शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

राहिलं उपाशीपोटी, त्यानं असा काय फरक पडतो?

By admin | Updated: April 8, 2017 18:37 IST

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे.

-वैद्य राजश्री कुलकर्णी

आरोग्य आणि आजार या दोन्ही गोष्टींत आहार हा घटक खूप महत्वाचा आहे .गेल्या साधारण आठ-दहा वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे. कॉँटिनेंटल फूड, बेकरीचे पदार्थ , हॉटेलिंग या गोष्टी खूप सहज आपल्या आहारात समाविष्ट झाल्या आहेत. टोन्ड फूड, कॅन्ड फूड, प्रोसेस्ड फूड हे अगदी रोज आपल्या वापरात येऊ लागलं आहे. प्रिझरवेटिव्हज, फ्रीज यांचा अन्न टिकवण्यासाठी वापर वाढला आहे. एकीकडे अन्नधान्य , भाजीपाला , फळे पिकवताना कीटकनाशक फवारे , खते यांचाही वापर खूपच जास्त झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो आहे . आम्लपित्तापासून अनेक प्रकारच्या तक्र ारी अनेक जणांना नियमित जाणवत असतात . त्वचारोग त्रास देतात आणि इतर काही गंभीर आजार होण्याची शक्यताही बळावते, पण गेल्या काही वर्षात सगळ्या वयोगटात भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उपाशी राहण्याची !!कॉलेजला जाणारी बहुसंख्य मुलं फॅशन म्हणून डबा नेत नाहीत , त्यांना लाज वाटते. मग दोन पर्याय उपलब्ध असतात , एक तर बाहेरचं खायचं किंवा उपाशी राहायचं !! दोन्हीही तेवढेच घातक आहेत.जे मजा म्हणून, चैन म्हणून किंवा परवडतं म्हणून बाहेर खातात त्यांना इतर त्रास सुरु होतात . कमी वयात अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी , मलबद्धता अशा तक्र ारी निर्माण होतात . नोकरी करणारे लोक जर उपाशीपोटी कामावर गेले तर असे त्रास होतातच, शिवाय कामात लक्ष न लागणे, चिडचिड आणि वाद निर्माण होणे असं होऊ शकतं . यांचा संबंध भुकेशी किंवा उपाशी राहण्याशी असू शकतो असं आपल्याला दुरान्वयानेही वाटत नाही, पण तो तसा निश्चितपणे असतो .त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडताना खाऊनच जाईल हे पाहणे ही गृहिणीची मोठी जबाबदारीच आहे .अगदी शाळेत जाणारी लहान मुले देखील उठून , आवरून तशीच शाळेत निघून जातात. काहीही न खाता पिता !!दूध पचत नाही दुधाने मळमळ होते , पोट फुगते अशा अनेक तक्र ारी आईबाबा सांगतात . दुसरं काही खायला द्यावं तर ही मुलं सकाळी इतकी लवकर घराबाहेर पडतात की उठल्यानंतर भुकेची जाणीव होईपर्यंत शाळेत पोचलेली असतात . याचा परिणाम असा होतो की रात्री कधीतरी सात आठ वाजता ही मुलं एकदा जेवली की साधारण बारा तेरा तासांनी शाळेत ब्रेकफास्टची सुट्टी होईपर्यंत उपाशीच राहतात . सगळ्यात घातक परिणाम म्हणजे उपाशीपोटी कोणत्याही स्वरु पाची इन्फेक्शन्स, संसर्ग मुलांना पट्कन होण्याची शक्यता असते . त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात . सर्दी , ताप , खोकला असं सतत सुरु असतं, त्यामुळे शालेय वयातील कोणतीही मुलं उपाशी शाळेत जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी .खूप पोटभर जरी खाल्लं नाही तरी निदान हलका नाश्ता तरी केलेला आहे, सुट्टीत खाण्यासाठी व्यविस्थत डबा घेतलेला आहे, हे आवर्जून बघायलाच हवं . शेवटी संपूर्ण घरादाराचे आरोग्य घरातल्या स्त्रीच्याच हातात असते, पण हे सगळं करताना आपण स्वत:देखील आठवणीने खायला हवे, उपाशी राहू नये तरच आपलेही आरोग्य टिकेल हे ध्यानात ठेवावे .