शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपुरतं शिक्षण, नोकरीपुरती डिग्री यापलिकडे जगण्याचं ध्येय काय? -वाचा ही 6 सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:29 IST

करिअरसाठी, जॉब्जसाठी अभ्यास तरुण मुलं करतात. ते करताना माहिती मिळते, हाताला कौशल्यही मिळतात. पण जगण्याचा, आपण जे काम करणार ते काम करण्याचा हेतू? उद्देश? पर्पज? त्याचं काय? ते कसं शोधणार?

ठळक मुद्देआपण जे काम करतो, त्याचा समाजाला उपयोग होतो का, त्यातून समाधान-आनंद मिळतो का?- विचारा स्वत:ला..

-अमृत बंग

मी गडचिरोलीलाच शिकलो. दहावीपर्यंत शाळेत गेलो नाही. बर्‍यापैकी होम-स्कूल्ड होतो. माझी एक धारणा पक्की झाली की, शिक्षण ही व्यक्तीची स्वतर्‍ची प्राथमिक जबाबदारी आहे. मला आठवतं की माझ्या बाबांनी एकदा मला एक खूप सुंदर सूत्र सांगितलं होतं. ते मला असं म्हणाले होते की, सहसा आपण म्हणतो की, वाचाल तर वाचाल, वाचणार नाही तर कसं तू परीक्षेत नापास होशील, हे होईल, ते होईल. जणू काही वाचण्यासाठी भीती हीच प्रेरणा. अपयशाची भीती आणि जर अपयशी व्हायचं नसेल तर वाचा. अशा प्रकारे आपण नेहमी वाचण्याकडे आणि शिक्षणाकडे बघतो. तर बाबा मला एकदा गमतीत म्हणाले होते की, ‘‘अरे वाच - वाच नाहीतर असाच पास होत जाशील’’. तर तो एक सुंदर मानसिक बदल होता. वाचन हे आनंददायी आणि स्वतर्‍ला प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे हे तेव्हा कळलं. ती गोष्ट सगळ्याच शिक्षणाला लागू होते. मी जेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात गेलो, तेव्हा मला स्वतर्‍च्या बाबतीतदेखील काही गोष्टी जाणवल्या. मला इतर अनेक तरुण मित्रमैत्रिणी जे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये होते त्यांच्याशी जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्यांच्याही बाबतीत एक गोष्ट घडताना दिसली. ती काय? ती अशी की काही दुर्मीळ अपवादवगळता, आपल्याकडचं बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण हे मोठय़ा प्रमाणात माहिती देतं, क्वचितप्रसंगी कौशल्य देतं; पण एक गोष्ट जवळपास कधीच देत नाही ती म्हणजे हेतू किंवा पर्पज.मला मिळालेली माहिती किंवा कौशल्य (दुर्दैवाने ते कमीच मिळतं) याचा उपयोग मी कोणासाठी करू? कशासाठी करू? याचं उत्तर सहसा आपल्या नेहमीच्या शिक्षणपद्धतीमध्ये मिळत नाही. जर ते आपण स्वतर्‍हून शोधलं नाही तर मग भाडय़ाची उत्तरं मिळवली जातात. जसं की ज्या  प्लेसमेंटला, पॅकेजला, करिअर ट्रॅकला सध्या समाजात वाव आहे, तेच मी करायचं अशी एक आंधळी मनोवृत्ती बळावताना दिसते. हे माझ्या मते धोकादायक आहे. म्हणूनच मला असं वाटतं की पर्पज किंवा हेतू मिळणं हे तरुण म्हणून आपल्या जीवनाचं एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जेव्हा तरुण मुलंमुली आपला हेतू शोधतात तेव्हा त्याच्यामुळे नेमकेपणा येतो. हे सगळं शेवटी कशासाठी, याचं उत्तर मिळायला मदत होते, त्याच्यामुळे अर्थातच आपल्या जीवनाचं सुकाणू हे असं भरकटत नाही. सगळ्या कामाला, तयारीला एक विशिष्ट धार येते, स्पष्टता येते.माझं संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण झाल्यानंतर सिमॅन्टेक नावाच्या कंपनीमध्ये काही काळ काम केलं. मजेशीर जॉब होता, भरपूर पगार होता. थोडक्यात एका अतिशय मोठय़ा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे काही अतिशय लाडावणारं वातावरण असतं, तशा प्रकारचं सगळं होतं. पण मनात प्रश्न उपस्थित झाले हे सगळं मी का करतोय? याचा उपयोग नेमका कोणाला आहे? मी समाजाला काही देणं लागतो का?समाजासाठी काहीतरी करणं ही सामाजिक संस्थांची, सामाजिक कार्यकत्र्याची जबाबदारी आहे असं सहसा आपण मानतो.  पण तसं केलं तर मी स्वतर्‍ काय करायला पाहिजे हे आपल्याला स्पष्ट होणार नाही.त्यामुळे करिअरला सुरुवात करणार्‍या, काहीतरी वेगळं करू म्हणणार्‍या तरुण मुलांशी आपल्या कामाचा पर्पज शोधताना सोबत असावे, समाजासाठी आपण काही करावं, असं वाटत असताना हे काही मुद्दे समोर असावेत.

