शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

तुमची बाइक मान्सून रेडी आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 4:29 PM

बेदरकारपणे गाडी हाकत निघणं भरपावसात किती धोक्याचं ठरू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी...

ठळक मुद्देपावसाळ्यात आपत्ती ओढावू नये म्हणून तरी भरपावसात मोबाइलवर बोलत गाडी चालवू नका.

पाऊस आता जोरदार लागलाय. रस्त्यांना खड्डेही पडलेत. त्या खड्डय़ांनी कित्येकांचे बळी घेतले. रस्ते अपघातात बळी जाणार्‍यांची, जखमी होणार्‍यांची संख्या बरीच आहे. सरकार, व्यवस्था या सगळ्यांना दोष देता येईलही; पण त्यामुळे आपला प्रश्न सुटणार नाही. प्रश्न हाच आहे की, पावसात आपण गाडी सांभाळून चालवणार का? आपली बाईक मान्सून रेडी आहे का? म्हणजेच आपण आपल्या वाहनाची काळजी घेतोय का, त्यावर माया करतोय का? बेदरकारपणे गाडी हाकत निघणं भरपावसात किती धोक्याचं ठरू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी.त्यामुळेच ही यादी हाताशी ठेवा आणि विचारा स्वतर्‍लाच की, आपली बाइक मान्सूनसाठी सज्ज आणि सुरक्षित आहे का?

1. ब्रेक लागताहेत का?पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्या गाडीचे ब्रेक तपासून घेतलेत का? ब्रेक वायर बदलल्या आहेत का? अनेकजण तर आपल्या गाडीचा ब्रेक लागत नाही तरी आपला गाडीवर कण्ट्रोल आहे असं फुशारक्या मारत सांगतात. पण हा जिवाशी खेळ आहे. त्यामुळे तातडीनं गाडीचे ब्रेक तपासा.

2. टायर कसेत?आपल्या गाडीचे टायर पार सपाट झाले, हवा कमी असली तरी अनेकजण तशीच गाडी दामटतात. गाडीचे टायर उत्तम असणं गरजेचं आहे, त्यामुळे टायरकडे जरा लक्ष द्या.

3. हेडलाइटगाडीच्या दिव्यांचा काय विचार केलाय? ते लागतात की त्यांनी कायमचे डोळे मिटलेत? हेडलाइट लागत नसतील, इंडिकेटर बंद पडले असतील तर ते दुरुस्त करायला हवेत.

4. सव्र्हिसिंग केलं का?गाडीची खरं तर नियमित सव्र्हिसिंग करायला हवी. पण ती राहिली असेल तर निदान पावसाळ्यात तरी ती करून घ्या. गाडीला फार गृहीत धरणं बरं नाही.

5. कशी चालवताय गाडी?पावसाळ्यात मुद्दाम पाण्यातून, अतिवेगानं, झिप झ्ॉप धूम स्टाइल गाडी चालवणं जिवावर बेतू शकतं. त्यामुळे आपण कितीही स्मार्ट असलो तरी गाडी जपून चालवलेली बरी.

6.  मोबाइलवर बोलणं

पाऊस आणि गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं हे किती भयानक प्रकरण होऊ शकतं, हे सगळ्यानांच कळतं. गाडी चालवताना, मान वाकडी करून, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यांनाच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरून बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडेण्ट झाला तरच !पावसाळ्यात अशी आपत्ती ओढावू नये म्हणून तरी भरपावसात मोबाइलवर बोलत गाडी चालवू नका.