शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तुमची स्ट्रॅटेजी काय?

By admin | Updated: July 28, 2016 17:46 IST

असं वाटणं वेगळं, पण त्यासाठी नेमकं करायचं काय हे माहिती असणं आणि ते करण्याची दिशा ठरवणं वेगळं ! ते कसं जमायचं?

 - डॉ. श्रुती पानसेआपण आयुष्यात लवकरात लवकर सेटल व्हावं असं कोणाला वाटत नाही?अगदी प्रत्येकाला वाटतंच की, आपलं जीवन आनंदात जावं. योग्य आणि मनाजोगतं शिक्षण आणि प्रगतीकडे नेणारं, आयुष्यच बदलून टाकणारं करिअर हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यादृष्टीनं प्रत्येकाचीच काही ना काही आखणी चालू असते. मात्र अनेकदा निर्णय घेता येत नाही. काहीतरी चुकतंय असं वाटत राहतं. कधी वाटा चुकतात, कधी अंदाज, तर कधी निर्णय. आणि मग पुढे जगण्याचा सारा ताळाच चुकत जातो. ‘वेंधळं हे... गोंधळलं’ अशी मनाची अवस्था होतेच. अगदी ‘याड लागल्या’सारखंही वाटतंच. या सगळ्या गोंधळातून आपण कसं शहाणं होणार? आपल्याला नक्की काय करायचंय हे कधी कळणार? की नाहीच कळणार? असं वाटत राहतं. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी हवी असते. आणि ती स्ट्रॅटेजी दुसरं कुणी आपल्यासाठी ठरवूच शकत नाही. ती आपण आपली ठरवायची असते. पण मग ही स्ट्रॅटेजी नेमकी ठरवायची कशी? तेच सांगणारा हा एक छोटासा गृहपाठ. तीनच गोष्टींचा!तेवढा करा, काही उत्तरं तुमची तुम्हालाच मिळून जातील, तीही अगदी सहज!१. ज्या गोष्टींविषयी मनात गोंधळ होतो आहे, त्या मनातल्या सर्वच्या सर्व गोष्टी कागदावर उतरवा. कागदावर गिचमिड झाली तरी चालेल. जरा वेळाने शांतपणे त्यावर विचार करायला घ्या. जी गोष्ट अयोग्य आहे असं वाटेल, त्यावर एकेक करून फुली मारा. कागदावर आता थोड्याच गोष्टी उरतील. त्यातही काही गोष्टी वजा करायच्या असतील तर त्या करा. समोर आपल्याला काय करायचं, यासाठीच्या काहीच गोष्टी उरतील! हा गृहपाठ केला, तर निर्णय घेणं सोपं होईल.२. या पहिल्या चाळणीतून जे काही उरलं असेल ते तुमचं ध्येय आहे का? विचारा स्वत:ला! ते तसं असेल, तर आपण ठरवलेलं ध्येय काळाशी सुसंगत आहे का, ते पाहा. आजच्या काळात तुम्ही जे करायचं म्हणतात ते ‘चालायला’ हवं. निर्णय घेताना भविष्याचा विचार कराच. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवाल ते तुमचं स्वत:चं हवं. मित्राला आवडतं, मैत्रिणीला आवडतं, अमुक एकानं सांगितलं, घरच्यांनी ठरवलं असं नको. तुम्हाला स्वत:ला वाटलं पाहिजे की हेच काम जे आपल्याला करायचं. हेच आपल्या व्यक्तिमत्त्वातलं बलस्थान. आणि इथंच आपण झोकून देऊन काम करू शकू. या टप्प्यापर्यंत आपलं आपल्याला येता आलं पाहिजे.३. काय करायचं हे ठरवणं तसं सोपंच असतं. पण ते कसं करायचं हे ठरवणं मात्र अवघड! कसं करायचं हे ठरवताना लागते ती स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे यशाकडे जाणाऱ्या पायऱ्या. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे असं म्हटल्यावर ती गोष्ट आपल्यासमोर हजर झाली, अगदी लगेच मिळाली असं कधी होत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. ठरवलेली गोष्ट झाली नाही की तिथेच मन खचायला सुरु वात होते. म्हणूनच जे करायचं आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्नदेखील कधी एका पद्धतीचे नसतात. प्रत्येक टप्प्यावर प्रयत्नांची दिशा बदलावी लागते. टिकून राहावं लागतं. स्वत:ला सिद्ध करावं लागतं. त्यामुळेच जे ठरवलं ते करण्याची धमक कमावणं हा सगळ्यात मोठा भाग, तो आपल्याकडे आहे का ते तपासा!(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)