शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

वेडा आहेस का ? कॉम्प्युटर इंजिनिअर ‘शेतकरी’ व्हायचं ठरवतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 10:07 IST

आयआयएममध्ये प्रत्येकाच्या डोक्यात एक किडा घुसवला जातो आणि तो म्हणजे स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा.

ठळक मुद्देआसपासची कुचेष्टा, टोमणे याकडे दुर्लक्ष करून मी शेवटी शेतीत उतरलो...

सुबोध पाटणकर

साधारण सात-आठ वर्षापूर्वीची गोष्ट. ‘वेडा आहेस का, काय अवदसा आठवली तुला.?’ असे अनेक कौतुकोद्गार कानावर पडत असूनही मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. ठरवलंच होतं, शेतकरी व्हायचं. आणि शेतकरी झालो. कॉम्प्युटर इंजिनिअर आणि आयआयएममधून एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंटचा कोर्स करून, चांगली नोकरी चालू असताना, ‘शेती करतो’ म्हणणारा वेडाच म्हणायला हवा, नाही का? त्याचं असं झालं.

आयआयएममध्ये प्रत्येकाच्या डोक्यात एक किडा घुसवला जातो आणि तो म्हणजे स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा. त्यावेळेस अनेक ऑनलाइन आणि सेवा क्षेत्रातील व्यवसाय बहरत होते. कुठचा व्यवसाय सुरू करता येईल याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली, की देशातील 60 ते 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत; पण त्यांचं सकल राष्ट्रीय उत्पदनातलं योगदान फक्त 16 टक्के आहे. आज अनेक लोक शेतीमधून बाहेर पडत आहेत. शेती नकोच, नाहीच करणार असं म्हणणारे तरुण आहेत. ‘शेतकरी आत्महत्या’ ही समस्या तर हादरवून टाकत आहे. एक मोठा गंभीर प्रश्न मला पडला. जर 70 जनता जो व्यवसाय करत आहे तो नुकसानदायक असेल तर ती तो करणार नाहीच; पण मग आपल्याला अन्न कोण देणार? हा व्यवसाय एवढा मागे का  पडला? बरं, दुसरीकडे ग्राहकही समाधानी नाही. अन्न चांगलं मिळत नाही. रसायनयुक्त आणि भेसळयुक्त आपण खातो, असं अनेकजण म्हणतात.

दुसरीकडे आज आयआयटीमधून उच्चशिक्षित मुलं देशाबाहेर जातात त्याला आपण ब्रेनड्रेन होतंय असं म्हणतो. तेच अनेक वर्षे शेतीमध्ये होत आहे. उदाहरण पाहा, अनेक वर्षापूर्वी एका शेतकर्‍याची चार मुलं. त्यातील तीन मुलं  शहरामध्ये नोकरीसाठी गेली. उरला एक ज्यानं पारंपरिक पद्धतीची शेती तशीच चालू ठेवली. शिकलेसवरले ते शहरात पळू लागले. अशा प्रकारे कृषी व्यवसायातदेखील एक प्रकारचा ब्रेनड्रेन झाला. निसर्गावरच्या अवलंबित्वाला, राजकारण्यांच्या उदासीनतेला आणि व्यापार्‍यांच्या पुरवठा साखळीला दोष देतो. पण जर चांगली शिकलेली माणसं या क्षेत्रात आली तर?कृषी व्यवसाय शेतकर्‍यांना संपन्न करेल का? आपला बहुसंख्य समाज हालाखीच्या परिस्थितीतच आहे आणि नफा हा एकच उद्देश  डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात मोठय़ा कंपन्या येत आहेत; पण त्यानं शेतकर्‍यांचं जीवनमान  बदलणार नाही. व्यावसायिक आणि त्याचवेळी सामाजिक विचारदेखील करणारे, संवेदनशील लोक या क्षेत्रात उतरायला हवेत. पण हे सारं कुणी करायचं. मी स्वतर्‍लाच म्हटलं की तूच करून बघ! याच विचारानं माझ्या मनाची घट्ट पकड घेतली. आसपासची कुचेष्टा, टोमणे याकडे दुर्लक्ष करून मी शेवटी शेतीत उतरलो. 

माझी तीन स्पष्ट उद्दिष्ट होती. 1) माझ्या पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन चांगलं हवं.2) ती चांगल्या भावानं विकता यायला हवीत. 3) पहिले दोन मुद्दे सिद्ध झाले की बाकी  शेतकर्‍यांनाही त्याचा फायदा करून द्यायला हवा.

आज सात-आठ वर्षे झाली मी शेती करतोय. जैविक (ऑरगॅनिक) कृषी उत्पादनं सर्वोत्तम उत्पादन क्षमतेनं करण्याचा पहिला उद्देश साध्य झाला आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या उद्देशातदेखील, आसपासच्या शेतकर्‍यांच्या सहभागानं आणि अनेकांच्या मदतीमुळे आम्ही ‘पाटणकर फार्म प्रॉडक्ट्स’ची मध, जायफळ, मिरी, तूप, सुंठ इ. उत्पादनं ग्राहकांर्पयत पोहोचविण्यात समाधानकारक प्रगती केली आहे. ग्राहक आणि शेतकरी यांमध्ये एक अदृश्य भिंत असते ज्यामुळे ग्राहकांना शेतीत चांगलं-वाईट काय चालू आहे हे समजत नाही आणि  शेतकर्‍यांनादेखील ग्राहकांना नक्की काय हवंय, काय मिळतंय आणि मालाला भाव का नाही ते समजत नाही. मी शेती करणं, शेतमाल ग्राहकांर्पयत पोहोचवणं, तो विकणं आणि स्वतर्‍देखील शहरातील ग्राहक असल्यामुळे ही भिंत पारदर्शक करणं असा प्रयत्न मी करतो आहे. 

ते जमलं कसं, चुकलं काय, याविषयी पुढच्या लेखात...

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याIIT Mumbaiआयआयटी मुंबईSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूर