शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

राहिलं उपाशीपोटी, त्यानं असा काय फरक पडतो?

By admin | Updated: April 8, 2017 18:37 IST

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे.

-वैद्य राजश्री कुलकर्णी

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे. कॉँटिनेंटल फूड, बेकरीचे पदार्थ , हॉटेलिंग या गोष्टी खूप सहज आपल्या आहारात समाविष्ट झाल्या आहेत. टोन्ड फूड, कॅन्ड फूड, प्रोसेस्ड फूड हे अगदी रोज आपल्या वापरात येऊ लागलं आहे. प्रिझरवेटिव्हज, फ्रीज यांचा अन्न टिकवण्यासाठी वापर वाढला आहे. एकीकडे अन्नधान्य , भाजीपाला , फळे पिकवताना कीटकनाशक फवारे , खते यांचाही वापर खूपच जास्त झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो आहे . आम्लपित्तापासून अनेक प्रकारच्या तक्र ारी अनेक जणांना नियमित जाणवत असतात . त्वचारोग त्रास देतात आणि इतर काही गंभीर आजार होण्याची शक्यताही बळावते, पण गेल्या काही वर्षात सगळ्या वयोगटात भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उपाशी राहण्याची !!कॉलेजला जाणारी बहुसंख्य मुलं फॅशन म्हणून डबा नेत नाहीत , त्यांना लाज वाटते. मग दोन पर्याय उपलब्ध असतात , एक तर बाहेरचं खायचं किंवा उपाशी राहायचं !! दोन्हीही तेवढेच घातक आहेत.जे मजा म्हणून, चैन म्हणून किंवा परवडतं म्हणून बाहेर खातात त्यांना इतर त्रास सुरु होतात . कमी वयात अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी , मलबद्धता अशा तक्र ारी निर्माण होतात . नोकरी करणारे लोक जर उपाशीपोटी कामावर गेले तर असे त्रास होतातच, शिवाय कामात लक्ष न लागणे, चिडचिड आणि वाद निर्माण होणे असं होऊ शकतं . यांचा संबंध भुकेशी किंवा उपाशी राहण्याशी असू शकतो असं आपल्याला दुरान्वयानेही वाटत नाही, पण तो तसा निश्चितपणे असतो .त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडताना खाऊनच जाईल हे पाहणे ही गृहिणीची मोठी जबाबदारीच आहे .अगदी शाळेत जाणारी लहान मुले देखील उठून , आवरून तशीच शाळेत निघून जातात. काहीही न खाता पिता !!दूध पचत नाही दुधाने मळमळ होते , पोट फुगते अशा अनेक तक्र ारी आईबाबा सांगतात . दुसरं काही खायला द्यावं तर ही मुलं सकाळी इतकी लवकर घराबाहेर पडतात की उठल्यानंतर भुकेची जाणीव होईपर्यंत शाळेत पोचलेली असतात . याचा परिणाम असा होतो की रात्री कधीतरी सात आठ वाजता ही मुलं एकदा जेवली की साधारण बारा तेरा तासांनी शाळेत ब्रेकफास्टची सुट्टी होईपर्यंत उपाशीच राहतात . सगळ्यात घातक परिणाम म्हणजे उपाशीपोटी कोणत्याही स्वरु पाची इन्फेक्शन्स, संसर्ग मुलांना पट्कन होण्याची शक्यता असते . त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात . सर्दी , ताप , खोकला असं सतत सुरु असतं, त्यामुळे शालेय वयातील कोणतीही मुलं उपाशी शाळेत जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी .खूप पोटभर जरी खाल्लं नाही तरी निदान हलका नाश्ता तरी केलेला आहे, सुट्टीत खाण्यासाठी व्यविस्थत डबा घेतलेला आहे, हे आवर्जून बघायलाच हवं . शेवटी संपूर्ण घरादाराचे आरोग्य घरातल्या स्त्रीच्याच हातात असते, पण हे सगळं करताना आपण स्वत:देखील आठवणीने खायला हवे, उपाशी राहू नये तरच आपलेही आरोग्य टिकेल हे ध्यानात ठेवावे .