | Updated: March 11, 2023 16:02 IST

मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आडकाठी कोणाची

पाथरी: वाढती महागाई, साहित्याचे वाढलेले दर लक्षात घेता शासनाने मनरेगा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी ४ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. तालुक्यात सद्यस्थितीत ४ लाख रुपये अनुदान असणाऱ्या विहिरीचे तालुक्यात एकही काम सुरू नाही. त्यासाठी मनरेगा यंत्रणेची अनास्था कारणीभूत ठरत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, असे वास्तव चित्र आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना २००८ पासून सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो. सुरुवातीला कुशल, अकुशल स्वरूपात १ लाख रुपये अनुदान दिले जात होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन २ लाख रुपये अनुदान करण्यात आले. वाढती महागाई लक्षात घेता पुन्हा अनुदान रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली. आता सिंचन विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम करण्यासाठी ही रक्कम अपुरी पडत असल्याने राज्य शासनाने २०२२-२३ वर्षात सिंचन विहिरीसाठी ४ लाख अनुदान जाहीर केले आहे. राज्य शासनाने विहिरीसाठी अनुदानात वाढ केल्याने शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल अशी अपेक्षा होती. अनुदान वाढीचे पंचायत समिती स्तरावर आदेश येऊन धडकले. मात्र योजना अंमलबजावणीसाठी यंत्रणेची अनास्था कारणीभूत ठरू लागली आहे. ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव दाखल झाले तरी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. काही प्रस्ताव मंजूर ही झाले तर काही कामे सुरू ही झाले. मात्र पुन्हा मजुरांचे मस्टर रोल जनरेट होत नसल्याने कामे बंद पडली आहेत. त्यामुळे अनुदान वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ होताना दिसत नाही.

७४ सिंचन विहिरीची कामे ठप्पमनरेगा योजने अंतर्गत कामावर मजुरांच्या हजेरी पत्रकावर ग्रामसेवक यांना प्रति स्वाक्षरी सूट देण्यात आली आहे. शासनाचा हा निर्णय झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांनी मस्टर जनरेट न करण्याचा निर्णय घेतला. पर्यायाने सार्वजनिक कामासोबतच वैयक्तिक लाभाच्या योजनेचे ही हजेरीपत्रक पूर्ण पणे बंद पडली आहेत. तालुक्यातील जवळपास ७४ सिंचन विहिरीची कामे यामुळे ठप्प झाली आहेत.

१०० प्रस्ताव दाखलशासनाचा निर्णय आल्यानंतर ग्रामपंचायत कडून जवळपास १०० पेक्षा अधिक प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल झाले. ६ प्रस्तावाला मंजुरी मिळाली. मस्टर जनरेट झाले, पुढे मात्र काम बंद पडले असा प्रकार घडत आहे. तर दुसरीकडे मनरेगा कक्षाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्या कडून चक्क माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे विभागाची काही तरी माहिती दडपून ठेवतोय का? असा प्रश्न यातून उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी