शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

राहिलं उपाशीपोटी, त्यानं असा काय फरक पडतो?

By admin | Updated: April 8, 2017 18:37 IST

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे.

-वैद्य राजश्री कुलकर्णी

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे. कॉँटिनेंटल फूड, बेकरीचे पदार्थ , हॉटेलिंग या गोष्टी खूप सहज आपल्या आहारात समाविष्ट झाल्या आहेत. टोन्ड फूड, कॅन्ड फूड, प्रोसेस्ड फूड हे अगदी रोज आपल्या वापरात येऊ लागलं आहे. प्रिझरवेटिव्हज, फ्रीज यांचा अन्न टिकवण्यासाठी वापर वाढला आहे. एकीकडे अन्नधान्य , भाजीपाला , फळे पिकवताना कीटकनाशक फवारे , खते यांचाही वापर खूपच जास्त झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो आहे . आम्लपित्तापासून अनेक प्रकारच्या तक्र ारी अनेक जणांना नियमित जाणवत असतात . त्वचारोग त्रास देतात आणि इतर काही गंभीर आजार होण्याची शक्यताही बळावते, पण गेल्या काही वर्षात सगळ्या वयोगटात भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उपाशी राहण्याची !!कॉलेजला जाणारी बहुसंख्य मुलं फॅशन म्हणून डबा नेत नाहीत , त्यांना लाज वाटते. मग दोन पर्याय उपलब्ध असतात , एक तर बाहेरचं खायचं किंवा उपाशी राहायचं !! दोन्हीही तेवढेच घातक आहेत.जे मजा म्हणून, चैन म्हणून किंवा परवडतं म्हणून बाहेर खातात त्यांना इतर त्रास सुरु होतात . कमी वयात अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी , मलबद्धता अशा तक्र ारी निर्माण होतात . नोकरी करणारे लोक जर उपाशीपोटी कामावर गेले तर असे त्रास होतातच, शिवाय कामात लक्ष न लागणे, चिडचिड आणि वाद निर्माण होणे असं होऊ शकतं . यांचा संबंध भुकेशी किंवा उपाशी राहण्याशी असू शकतो असं आपल्याला दुरान्वयानेही वाटत नाही, पण तो तसा निश्चितपणे असतो .त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडताना खाऊनच जाईल हे पाहणे ही गृहिणीची मोठी जबाबदारीच आहे .अगदी शाळेत जाणारी लहान मुले देखील उठून , आवरून तशीच शाळेत निघून जातात. काहीही न खाता पिता !!दूध पचत नाही दुधाने मळमळ होते , पोट फुगते अशा अनेक तक्र ारी आईबाबा सांगतात . दुसरं काही खायला द्यावं तर ही मुलं सकाळी इतकी लवकर घराबाहेर पडतात की उठल्यानंतर भुकेची जाणीव होईपर्यंत शाळेत पोचलेली असतात . याचा परिणाम असा होतो की रात्री कधीतरी सात आठ वाजता ही मुलं एकदा जेवली की साधारण बारा तेरा तासांनी शाळेत ब्रेकफास्टची सुट्टी होईपर्यंत उपाशीच राहतात . सगळ्यात घातक परिणाम म्हणजे उपाशीपोटी कोणत्याही स्वरु पाची इन्फेक्शन्स, संसर्ग मुलांना पट्कन होण्याची शक्यता असते . त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात . सर्दी , ताप , खोकला असं सतत सुरु असतं, त्यामुळे शालेय वयातील कोणतीही मुलं उपाशी शाळेत जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी .खूप पोटभर जरी खाल्लं नाही तरी निदान हलका नाश्ता तरी केलेला आहे, सुट्टीत खाण्यासाठी व्यविस्थत डबा घेतलेला आहे, हे आवर्जून बघायलाच हवं . शेवटी संपूर्ण घरादाराचे आरोग्य घरातल्या स्त्रीच्याच हातात असते, पण हे सगळं करताना आपण स्वत:देखील आठवणीने खायला हवे, उपाशी राहू नये तरच आपलेही आरोग्य टिकेल हे ध्यानात ठेवावे .