शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लास्ट सीन’च्या गैरसमजाचे पतंग

By admin | Updated: March 23, 2017 08:44 IST

आपण कुणाला तरी मेसेज करतो,त्यानंतर शंभरदा ती व्यक्ती आॅनलाइन येते-जाते. पण आपला मेसेज वाचतच नाही.कधी मेसेज वाचल्याचे निळे टिकमार्क दिसतात,पण रिप्लाय येत नाही.संताप होतो मग आपला.वाटतं, समजतात काय स्वत:ला आम्ही काय कुणी ऐरेगैरे आहोत का?

 

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आपला कुणाला मेसेज गेला की त्यानं तो बघितला की नाही आपल्याला लगेच कळतं. फेसबुकवर सीन आणि वेळ कळते, तर व्हॉट्सअ‍ॅपवर दोन निळे टिकमार्क येतात. समोरची व्यक्ती केव्हा-केव्हा आॅनलाइन होती हेही वेळोवेळी कळत राहतं. अगदी सहज समजतं ते. त्यासाठी कॉम्प्युटरतज्ज्ञ असायची गरज नाही की अगदीच कुणी कुणावर लक्ष ठेवून बसलं आहे असंही वाटून घ्यायची गरज नाही. तंत्रानं एक सुविधा पुरवली आणि आपल्याला त्यातून काही अंदाज येतात, म्हणून आपण ती सुविधा वापरतो, इतकंच!

