शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मोदींच्या एका निर्णयामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू, शरद पवारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 21:12 IST

15 लाख मुलांच्या नोकऱ्या गेल्या, कारण कारखानदारी बंद पडली. एका निर्णयामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात होतो, हे कर्तृत्व भाजपाच्या, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नागरिकांसाठी केलंय

परभणी - लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयावरुन पवारांनी मोदींना लक्ष्य केलं. मोदींच्या एका निर्णयामुळे सव्वाशे लोक मृत्युमुखी पडले तर 15 लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे पवार यांनी म्हटले.

नोटाबंदीनंतर 15 लाख मुलांच्या नोकऱ्या गेल्या, कारण कारखानदारी बंद पडली. एका निर्णयामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात होतो, हे कर्तृत्व भाजपाच्या, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नागरिकांसाठी केलंय. हातामधी आलेली सत्ता लोकांसाठी वापरायची असते, ती सत्ता लोकांसाठी न वापरता त्याचा गैरवापर केला, असे पवार यांनी परभणी येथील लोकसभा उमेदवार राजू टिकेकर यांच्या प्रचारसभेवेळी बोलताना म्हटले. नोटाबंदीनंतर सबंध भारताला लाईनीत उभं करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. एका निर्णयामुळे तीन दिवस भारत लाईनीत उभा राहिला. लाईनीत उभे राहणाऱ्यांत कुणीही मोठा उद्योगपती नव्हता, लाईनीत उभे राहणारे लोकं हे सर्वसामान्य होते. कामगार होते, शेतकरी होते, गरीब होते. मात्र, मोदींनी उद्योजकांचा काळा पैसा काढत असल्याचे सांगत गरिबालाच तीन दिवस उन्हा-तान्हात लाईनीत उभे केल्याचं पवार यांनी म्हटलं.

शरद पवार यांनी परभणीतील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर मोठा हल्ला चढवला. नोटाबंदी, काळापैसा, शेतकरी आत्महत्या, राफेल करार, 15 लाख रुपयांचा मुद्दा आणि एअर स्ट्राईकवरुन सुरू असलेलं राजकारण यासंदर्भातील मुद्दे उपस्थित करत मोदींवर शाब्दिक स्ट्राईक केला. तसेच या सरकारला हातातून सत्ता काढून घेऊ, या सरकारला सत्तेतून हाकलून देऊ, त्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहनही पवार यांनी केलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरणDeathमृत्यू