शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत गौण खनिजाचे ३३ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST

गंगाखेड : येथील महसूल विभागाने एप्रिल २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ३३ ...

गंगाखेड : येथील महसूल विभागाने एप्रिल २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ३३ वाहने जप्त केली. या वाहनमालकांना ३७ लाख ९५ हजार ७८ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध गौण खनिजाची वाहतूक सुसाट होत असल्याचे दिसून येत आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी ही वाळू पट्ट्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये वाळूमाफियांनी आनंदवाडी, गौंडगाव, धारासूर, मैराळ सावंगी, गंगाखेड शहर आदी ठिकाणांवरून बेसुमार वाळू उपसा केला. वाळू उपसा करून नदीकाठावर त्याचे साठे निर्माण केले. गरजेनुसार या साठ्यातून वाळूची टिप्पर, ट्रक, हायवाच्या माध्यमातून वाहतूक करून संबंधितांपर्यंत अवैध मार्गाने ही पोहोचती केली. दररोज बेसुमार वाळूची व दगड, माती व मुरमाच्या होत असलेल्या अवैध वाहतुकीबद्दल नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर थातूरमातूर कारवाई करून पोलीस व महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांना रान मोकळे सोडले. एप्रिल २०२० ते १५ मार्च २०२१ या ११ महिन्यांच्या कालावधीत हायवा, टिप्पर, ट्रॅक्टरचा हेड असे ३३ वाहने अवैध गौण खनिजाची वाहतूक करताना महसूल प्रशासनाने जप्त केली. विशेष म्हणजे या वाहनमालकांना महसूल प्रशासनाच्या वतीने ३७ लाख ९५ हजार ७८ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एकीकडे दररोज २०० हून अधिक वाहनांद्वारे अवैध वाळू, मुरूम व मातीची वाहतूक केली जात असताना दुसरीकडे मात्र थातूरमातूर कारवाया करीत ११ महिन्यांत केवळ ३३ वाहने जप्त करण्याची किमया महसूल प्रशासनाने गंगाखेड तालुक्यात साधली आहे.

केवळ २१ लाखांचा दंड वसूल

अवैध गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी ११ महिन्यांत महसूल प्रशासनाने केवळ ११ वाहने जप्त केली. विशेष म्हणजे या वाहनांना ठोठावण्यात आलेला ३७ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वेळेत वसूल करणे अपेक्षित होते. मात्र महसूल प्रशासनाला हा दंडही वसूल करता आला नाही. ठोठावलेल्या दंडापैकी केवळ २० लाख ८२ हजार ६८५ रुपयांचाच दंड वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना तालुका महसूल प्रशासन मात्र अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.