पण आपण कोणीतरी ग्रेट कायमच असतो, नाही का?म्हणजे आपल्याला वाटतं तरी तसं!त्यात आपला मेसेज कुणी वाचला, वाचला की नाही, कधी वाचला, आपल्याला ब्लॉक केलं का, मेसेजचं उत्तर किती वेळाने दिलं, कसं दिलं, हे सगळे हिशेब सुरू होतात. आपल्याला उत्तर द्यायच्या आत कितीवेळा ती व्यक्ती ‘लास्ट सीन’मध्ये येऊन गेली आणि किती वेळानं तिनं आपल्याला उत्तर पाठवलं याचे अंदाज आपण बांधतो. दरम्यान ती व्यक्ती खरंच काही कामात होती की आपल्याला उत्तर द्यायचं नाही म्हणून तिनं असं केलं हे आपल्याला समजलंच पाहिजे असा हट्ट मनात सुरू होतो. आपल्याला समोरची व्यक्ती किती ‘भाव’ देतेय, म्हणजे कितीवेळात आपल्या मेसेजला रिप्लाय करतेय यावरून आपण ते नातं कसं आणि कितपत जवळ करायचं याचे आडाखे बांधत बसतो. कधी सहजच फोन करून बघतो. उचलला जातो का? की टाळला जातो? टाळला गेला तर का? वेगवेगळ्या वेळांनाही फोन करून बघतो.त्या व्यक्तीनं आपला मेसेज उघडून बघितला आणि तरीही आपल्याला उत्तर नाही म्हणजे किती ते दुर्लक्ष केले आपल्याकडे असं वाटतं. मग त्यात आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं नेमकं कसं आहे तेही बघावं लागतं. समोरची व्यक्ती जुजबी ओळखीची आहे की आॅफिशिअल कामापुरती फॉर्मल ओळख आहे? प्रत्यक्ष नात्यात वगैरे आहे की प्रत्यक्ष बघितलेलं आहे? अनेक वर्षांची तोंडओळख आहे की घनिष्ठ मैत्री आहे? प्रेमात पडून आपण तिच्या मागे लागलो आहोत की केवळ व्हर्च्युअल मैत्री आहे? असं सगळं.आजकाल सगळे सांगतात, ‘मनातलं बोला, मोकळे व्हा’. पण कोणाशी बोला ते सुचत नसत. जवळचे लोक काही ना काही अर्थ काढतील म्हणून त्यांच्याशी बोलणं आपण टाळतो. त्याच दरम्यान आपण ‘कोणीतरी, कुठेतरी भेटेलच जे आपल्याला समजून घेईल’, अशी स्वप्नंही पाहत असतो. मग फेसबुकवर कोणी बरं व्यक्त होणारं सापडलं तर त्याच्या मागे लागतो. आपलं आयुष्य त्यानं ऐकून घेतलंच पाहिजे यासाठी मेसेजवर मेसेज करत राहतो. ‘माझ्याशी मैत्री करशील का?’ची अगतिकता मग हट्टात पेटते. कोणी नाही म्हणालं, आपल्याला टाळलं की लगेच इगो दुखावला गेलाच. आपल्याला ‘नाही’ म्हणते/ किंवा म्हणतो?- म्हणजे काय! इतरांशी बरं ठीक बोलते, अशी तुलनाही सुरू होते. पण प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये कसं नातं असतं ते त्यांनाच नीट माहीत असतं. त्यांचा काही एक कम्फर्ट झोन असतो. आपणदेखील लगेच त्या प्रकारच्या कम्फर्ट झोनमध्ये समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात दाखल झालंच पाहिजे, असं आपल्याला वाटत राहतं. पण आज ओळख झाली, उद्या घट्ट मैत्री झाली, असं नसतं ना पण! मग माध्यम कोणतंही असू द्या. तरीही कोणी आपल्याला टाळलं तर लगेच आपण सुनावतो, ‘मी कोणी ऐरागैरा नाही. मीपण तमुक आहे. तुम्हीच कोणी महान नाही’.खरं तर या तुलना, असूया, इगो दुखावणं या ट्रॅकवर इतकी पटकन तुमची व्हर्च्युअल मैत्री जात असेल तर मैत्रीत रेड सिग्नल पाडायला हवा. सावध व्हायला हवं. सगळेच काही मैत्री शोधत फिरत नसतात हे समजून घ्यायला हवं. अगदी ओळखीत देखील आपला मेसेज गेला आणि समोरून उत्तर नाही आलं तर आपण अनेक शक्यता लढवत बसतो. मेसेज जाणं आणि त्याला उत्तर येणं म्हणजे आपल्यासाठी सगळं जग होऊन जाते. फेसबुक वगैरे वरून मैत्री शोधणं हे आयुष्याचे इतिकर्तव्य असल्यासारखे आपण मेसेज पाठवत सुटलो आहोत का? हे तपासणार की नाही? नसेल कोणाला आवडत नुसते हाय आणि गुडमॉर्निंग, वेगवेगळ्या सणांचे शुभेच्छापत्र. काही ना काही निमित्त करून कशाला तडमडायचे दुसऱ्यांच्या इनबॉक्सला? मैत्री करायची आहे ना, मग ती अशी फास्ट ट्रॅकवर टाकाल तर रुळावरून घसरणार असं समजा. वेगवेगळे विषय, नानाविध आवडी- निवडी यांच्याबद्दल आधी बोला. एकदम कोण कुठे राहते आणि घरी कोण आहेत, काय काम करता? ही डिटेक्टिव्हगिरी करायला कशाला जायचं? लोकांना त्यांच्या कामावरून जोडणार की काय आपण? की राहण्याच्या ठिकाणावरून? मनातलं बोलायला मैत्री करायची असेल, तर ती वेगवेगळ्या विषयांवर शेअरिंग वाढवूनच होऊ शकते. दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला एकदम आपल्या भावनांचे ‘डस्टबिन’ कशाला करायला जायचं? ते ऐकून कोणी तुम्हाला तिथेच वाटेला लावून देणार कशावरून? कोणी जरावेळ समजून घेणारं भेटलं तरी त्यांची लगेच आणि ठोस मदत मन हलकं होण्यापलीकडे होणार नाही. आपल्या खऱ्या आयुष्यात आधी आधार शोधायला हवाय. तो सगळ्यांत महत्त्वाचा असतो. घरात, जवळच्या नातेवाइकांत मिळाला तर उत्तमच. नाहीतर, शेअरिंग वाढवायला पर्याय नाही. तसं केलं नाही तर जवळच्या मित्र-मैत्रिणींपासून ते अनोळखी लोकांपर्यंत ‘लास्ट सीन’ची नवी कटकटच आपल्यामागे लागते. या ‘लास्ट सीन’मध्ये किती अडकायचं हे एकदा लास्टचे ठरवूनच टाका बघू...

 
रिप्लाय करायला वेळ नाही?कदाचित काही अर्धसत्यदेखील घटना असतात. म्हणजे मेसेज गेला पण व्हॉट्सअ‍ॅपवर तो समोरच्याला उघडलाच नाही. तुम्ही म्हणू शकता, मेसेज पाठवला. समोरची म्हणू शकते, ‘हो, पण टेकिंग टाईम टू ओपन असं अडकलं आहे ते. मला अजून वाचताच आलेलं नाही’. किंवा काही अडचणीत असेल, मेसेज नुकताच वाचून नेट/ रेंज नसलेल्या भागात काही तास कामाला गेलेली असेल. देऊ उत्तर नंतर हक्काची व्यक्ती आहे म्हणून देखील कंटाळा केला असेल. प्रत्यक्ष फोन करून बोलू असं वाटलं असेल. जरा धीर धरणार की नाही? की लगेच गैरसमजाचे पतंग उडवणं सुरू! आपल्याकडून ही हुरहुर, तर समोरच्याला वाटत असतं आपल्याच मागे कुणी लागलं आहे. पण तुम्ही कोण की तुमच्या मागे कुणी लागावं? हे प्रश्नच अनेकांना अशावेळी पडत नाहीत. लगेच आक्रस्ताळेपणा, चार लोकांत थट्टा, चर्चा सुरू होते.- प्राची पाठकprachi333@hotmail.com( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)