शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
2
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
3
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
4
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
5
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
6
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
7
Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
8
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
9
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
11
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
12
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
13
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
14
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
15
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
16
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
17
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
18
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
19
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
20
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ५ महिन्यांत २७८ बालविवाहांना लावला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 16:44 IST

सोळा प्रकरणांत गुन्हे दाखल; जनजागृतीची आवश्यकता

परभणी : बालविवाहाचे प्रमाण परभणी जिल्ह्यात ४८ टक्के असून, हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. 'बालविवाह मुक्त परभणी' या अभियानांतर्गत एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या ५ महिन्यांत जिल्ह्यातील २७८ बालविवाहांना ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. १६ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणखीही जनजागृतीची आवश्यकता आहे.

 बालविवाहाला प्रतिबंध व्हावा, यासाठी जिल्ह्यात मागील वर्षीपासून विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विविध कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा, लोकजागर अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. ३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची एकदिवसीय बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळा घेऊन उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, १२५ शाळा, धर्मगुरू, आचारी, मंडप डेकोरेशन पुरविणारे आदींना एकत्र करून विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली, तसेच जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे, प्रार्थनास्थळे, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाह मुक्त अभियानात १००० महिलांचा सहभाग असलेली रॅली काढून जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा केला. आकाशवाणी, एफएम, सजीव देखावे व विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात आली.

अभियानाचा आता दुसरा टप्पाबालविवाहमुक्त परभणी या अभियानांतर्गत आता दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने 'ट्रॅक द गर्ल चाइल्ड' या नावाने ॲप विकसित केले जात आहे. या ॲपद्वारे ० ते १८ वयोगटातील मुलींचे ट्रेकिंग केले जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर व शाळा स्तरावर माहिती घेऊन बालविवाह होऊ शकतो अशी शक्यता वाटल्यास त्या मुलींची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावणार आहेत. समाजाने १८ वर्षांपर्यंत शिक्षण देण्यासाठी या मुलींना दत्तक घ्यावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. या टप्प्यात समाजाचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे.

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहू द्या‘त्या’ २८ टक्क्यांचं काय ?मुलींच्या शिक्षणाबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईल अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. शाळा गावात असणे, नसेल तर शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था आणि मुलींची सुरक्षिततासुद्धा महत्त्वाची मानली जाते. आदी व्यवस्था झाली तर मुली शिक्षण घेऊ शकतात. म्हणूनच मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहू द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ७२ टक्के मुली दहावीपर्यंत शिक्षण घेतात उरलेल्या २८ टक्क्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परभणी पहिला जिल्हाएनएफएचएसच्या चौथ्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून, जिल्ह्यातील प्रमाणही सर्वाधिक म्हणजे ४८ टक्के आहे. महाराष्ट्रात बालविवाह मुक्तीची चळवळ सुरू करणारा परभणी पहिला जिल्हा आहे.

प्रभावीपणे राबविला जाणार'बालविवाहमुक्त परभणी' हा उपक्रम तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले अभियान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, महिला बालकल्याणचे विभागीय आयुक्त डॉ. प्रशांत ननावरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. उपक्रम पुढेही प्रभावीपणे राबविला जाणार असून, परभणी जिल्ह्यासारखेच अभियान बीड, नांदेड, सोलापूर आदी जिल्ह्यांत राबविले जात असल्याची माहिती के. व्ही. तिडके यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी