शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुमची स्ट्रॅटेजी काय?

By admin | Updated: July 28, 2016 17:46 IST

असं वाटणं वेगळं, पण त्यासाठी नेमकं करायचं काय हे माहिती असणं आणि ते करण्याची दिशा ठरवणं वेगळं ! ते कसं जमायचं?

 - डॉ. श्रुती पानसेआपण आयुष्यात लवकरात लवकर सेटल व्हावं असं कोणाला वाटत नाही?अगदी प्रत्येकाला वाटतंच की, आपलं जीवन आनंदात जावं. योग्य आणि मनाजोगतं शिक्षण आणि प्रगतीकडे नेणारं, आयुष्यच बदलून टाकणारं करिअर हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यादृष्टीनं प्रत्येकाचीच काही ना काही आखणी चालू असते. मात्र अनेकदा निर्णय घेता येत नाही. काहीतरी चुकतंय असं वाटत राहतं. कधी वाटा चुकतात, कधी अंदाज, तर कधी निर्णय. आणि मग पुढे जगण्याचा सारा ताळाच चुकत जातो. ‘वेंधळं हे... गोंधळलं’ अशी मनाची अवस्था होतेच. अगदी ‘याड लागल्या’सारखंही वाटतंच. या सगळ्या गोंधळातून आपण कसं शहाणं होणार? आपल्याला नक्की काय करायचंय हे कधी कळणार? की नाहीच कळणार? असं वाटत राहतं. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी हवी असते. आणि ती स्ट्रॅटेजी दुसरं कुणी आपल्यासाठी ठरवूच शकत नाही. ती आपण आपली ठरवायची असते. पण मग ही स्ट्रॅटेजी नेमकी ठरवायची कशी? तेच सांगणारा हा एक छोटासा गृहपाठ. तीनच गोष्टींचा!तेवढा करा, काही उत्तरं तुमची तुम्हालाच मिळून जातील, तीही अगदी सहज!१. ज्या गोष्टींविषयी मनात गोंधळ होतो आहे, त्या मनातल्या सर्वच्या सर्व गोष्टी कागदावर उतरवा. कागदावर गिचमिड झाली तरी चालेल. जरा वेळाने शांतपणे त्यावर विचार करायला घ्या. जी गोष्ट अयोग्य आहे असं वाटेल, त्यावर एकेक करून फुली मारा. कागदावर आता थोड्याच गोष्टी उरतील. त्यातही काही गोष्टी वजा करायच्या असतील तर त्या करा. समोर आपल्याला काय करायचं, यासाठीच्या काहीच गोष्टी उरतील! हा गृहपाठ केला, तर निर्णय घेणं सोपं होईल.२. या पहिल्या चाळणीतून जे काही उरलं असेल ते तुमचं ध्येय आहे का? विचारा स्वत:ला! ते तसं असेल, तर आपण ठरवलेलं ध्येय काळाशी सुसंगत आहे का, ते पाहा. आजच्या काळात तुम्ही जे करायचं म्हणतात ते ‘चालायला’ हवं. निर्णय घेताना भविष्याचा विचार कराच. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवाल ते तुमचं स्वत:चं हवं. मित्राला आवडतं, मैत्रिणीला आवडतं, अमुक एकानं सांगितलं, घरच्यांनी ठरवलं असं नको. तुम्हाला स्वत:ला वाटलं पाहिजे की हेच काम जे आपल्याला करायचं. हेच आपल्या व्यक्तिमत्त्वातलं बलस्थान. आणि इथंच आपण झोकून देऊन काम करू शकू. या टप्प्यापर्यंत आपलं आपल्याला येता आलं पाहिजे.३. काय करायचं हे ठरवणं तसं सोपंच असतं. पण ते कसं करायचं हे ठरवणं मात्र अवघड! कसं करायचं हे ठरवताना लागते ती स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे यशाकडे जाणाऱ्या पायऱ्या. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे असं म्हटल्यावर ती गोष्ट आपल्यासमोर हजर झाली, अगदी लगेच मिळाली असं कधी होत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. ठरवलेली गोष्ट झाली नाही की तिथेच मन खचायला सुरु वात होते. म्हणूनच जे करायचं आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्नदेखील कधी एका पद्धतीचे नसतात. प्रत्येक टप्प्यावर प्रयत्नांची दिशा बदलावी लागते. टिकून राहावं लागतं. स्वत:ला सिद्ध करावं लागतं. त्यामुळेच जे ठरवलं ते करण्याची धमक कमावणं हा सगळ्यात मोठा भाग, तो आपल्याकडे आहे का ते तपासा!(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)