शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

नोमोफोबिया

By admin | Updated: April 7, 2017 18:41 IST

दर सेकंदाला फोन वाजल्यावर तुम्ही तुमचा फोन चेक करता का? बराचवेळ फोन वाजला नाही तर तुम्ही मोबाइलकडे पाहात बसता का? मोबाइलमधला दिवा

- जीवाला काच लावणारा एक गंभीर आणि धोकादायक नवाकोरा आजारदर सेकंदाला फोन वाजल्यावर तुम्ही तुमचा फोन चेक करता का? बराचवेळ फोन वाजला नाही तर तुम्ही मोबाइलकडे पाहात बसता का? मोबाइलमधला दिवा जरासाही पेटला की तुम्ही लगेच तो हातात घेता का? तुमच्या फोनची बॅटरी थोडी जरी कमी झाली किंवा बॅटरी पूर्ण संपायला आली की तुम्ही अस्वस्थ होता का किंवा फोन हरवला आहे अशी कल्पना तुम्हाला अस्वस्थ करते का ? तुमचा मोबाइल जराही नजरेआड झालेला तुम्हाला चालत नाही का?या सगळ््या प्रश्नांची उत्तरे जर हो असली तर नक्कीच ही काळजीची बाब आहे. कारण ही सगळी नोमोफोबिया या आजाराकडे वाटचाल होत असल्याची लक्षणे आहेत. नोमोफोबिया म्हणजे नो मोबाइल फोन फोबिया. आपला फोन नाहिसा झाला, तो तुटला किंवा त्याची बॅटरी संपली तर काय होईल? असे वाटून येणारी अस्वस्थता यामध्ये रुग्णाला सारखी त्रास देत असते. मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे वाढलेल्या ताणतणावात्मक आजारांनी तरुणांना घेरण्यास सुरुवात केली आहे. आॅल इंडिया इन्स्टीट्यूट आॅफ इंडिया (एम्स)च्या न्युरॉलॉजी विभागाने केलेल्या अभ्यासातून मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमरची शक्यता १.३३ पटीने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इमेल असं एकापाठोपाठ चेक करत बसायचं मग इन्स्टग्राम, टष्ट्वीटर पाहायचे ते संपलं की आणखी काही अ‍ॅप उघडून बसायचं तेवढ्यात कोणीतरी तुम्हाला पिंग करतं, त्याच्याशी चॅट करत बसायचं मध्येच फेसबूकवर आपल्या फोटोवर कोणी कमेण्ट केली ते पाहायचं हे सुरु असताना गाणी ऐकायची आणि रात्री यूट्यूबवर काहीतरी पाहात झोपी जायचं अशी काहीशी जीवनशैली तरुणाईची तयार झाली आहे. माझ्या फेसबुक वॉलवर मित्राने काही कमेंट केली असेल तिला मी लाइक केलं नाही किंवा त्याला उत्तर दिलं नाही तर अनर्थ होईल अशी नाहक भीती सगळ््यांना त्रास देत राहते. इतकेच नव्हे तर अजून कसं कोणी माझ्या फोटोवर, स्टेटसवर रिअ‍ॅक्ट झालं नाही असा प्रश्न तरुणांना सतावतो आणि मग ते अक्षरश: प्रत्येक सेकंदाला फोन उघडून बसतात. यामुळे फोन त्यांच्या आ़युष्याचा अविभाज्य अंग बनतो आणि त्यामुळेच फोनचे नसणे किंवा फोन नाही ही कल्पनाही त्यांना अस्वस्थ करते. नोमोफोबिया ही संज्ञा सर्वात प्रथम २०१० साली इंग्लंडमधील एका संशोधन संस्थेने तयार केली. त्यांनी केलेल्या अभ्यासाअंती इंग्लंडमधील ५३ टक्के लोकांना आपला फोन हरवला किंवा बॅटरी संपू लागली की अशी अस्वस्थता जाणवत होती. ५८ टक्के पुरुष आणि ४७ टक्के महिलांना या अस्वस्थतेने घेरलेले होते. त्यांच्या आणखी एका अभ्यासामध्ये ५४७ विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के मुलांना नोमोफोबिया होता तर ६४ टक्के मुलांमध्ये नोमोफोबिया होईल अशी भीती दिसून येत होती. या मुलांपैकी ७७ टक्के मुले एका दिवसात ३५ किंवा त्याहून अधिकवेळेस फोन तपासत होते. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार सर्वेक्षण केलेल्या १००० लोकांपैकी ६६ टक्के लोकांना फोन हरवण्याची काळजी वाटत होती.१८ ते २४ वयोगटातील मुलांपैकी ७७ टक्के लोकांना मोबाइलपासून काही मिनिटेदेखिल लांब राहणे असह्य आणि अशक्य वाटत होते. तसेच साधारणपणे ही मुले दिवसभरामध्ये ३४ वेळा फोन चेक करुन पाहात होती तर ७५ टक्के मुले बाथरुममध्येही फोन घेऊन जात होती.नोमोफोबिया कसा ओळखावा ?१) फोनच्या वापरामुळे तुमचा बहुमुल्य वेळ वाया जाऊ लागतो२)तुमच्या वागण्या-बोल्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते. इंग्लंडमधील एका सर्वेक्षणानुसार ५१ टक्के लोकांना एक्स्ट्रीम टेक अ‍ॅन्झायटी म्हणजे स्मार्टफोनपासून दूर झाल्यास येणारी अस्वस्थता होती.३) फोनच्या अतिरेकी वापरामुळे तुमची झोप बिघडते, तुम्हाला झोप कमी येते किंवा सतत झोपमोड होते.नोमोफोबिया कमी करण्यासाठी काय कराल?१) झोपण्यापुर्वी एक तासभर आधी तरी तुमचा फोन वापरणे बंद करा. व्हायब्रेशन्स, ब्लिंक होणारे लाइटस आणि आवाज तुम्हाला झोप येऊ देत नाही. आता दिवसभराचे काम संपले आहे याची जाणिव मेंदूला होण्यासाठी फोन बंद करणे गरजेचे आहे अन्यथा मेंदूला विश्रांतीची संधीच मिळणार नाही.२) गरज नसेल तर रात्रभर फोन बंद करणे कधीही चांगलेच. फोन बंद केला आणि काहीतरी चांगले-वाईट जगात घडले तर ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे. कोणतीही बातमी पोहचण्यात आता अडथळा येत नाही. प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. किंवा तुमच्या मित्रांच्या फेसबूक किंवा टष्ट्वीटरवर आपण रिअ‍ॅक्ट झालो नाही तर आकाश कोसळेल अशी भीती मनातून काढून टाका. मोबाइल फोन नसताना आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ फिरायला जाण्यास, खेळायला, व्यायामाला, जेवायला, वाचायला मिळणारा वेळ आठवून पाहा.३) फोन पाहण्याच्या वेळा ठरवून ठेवा. आता मी तासभर वाचन करणार आहे किंवा तासाभरानंतरच फोनला हात लावेन असा निर्णय घ्या. तसेच पाचच मिनिटे फोन पाहेन असं ठरवून मगच फोनला हात लावा४) घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा. वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरायचा नाही. लहान मुलांपासून फोन दूर ठेवा५) नवे छंद किंवा नवी आवड जोपासण्याचा प्रयत्न करा. वाचन, बागकाम, घरकाम तुम्हाला फोनपासून दूर ठेवेल. घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वत: तेथे जाऊन बोला, तेथे चॅटिंगचा वापर टाळा.