शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

राहिलं उपाशीपोटी, त्यानं असा काय फरक पडतो?

By admin | Updated: April 8, 2017 18:37 IST

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे.

-वैद्य राजश्री कुलकर्णी

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे. कॉँटिनेंटल फूड, बेकरीचे पदार्थ , हॉटेलिंग या गोष्टी खूप सहज आपल्या आहारात समाविष्ट झाल्या आहेत. टोन्ड फूड, कॅन्ड फूड, प्रोसेस्ड फूड हे अगदी रोज आपल्या वापरात येऊ लागलं आहे. प्रिझरवेटिव्हज, फ्रीज यांचा अन्न टिकवण्यासाठी वापर वाढला आहे. एकीकडे अन्नधान्य , भाजीपाला , फळे पिकवताना कीटकनाशक फवारे , खते यांचाही वापर खूपच जास्त झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो आहे . आम्लपित्तापासून अनेक प्रकारच्या तक्र ारी अनेक जणांना नियमित जाणवत असतात . त्वचारोग त्रास देतात आणि इतर काही गंभीर आजार होण्याची शक्यताही बळावते, पण गेल्या काही वर्षात सगळ्या वयोगटात भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उपाशी राहण्याची !!कॉलेजला जाणारी बहुसंख्य मुलं फॅशन म्हणून डबा नेत नाहीत , त्यांना लाज वाटते. मग दोन पर्याय उपलब्ध असतात , एक तर बाहेरचं खायचं किंवा उपाशी राहायचं !! दोन्हीही तेवढेच घातक आहेत.जे मजा म्हणून, चैन म्हणून किंवा परवडतं म्हणून बाहेर खातात त्यांना इतर त्रास सुरु होतात . कमी वयात अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी , मलबद्धता अशा तक्र ारी निर्माण होतात . नोकरी करणारे लोक जर उपाशीपोटी कामावर गेले तर असे त्रास होतातच, शिवाय कामात लक्ष न लागणे, चिडचिड आणि वाद निर्माण होणे असं होऊ शकतं . यांचा संबंध भुकेशी किंवा उपाशी राहण्याशी असू शकतो असं आपल्याला दुरान्वयानेही वाटत नाही, पण तो तसा निश्चितपणे असतो .त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडताना खाऊनच जाईल हे पाहणे ही गृहिणीची मोठी जबाबदारीच आहे .अगदी शाळेत जाणारी लहान मुले देखील उठून , आवरून तशीच शाळेत निघून जातात. काहीही न खाता पिता !!दूध पचत नाही दुधाने मळमळ होते , पोट फुगते अशा अनेक तक्र ारी आईबाबा सांगतात . दुसरं काही खायला द्यावं तर ही मुलं सकाळी इतकी लवकर घराबाहेर पडतात की उठल्यानंतर भुकेची जाणीव होईपर्यंत शाळेत पोचलेली असतात . याचा परिणाम असा होतो की रात्री कधीतरी सात आठ वाजता ही मुलं एकदा जेवली की साधारण बारा तेरा तासांनी शाळेत ब्रेकफास्टची सुट्टी होईपर्यंत उपाशीच राहतात . सगळ्यात घातक परिणाम म्हणजे उपाशीपोटी कोणत्याही स्वरु पाची इन्फेक्शन्स, संसर्ग मुलांना पट्कन होण्याची शक्यता असते . त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात . सर्दी , ताप , खोकला असं सतत सुरु असतं, त्यामुळे शालेय वयातील कोणतीही मुलं उपाशी शाळेत जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी .खूप पोटभर जरी खाल्लं नाही तरी निदान हलका नाश्ता तरी केलेला आहे, सुट्टीत खाण्यासाठी व्यविस्थत डबा घेतलेला आहे, हे आवर्जून बघायलाच हवं . शेवटी संपूर्ण घरादाराचे आरोग्य घरातल्या स्त्रीच्याच हातात असते, पण हे सगळं करताना आपण स्वत:देखील आठवणीने खायला हवे, उपाशी राहू नये तरच आपलेही आरोग्य टिकेल हे ध्यानात ठेवावे .