शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
3
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
4
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
5
डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
6
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
7
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
8
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
9
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
10
Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो
11
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
12
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
13
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
14
एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
15
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
16
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
17
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
18
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
19
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
20
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात तरुण शिक्षकांनी नेमकं काय करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:40 IST

आव्हान तरुण शिक्षकांसमोरही आहे, नव्या पद्धतीनं शिकवण्याचं, नव्या स्मार्ट काळात विद्याथ्र्याना नव्या रीतीने शिकवण्याचं. नोकरी टिकवण्यापलीकडे पॅशन जगण्याचं. ते कसं जमावं?

ठळक मुद्देविद्याथ्र्यानी शिक्षणाचा निर्मिती आणि वॅल्यू क्रि एशनशी संबंध लावला पाहिजे तरच येत्या काळात टिकून राहता येईल.

- डॉ. राम ताकवले 

1) कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण अचानक स्वीकारावे लागले. आदिवासी, दुर्गम भागातील अनेक तरुण शिक्षक जिवाचा आटापिटा करून ऑनलाइन शिकवणं स्वीकारत आहेत, या तरुण शिक्षकांना तुम्ही काय सांगाल?ज्यावेळेला आपण एका युगातून दुसर्‍या  युगात जातो, तेव्हा हे असं होतंच. हा लास्ट माईल प्रॉब्लेम  उद्भवतच राहतो. प्रतीकात्मकरीत्या बोलायचं, तर मोठय़ा शहरात पोहोचण्याचे रस्ते चांगले, गुळगुळीत, डांबरी असतात. लहान वाडय़ावस्तीवर जायच्या वाटा मात्न दुर्गम, खाचखळग्याच्या. तिथे पोहोचणं अवघड होऊन बसतं. हा सगळा संक्रमणाचा काळ असल्याने एकाच वेळेला आपण दोन युगं पाहतो आहोत. डिजिटल युग, आर्टिफिशियल इंटलिजन्सचं युग आपल्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.अर्थात यात निर्माण झालेला डिजिटल डिव्हाइड मोठा आहे. त्याची सोडवणूक टाळता येणार नाही. भारतासारख्या देशात एकीकडे स्मार्ट रोबोज, इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे. दुसरीकडे आदिवासी-ग्रामीण भागात इंटरनेटची रेंज नाही ही स्थिती आहे. मात्र समस्या सोडवायला पुन्हा तंत्रज्ञानाकडेच जावं लागेल. डिजिटल तंत्नज्ञान वापरूनच डिजिटल डिव्हाइड कमी करता येईल.पंढरपूरजवळच्या एका लहानशा शाळेत मी भेट द्यायला गेलो होतो. तिथे मला दिसलं की  शिक्षकांपेक्षा मुलंच जास्त टेक्नोसॅव्ही असल्याचं जाणवलं. फक्त त्यांना तंत्रज्ञान सहज उपलब्ध झालेलं नव्हतं. त्यांच्या हातात टॅब्लेट्स दिली तर त्यांनी त्याचं ऑपरेटिंग सहज अ‍ॅडॉप्ट केलं. हे शासनाने लक्षात घेत मोठा पुढाकार घेतला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना मला आशादायी वाटतात. शिवाय अजून एक पर्याय म्हणून सॅटेलाइट तंत्रज्ञान वापरता येऊ शकतं.पण पुन्हा असं आहे, की शासनाची जोडणी टॉप टू बॉटम  अशी असते. अनेकदा तळातल्या माणसार्पयत सुविधा पोहोचायला वेळ लागतो किंवा त्या पोहोचतच नाहीत. अशावेळी हा प्रश्न समाजाने सोडवायचा असतो. शासनानेही आता  लास्ट पर्सन फस्र्ट  असं धोरण ठेवा. ज्यांचं दुखतंय त्यांनी पुढे येऊन सांगावं लागतं. तेव्हाच शासनाचं लक्ष जाईल.

 

2) पोस्ट-कोरोना शिकवण्याच्या पद्धतीत बदल म्हणून तरुण शिक्षकांना काय नवा दृष्टिकोनही अंगीकारावा लागेल?

- आपण माहितीच्या आधारावर आपली शिक्षणपद्धती बनवलीय. ती आता बदलली पाहिजे. परीक्षाही ओपन बुक पद्धतीने घेतली पाहिजे. इन्फर्मेशन बेस्ड एज्युकेशनपासून आपण थिंकिंग बेस्ड एज्युकेशनकडे जाऊया. तिथून पुढे मग लर्निग बेस्डकडे जायचंय. लर्निगचे प्रकार असतात. युनेस्कोने पूर्वी शिक्षणासाठी एक चार पिलर्स मॉडेल दिलं होतं. लर्निग टू नो, लर्निंग टू डू, लर्निग टू लिव टुगेदर अ‍ॅण्ड वर्क टुगेदर. सध्या आपला सगळा भर केवळ लर्निग टू नो वरच आहे.ट्रान्स्पोर्टेशन, कम्युनिकेशन आणि ऑपरेशन या तिन्ही क्षेत्रात आज मोठी क्रांती झालीय. त्या क्रांतीचा योग्य तो वापर करून घ्यावा लागेल. आपले अप्रोचेस वीस वर्षांपूर्वीचे असतील तर चालणार नाही. ज्यावेळी परिवर्तन घडतं तेव्हा फॉर्म, रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म या तीन संकल्पनांना खूप महत्त्व प्राप्त होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे.

3) याकाळात जे संभ्रम, गोंधळ होतात, ते कसे सोडवायचे?

जगच खुलं होतं तेव्हा अनेक संभ्रम निर्माण होता, प्रश्न पडतात. शिक्षकाला आता त्याची भूमिका बदलावी लागेल. केवळ फोनच नाही तर अनेक गोष्टी आजच्या काळात स्मार्ट बनल्या आहेत. इंटरनेटने जग खूप जवळ आणलंय. इ-लर्निंगच्या या काळात फक्त माहिती सांगतो तो खरा शिक्षक असं आता नाही तर जवळ आलेल्या जगाकडे कसं बघावं ही दृष्टी देणारा शिक्षक चांगला अशी व्याख्या आता केली पाहिजे. विद्याथ्र्यासाठी आता पुस्तक नाही तर जग हे ज्ञान मिळवण्याचं साधन बनलंय हे शिक्षकांनी ध्यानात घ्यावं.

4) शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी या काळात काही प्रमाणात नैराश्यात, संभ्रमात जाताना दिसताहेत. त्यांच्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट या बाबींची वानवा दिसते. ऑनलाइन काळाशी जुळवून घेताना त्यांना इतरही अनेक अडचणी आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल?

आज शिक्षकांसह विद्याथ्र्यापुढे अनेक आव्हानं आहेत. मात्न आता हरेकाला स्वतर्‍चा मार्ग शोधावा लागेल. शाळा, शिक्षक, पालक सगळ्यांचीच आता जबाबदारी मोठी आहे. मानसिकदृष्टय़ा खंबीर होणं हे आता कधी नव्हे ते महत्त्वाचं झालं आहे. पालकांनी शाळांकडे काही बाबींना घेऊन आग्रही असलं पाहिजे. शिवाय स्वाध्याय आता महत्त्वाचा झाला आहे. सतत शाळा-शिक्षक यांच्यावर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपलेत. विद्याथ्र्यानी शिक्षणाचा निर्मिती आणि वॅल्यू क्रि एशनशी संबंध लावला पाहिजे तरच येत्या काळात टिकून राहता येईल.

लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.मुलाखत आणि शब्दांकन - शर्मिष्ठा भोसले