 1. सेवा.ज्या ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही आणि ज्या ठिकाणी खासगी क्षेत्र पोहोचू इच्छीत नाही, अशा ठिकाणी जीवनावश्यक सेवा पुरवणं. उदाहरणार्थ, अतिशय दुर्गम आदिवासी भाग असेल किंवा एखादी शहरातली झोपडपट्टी असेल. खासगी क्षेत्र सहसा अशा ठिकाणी स्वतर्‍हून बरेचदा जात नाहीत कारण या काही नफा कमावण्याची संधी असलेल्या जागा नसतात. म्हणून खासगी क्षेत्राला तिथे जाण्यामध्ये नैसर्गिक रस नसतो. शासनाची ती जबाबदारी असते; पण बरेचदा शासन पोहोचूच शकत नाही कारण त्यांच्याकडे तसं मनुष्यबळ हे सापडत नाही किंवा ज्याला लास्ट मॅन डिलिव्हरी प्रॉब्लेम म्हणतात, सगळ्यात शेवटच्या क्षणाला जाऊन आणि त्या टप्प्याला जाऊन डिलिव्हरी करणं हे होत नाही. अशा ठिकाणी सेवा देणं हे सामाजिक क्षेत्राचं महत्त्वाचं काम आहे. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर बर्‍याचदा अशा लोकांच्याविषयी आपल्याला खूप छान वाटतं की ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गरजू लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे. सेवा पुरवणे ही खासगी क्षेत्राची मानसिकता आहे. सेवा करणे ही सामाजिक क्षेत्राची मानसिकता आहे. मी निव्वळ सेवा पुरवली आता तुझं काय झालं मला घेणं देणं नाही असं म्हणून सामाजिक क्षेत्राला चालणार नाही. त्या सेवेद्वारे त्या माणसाचं दुर्‍ख दूर होतंय का, हे बघणं सामाजिक क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचं असेल.2. व्यक्तींना सक्षम करणं‘एंपावर’ हा शब्दच बघा, ‘पावर’पासून आलेला आहे. खासगी क्षेत्राकडे आर्थिक पावर आहे. शासकीय क्षेत्राकडे राजकीय, नोकरशाहीची, संसाधन वाटपाची पावर आहे. सहसा असं दिसेल की हे दोन्ही क्षेत्रं त्या शक्तीला पकडून ठेवतात. नागरिकांनी निव्वळ मतदार किंवा निव्वळ ग्राहक बनून राहावं, बाकीचं आम्ही बघून घेऊ, अशा प्रकारची मानसिकता सहसा दिसते. अर्थात दुर्मीळ अपवाद आहेतच.हे शक्तीचे असंतुलन दूर करून लोकांना सक्षम करणं, जेणेकरून ते स्वतर्‍ त्यांचे प्रश्न सोडवू शकतील किंवा स्वतर्‍ त्यांच्या जीवनाचा सुकाणू हातात घेऊ शकतील. अशा प्रकारचे माणसांचे सक्षमीकरण करणं. म्हणून मी परत म्हणेन की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, हे बघायला पाहिजे की माझ्या कामाच्या द्वारे मी निव्वळ परावलंबित्व पैदा करतोय की ज्या कोणासोबत काम करतोय त्यांच्यामध्ये काही आंतरिक बदल, क्षमता विकास घडवून आणतो आहे.3. नावीन्यपूर्ण प्रयोगम्हणजे आपल्या अवतीभवती जे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक व तांत्रिक प्रश्न आहेत यांच्यावर नावीन्यपूर्ण उपाय काढणे, नवनवीन पायलट करणे. एक वेगळा, सर्जनात्मक आणि सृजनात्मक विचार करून आपल्या अवतीभवतीचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन मॉडेल किंवा पद्धत तयार करणे अतिशय आवश्यक आहे. यामध्ये मात्र एक काळजी घ्यायला पाहिजे. जिथे आपलं भारतीय मानस मला वाटतं बर्‍याचदा आळशीपणा करतं. ते म्हणजे फार चटकन यशाचा दावा करणं. आपण थोडं काहीतरी करतो आणि लगेच त्याला हे यशस्वी मॉडेल आहे, असं म्हणून प्रस्तृत करायला जातो. ही मला असं वाटतं की एकतर पळवाट आहे आणि दुसरं म्हणजे हा बौद्धिक प्रामाणिकपणा नाही. 

4.  व्हिसल ब्लोअर समाजामध्ये जेव्हा जिथे अन्याय घडत असेल, मग तो पर्यावरणावर असेल, व्यक्तींवर असेल, प्राण्यांवर असेल, अशा अन्यायाला वाचा फोडणे आणि जागल्या म्हणून काम करणे, ही सामाजिक क्षेत्राची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आपण निदान आपल्या टप्प्यात तरी जागल्या व्हायला हवं.

5. पण मी काय करू?आपल्या समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की, मी इतरांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ही खरं तर अतिशय आशादायक गोष्ट आहे. पण ते इतर कोण? त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार? पैसे, वेळ, जेवण, कपडे देणार की अख्ख जीवन देणार? हे फरक असू शकतात. पण इतरांसाठी आपण काही करतोय असं मनात न आणता, आपल्या समाधानासाठी आणि गरजूंना मदत म्हणून त्यांच्या गरजेचं ते करायला हवं. गरज आणि गरजू यांच्यातला पूल बना.

6. मूल्य.शेवटचा मुद्दा हा मूल्यात्मक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कितीही कृती केल्या तरी त्या कृतीचा आवाका हा काही प्रमाणात का होईना मर्यादित राहणार आहे. छोटी माणसं आहोत. मात्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या कामातून आपण कुठली वृत्ती प्रसारित करतो हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली मूल्य कोणती, ती आपल्या कृतीतून दिसतात का, हे स्वतर्‍ला विचारणं फार महत्त्वाचं आहे.

निर्माण या  उपक्रमाचे  संचालक 

https://nirman.mkcl.org/