शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

इंजिनिअर होवून नोकरी मिळत नाही ते का?

By admin | Updated: April 4, 2017 18:39 IST

प्रत्येकवर्षी साधारणत: पंधरा लाख अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात मात्र त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.

मुंबई, ओंकार करंबेळकरगेल्या दशकभरात आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केल्यानंतर अभियांत्रिकी क्षेत्राला एकदम उर्जितावस्था आली. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई अशा शहरांबरोबर वर्ग दोन म्हणजे पुणे- हैदराबादसारख्या शहरांमध्ये आणि नंतर त्याहून लहान शहरांमध्येही उदंड इंजिनिअरिंग कॉलेज उभी राहिली. त्यातून पास होवून बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्सची शंका मोठी पण कॅम्पस तर सोडाच बाहेरही अनेकांना नोकरी मिळत नाही. आणि मग काहीजण मिळेल ती नोकरी करतात काही एमबीए करतोय या भावनेवर समाधान मानतात.प्रत्येकवर्षी साधारणत: पंधरा लाख अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडतात मात्र त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.भारतामधील इंजिनिअरिंगच्या करिअरमधील संधी मुख्यत्वे मोठ्या शहरांच्या आसपास आहेत. त्यातही मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद या महानगरांच्या आसपास त्या एकवटलेल्या आहेत. मात्र वर्ग तीनमध्ये असणाऱ्या शहरांमधील विद्यार्थ्यांना मात्र या संधी मिळत नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रमही काळानुरुप बदलत नसल्याचे मत तर मुलंच काही अनेक अभ्यासकही वारंवार उघड सांगतात. नोकरीसाठी आवश्यक असणारी विषयातील कौशल्ये आणि संवाद कौशल्ये या विद्यार्थ्यांकडे नसल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे शिक्षकही बदलत्या गरजांनुसार आणि काळानुरुप बदलणाऱ्या विषयाचा अंदाज घेऊन शिकवणारे नसतात. बहुतांश शिक्षक हे अभियांत्रिकी विषयांची आवड म्हणून अध्यापनासाठी येण्याऐवजी केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून याकडे पाहतात. त्यातले काहीतर पास आऊट होताच फर्स्ट इयरच्या मुलांना शिकवायला हजर होतात.दरवर्षी लाखो विद्यार्थी अभियंते होता, पदवी घेतात आणि बाहेर पडतात. पण बाहेर पडल्यावर नोकरीच्या आपल्याकडून वेगळ््याच अपेक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यातील काही मुले मुलाखतीच्याच पातळीवर बाजूला पडतात. तर काही मुलांना नोकरीमध्ये अडथळ््यांचा सामना करावा लागतो. आपल्या महाविद्यालयांमध्ये अध्यापनाबरोबर नवोन्मेषी शिक्षण आणि संशोदनाकडे लक्ष पुरवले जात नसल्याचे मत अभ्यासक नेहमीच व्यक्त करतात. काही महिन्यांपुर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतात संशोधनाला कमी वाव मिळतो यावर चिंता व्यक्त केली होती, यावर बोलताना ते म्हणाले होते, आपल्याकडे संशोधन कमी का होते? तर आपल्याकडे प्रश्न विचारण्यास परवानगी दिली जात नाही, मुलांच्या मनातील चौकसबुद्धीला संधी दिली जात नाही. जर एखाद्याने तरीही प्रश्न विचारलाच तर त्याला वर्गात खाली बसायला सांगितले जाते. हे होता कामा नये, त्यांच्या जिज्ञासेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडलेले मत खरोखर अभियांत्रिकीसह सर्वच महाविद्यालयांनी विचारात घ्यायला हवेत.संवाद कौशल्य आणि इंग्लिशबहुतांशवेळा अभियांत्रिकीचे ज्ञान चांगले असले तरी भारतीय मुले संवादकौशल्य आणि इंग्लिश बोलण्यामध्ये मागे पडतात. इंग्लिशची भीती आणि संवादकौशल्यांचा अभाव त्यांच्या नोकऱ्यांवर परीणाम करतात. आजकाल सर्व कंपन्यांचे संबंध परदेशातील ग्राहकांशी असल्यामुळे आणि सर्व कामकाज इंग्लिश किंवा इतर परदेशी भाषांमधून होत असल्यामुळे इंग्लिश येणे क्रमप्राप्त आहे. दुर्देवाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बरेचसे बुद्धीमान विद्यार्थी यामुळे मागे राहतात व चांगल्या संधी त्यांच्यापासून हिरावून घेतल्या जातात.