शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

नीट आणि जेईई- परीक्षा  लांबणीवर , विद्यार्थांचं  काय  होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 15:18 IST

नीट आणि जेईई या परीक्षा सप्टेंबर्पयत पुढे ढकलण्यात आल्या. जी मुलं गेलं दीड वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ या परीक्षांचा अभ्यास करत आहेत, ते हताश झालेत. पण तसं करून कसं चालेल?

ठळक मुद्दे परीक्षा संयमाची आणि खंबीरपणाचीही आहे.

- धर्मराज हल्लाळे

सलग 21 महिने एकच अभ्यासक्रम. एकाच परीक्षेची तयारी करत राहणं हे अनेक मुलांना कंटाळवाणं झालंय.ही मुलं थकली आहेत. चिडचिड होते आहे, तेही स्वाभाविक आहे. राग तरी कोणावर धरावा?बहुतांश ठिकाणी अकरावीचे वर्ग डिसेंबरमध्येच संपतात. लगेचच बारावीची तयारी सुरू होते. गेल्या वर्षारंभाला बारावीत दाखल होणा:या विद्याथ्र्यानी विचार केला असेल की, आपण मे महिन्यात परीक्षा देऊन एका कठीण तपश्चर्येतून मुक्त होऊ !परंतु, कोरोनानं जगभरात जनजीवन ढवळून निघालं. त्यात देशातील सर्वात मोठी परीक्षा, अर्थात 15 लाखांवर विद्याथ्र्याचं भवितव्य अवलंबून असलेली परीक्षा, नीटची तयारी. कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यानं नीट आणि जेईई या दोन्ही परीक्षा जुलैमध्ये घेण्याचं ठरलं. परंतु, स्थिती नियंत्नणात नाही, त्यात परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्याची संख्या मोठी म्हणून दोन्ही परीक्षा आता सप्टेंबरपर्यंत पुढं गेल्या.या परीक्षांच्या तारखा सतत बदलत गेल्या. परीक्षा लांबणीवरही पडली. जानेवारी 2019 पासून आजवर जे या परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यास तरी किती करायचा?विद्याथ्र्याची मन:स्थिती बिघडत चालली आहे, आता अभ्यास नकोसा झालाय. साचलेपण आलंय. अभ्यासक्रम पूर्ण वाचून झाला, उजळणीही झाली. चाचणी परीक्षा झाल्या, त्या तरी किती द्यायच्या? शिक्षकांनाही प्रश्न पडलाय, सराव परीक्षांसाठीचा प्रश्नसंच संपलाय. अनेकांना अभ्यास अजीर्ण झालाय. अक्षरावरून डोळे फिरविणं सुरू आहे. पालकही हैराण झालेत. मुलांची क्षमता कशी टिकवून ठेवायची हा प्रत्येकासमोर प्रश्न आहे. त्यात काहीजण असेही आहेत की ज्यांनी नीट, जेईई गेल्यावर्षी दिली, मात्न अधिक गुण मिळवून उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी पुन्हा परीक्षेचा निर्णय घेतला. रीपीट करायचं ठरवलं.त्यांची परिस्थिती अजून बिकट आहे. मुलं प्रदीर्घ काळ अभ्यास करत आहेत, त्यांचा ताणही वाढला आहे. पालकही धास्तावले आहेत.आता यावर प्रश्न असा की, हे सारं असं आहे तर करायचं काय?* एक गोष्ट विद्यार्थी आणि पालकांनी समजून घेतलं पाहिजे, आजची परिस्थिती असाधारण आहे. सगळ्यांसाठी, जगभरच हे संकट आहे.आपल्या एकटय़ाच्या वाटेलाच हे संकट आलेलं नाही. तर हा परीक्षा आणि अभ्यासाचा ताण  देशभरातील 15 लाख विद्याथ्र्याना सहन करावा लागणार आहे. 

* सगळे एकाच नावेतील प्रवासी आहोत. त्यामुळं धीरानं सामोर गेलं पाहिजे, आहे ती परिस्थिती तूर्तास स्वीकारली पाहिजे.* आजवर जे आव्हान पेललं, अभ्यास केला, ताणावर मात केली तसं आणखी तीन महिने आपल्याला संयम टिकवायचा आहे.* ज्यांचा अभ्यास अपुरा होता, त्यांना वाढलेला वेळ लाभदायी आहे. त्यांनी त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा.* ज्यांचा अभ्यास झाला आहे, ज्यांना परीक्षा लगेच द्यायची होती, त्यांनीही थोडा ब्रेक मिळाला म्हणत थोडी विश्रंती, थोडा विरंगुळा, दीनचर्येत काहीसा बदल करून जरा ताणमुक्त व्हावं. मग पुन्हा नव्या दमानं अभ्यासाला लागता येईल. * पालकांनी खंबीर होऊन मुलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आजच्या स्थितीत कोरोनामुक्त जीवन, आपला जीव अधिक मोलाच आहे. * वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजे आयुष्याचं अंतिम ध्येय नाही. तूर्त एक मोकळा श्वास घ्या. घुसमट थांबेल. कविवर्य सुरेश भट म्हणतात ते लक्षात ठेवू.हे असे आहे तरी पण,हे असे असणार नाही..दिवस अमुचा येत आहे..तो घरी बसणार नाही..