शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

इंजिनिअर होवून नोकरी मिळत नाही ते का?

By admin | Updated: April 4, 2017 18:39 IST

प्रत्येकवर्षी साधारणत: पंधरा लाख अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात मात्र त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.

मुंबई, ओंकार करंबेळकरगेल्या दशकभरात आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केल्यानंतर अभियांत्रिकी क्षेत्राला एकदम उर्जितावस्था आली. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई अशा शहरांबरोबर वर्ग दोन म्हणजे पुणे- हैदराबादसारख्या शहरांमध्ये आणि नंतर त्याहून लहान शहरांमध्येही उदंड इंजिनिअरिंग कॉलेज उभी राहिली. त्यातून पास होवून बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्सची शंका मोठी पण कॅम्पस तर सोडाच बाहेरही अनेकांना नोकरी मिळत नाही. आणि मग काहीजण मिळेल ती नोकरी करतात काही एमबीए करतोय या भावनेवर समाधान मानतात.प्रत्येकवर्षी साधारणत: पंधरा लाख अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात मात्र त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.भारतामधील इंजिनिअरिंगच्या करिअरमधील संधी मुख्यत्वे मोठ्या शहरांच्या आसपास आहेत. त्यातही मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद या महानगरांच्या आसपास त्या एकवटलेल्या आहेत. मात्र वर्ग तीनमध्ये असणाऱ्या शहरांमधील विद्यार्थ्यांना मात्र या संधी मिळत नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रमही काळानुरुप बदलत नसल्याचे मत तर मुलंच काही अनेक अभ्यासकही वारंवार उघड सांगतात. नोकरीसाठी आवश्यक असणारी विषयातील कौशल्ये आणि संवाद कौशल्ये या विद्यार्थ्यांकडे नसल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे शिक्षकही बदलत्या गरजांनुसार आणि काळानुरुप बदलणाऱ्या विषयाचा अंदाज घेऊन शिकवणारे नसतात. बहुतांश शिक्षक हे अभियांत्रिकी विषयांची आवड म्हणून अध्यापनासाठी येण्याऐवजी केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून याकडे पाहतात. त्यातले काहीतर पास आऊट होताच फर्स्ट इयरच्या मुलांना शिकवायला हजर होतात.दरवर्षी लाखो विद्यार्थी अभियंते होता, पदवी घेतात आणि बाहेर पडतात. पण बाहेर पडल्यावर नोकरीच्या आपल्याकडून वेगळ््याच अपेक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यातील काही मुले मुलाखतीच्याच पातळीवर बाजूला पडतात. तर काही मुलांना नोकरीमध्ये अडथळ््यांचा सामना करावा लागतो. आपल्या महाविद्यालयांमध्ये अध्यापनाबरोबर नवोन्मेषी शिक्षण आणि संशोदनाकडे लक्ष पुरवले जात नसल्याचे मत अभ्यासक नेहमीच व्यक्त करतात. काही महिन्यांपुर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतात संशोधनाला कमी वाव मिळतो यावर चिंता व्यक्त केली होती, यावर बोलताना ते म्हणाले होते, आपल्याकडे संशोधन कमी का होते? तर आपल्याकडे प्रश्न विचारण्यास परवानगी दिली जात नाही, मुलांच्या मनातील चौकसबुद्धीला संधी दिली जात नाही. जर एखाद्याने तरीही प्रश्न विचारलाच तर त्याला वर्गात खाली बसायला सांगितले जाते. हे होता कामा नये, त्यांच्या जिज्ञासेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडलेले मत खरोखर अभियांत्रिकीसह सर्वच महाविद्यालयांनी विचारात घ्यायला हवेत.संवाद कौशल्य आणि इंग्लिशबहुतांशवेळा अभियांत्रिकीचे ज्ञान चांगले असले तरी भारतीय मुले संवादकौशल्य आणि इंग्लिश बोलण्यामध्ये मागे पडतात. इंग्लिशची भीती आणि संवादकौशल्यांचा अभाव त्यांच्या नोकऱ्यांवर परीणाम करतात. आजकाल सर्व कंपन्यांचे संबंध परदेशातील ग्राहकांशी असल्यामुळे आणि सर्व कामकाज इंग्लिश किंवा इतर परदेशी भाषांमधून होत असल्यामुळे इंग्लिश येणे क्रमप्राप्त आहे. दुर्देवाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बरेचसे बुद्धीमान विद्यार्थी यामुळे मागे राहतात व चांगल्या संधी त्यांच्यापासून हिरावून घेतल्या जातात.