-अमृत बंग
मी गडचिरोलीलाच शिकलो. दहावीपर्यंत शाळेत गेलो नाही. बर्यापैकी होम-स्कूल्ड होतो. माझी एक धारणा पक्की झाली की, शिक्षण ही व्यक्तीची स्वतर्ची प्राथमिक जबाबदारी आहे. मला आठवतं की माझ्या बाबांनी एकदा मला एक खूप सुंदर सूत्र सांगितलं होतं. ते मला असं म्हणाले होते की, सहसा आपण म्हणतो की, वाचाल तर वाचाल, वाचणार नाही तर कसं तू परीक्षेत नापास होशील, हे होईल, ते होईल. जणू काही वाचण्यासाठी भीती हीच प्रेरणा. अपयशाची भीती आणि जर अपयशी व्हायचं नसेल तर वाचा. अशा प्रकारे आपण नेहमी वाचण्याकडे आणि शिक्षणाकडे बघतो. तर बाबा मला एकदा गमतीत म्हणाले होते की, ‘‘अरे वाच - वाच नाहीतर असाच पास होत जाशील’’. तर तो एक सुंदर मानसिक बदल होता. वाचन हे आनंददायी आणि स्वतर्ला प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे हे तेव्हा कळलं. ती गोष्ट सगळ्याच शिक्षणाला लागू होते. मी जेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात गेलो, तेव्हा मला स्वतर्च्या बाबतीतदेखील काही गोष्टी जाणवल्या. मला इतर अनेक तरुण मित्रमैत्रिणी जे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये होते त्यांच्याशी जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्यांच्याही बाबतीत एक गोष्ट घडताना दिसली. ती काय? ती अशी की काही दुर्मीळ अपवादवगळता, आपल्याकडचं बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण हे मोठय़ा प्रमाणात माहिती देतं, क्वचितप्रसंगी कौशल्य देतं; पण एक गोष्ट जवळपास कधीच देत नाही ती म्हणजे हेतू किंवा पर्पज.मला मिळालेली माहिती किंवा कौशल्य (दुर्दैवाने ते कमीच मिळतं) याचा उपयोग मी कोणासाठी करू? कशासाठी करू? याचं उत्तर सहसा आपल्या नेहमीच्या शिक्षणपद्धतीमध्ये मिळत नाही. जर ते आपण स्वतर्हून शोधलं नाही तर मग भाडय़ाची उत्तरं मिळवली जातात. जसं की ज्या प्लेसमेंटला, पॅकेजला, करिअर ट्रॅकला सध्या समाजात वाव आहे, तेच मी करायचं अशी एक आंधळी मनोवृत्ती बळावताना दिसते. हे माझ्या मते धोकादायक आहे. म्हणूनच मला असं वाटतं की पर्पज किंवा हेतू मिळणं हे तरुण म्हणून आपल्या जीवनाचं एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जेव्हा तरुण मुलंमुली आपला हेतू शोधतात तेव्हा त्याच्यामुळे नेमकेपणा येतो. हे सगळं शेवटी कशासाठी, याचं उत्तर मिळायला मदत होते, त्याच्यामुळे अर्थातच आपल्या जीवनाचं सुकाणू हे असं भरकटत नाही. सगळ्या कामाला, तयारीला एक विशिष्ट धार येते, स्पष्टता येते.माझं संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण झाल्यानंतर सिमॅन्टेक नावाच्या कंपनीमध्ये काही काळ काम केलं. मजेशीर जॉब होता, भरपूर पगार होता. थोडक्यात एका अतिशय मोठय़ा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे काही अतिशय लाडावणारं वातावरण असतं, तशा प्रकारचं सगळं होतं. पण मनात प्रश्न उपस्थित झाले हे सगळं मी का करतोय? याचा उपयोग नेमका कोणाला आहे? मी समाजाला काही देणं लागतो का?समाजासाठी काहीतरी करणं ही सामाजिक संस्थांची, सामाजिक कार्यकत्र्याची जबाबदारी आहे असं सहसा आपण मानतो. पण तसं केलं तर मी स्वतर् काय करायला पाहिजे हे आपल्याला स्पष्ट होणार नाही.त्यामुळे करिअरला सुरुवात करणार्या, काहीतरी वेगळं करू म्हणणार्या तरुण मुलांशी आपल्या कामाचा पर्पज शोधताना सोबत असावे, समाजासाठी आपण काही करावं, असं वाटत असताना हे काही मुद्दे समोर असावेत.
5. पण मी काय करू?आपल्या समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की, मी इतरांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ही खरं तर अतिशय आशादायक गोष्ट आहे. पण ते इतर कोण? त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार? पैसे, वेळ, जेवण, कपडे देणार की अख्ख जीवन देणार? हे फरक असू शकतात. पण इतरांसाठी आपण काही करतोय असं मनात न आणता, आपल्या समाधानासाठी आणि गरजूंना मदत म्हणून त्यांच्या गरजेचं ते करायला हवं. गरज आणि गरजू यांच्यातला पूल बना.
6. मूल्य.शेवटचा मुद्दा हा मूल्यात्मक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कितीही कृती केल्या तरी त्या कृतीचा आवाका हा काही प्रमाणात का होईना मर्यादित राहणार आहे. छोटी माणसं आहोत. मात्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या कामातून आपण कुठली वृत्ती प्रसारित करतो हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली मूल्य कोणती, ती आपल्या कृतीतून दिसतात का, हे स्वतर्ला विचारणं फार महत्त्वाचं आहे.
निर्माण या उपक्रमाचे संचालक
https://nirman.mkcl.org/