शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कायद्यावर बोट ठेवणारा पर्यावरणाचा वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 16:00 IST

पर्यावरणासाठी नुसता कळवळा असून उपयोग नाही. त्यासाठी नियम माहिती हवेत, कायद्यानं भांडता यायला हवं. तेच करणारा एक दोस्त.

- ओंकार करंबेळकर    

आपल्या आजूबाजूला होणारं प्रदूषण, आपल्याला जाणवतंही. ध्वनिप्रदूषण किंवा एखाद्या नदीमध्ये सोडल्या जाणार्‍या दूषित पाण्याबद्दल न्यायालयात खटला चालू असल्याचंही वाचतो. कधीकधी न्यायालयानं प्रदूषण करणार्‍या व्यक्तींना, उद्योगांना दंड ठोठावल्याचं आपण वाचतो. पर्यावरणाच्या र्‍हासावर आणि बदलांवर समाजातील काही सजग लोकांचे आणि पर्यावरणप्रिय वकिलांचे घारीसारखे लक्ष असते. या लोकांच्या धडपडीमुळेच न्यायालयार्पयत ही प्रकरणे जातात, दोषींना शिक्षाही होत असते.    पुण्याच्या हर्षद गरूडचं कामही काहीसं अशाच स्वरूपाचं आहे. निसर्ग, झाडं, फुलपाखरं यांची ओळख त्याला अगदी लहानपणापासूनच होती. थोडं मोठं झाल्यावर सेव्ह टायगर मोहिमेची आणि आपल्या देशात झालेल्या वाघांच्या दयनीय स्थितीची माहिती समजली. आपल्या देशात वाघ अत्यंत धोक्यात आहेत हे त्याच्यासाठी एकदम अस्वस्थ करणारं होतं. वाघांबरोबर पर्यायानं इतर प्राणीही तितक्याच संकटात असल्याचंही त्याला पुस्तकांमधून, टीव्हीवरच्या कार्यक्रमांतून समजू लागलं. त्यामुळे प्राणी, पक्षी, फूलपाखरू यांच्यामधील त्याची रुची अधिकच वाढली. पुढे कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर पर्यावरण कायदे या विषयात काम करणार्‍या लोकांची संख्या कमी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यानं वकील झाल्यानंतर पर्यावरणाचे विषय हाताळायचे असं ठरवून टाकलं. कायद्याचं शिक्षण घेतानाच त्यानं भारतात गाजलेल्या महत्त्वाच्या पर्यावरण प्रकरणांचा अभ्यास सुरू केला, त्यातील विविध मुद्दय़ांबद्दलच्या शंकांचं निरसन करून वाचन सुरू ठेवलं. 

    वकील झाल्यानंतर त्याला पहिलाच खटला दोन हत्तींसाठी लढायला मिळाला. हा खटला चालविण्यासाठी कोणीच नसल्यामुळे 2008 साली त्यासंदर्भातील सर्व काम थंडावलं होतं. त्यामुळे तो पुन्हा गतिमान करण्यासाठी प्रयत्न करायचं हर्षदनं ठरवलं. प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांच्याबरोबर सुरुवातीचा काळ हा खटला चालवल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी हर्षदने घेतली. या दोन हत्तींचा वापर भीक मागण्यासाठी केला जात होता. या हत्तींमधील एक हत्ती कजर्तजवळील एका स्टुडिओमध्ये बेकायदेशीररीत्या चित्रीकरणासाठी वापरला जात असल्याचंही समजलं. दोन्ही हत्तींची तब्येत अत्यंत खालावली होती. त्यात एका हत्तीचा मृत्यू झाला. दुसर्‍या हत्तीचा जीव वाचवण्यात मात्र हर्षद आणि इतर सहकार्‍यांना यश आलं. या जिवंत राहिलेल्या हत्तीला मथुरेच्या वाइल्ड लाइफ रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. हर्षद म्हणतो, या खटल्यानं पर्यावरणीय खटल्यांचा चांगला अनुभव मिळाला, हुरूपही वाढला. कायदेशीर प्रयत्नांमुळे पर्यावरणाला मदत होऊ शकते ही कल्पना सुखावणारी होती. या दोन हत्तींप्रमाणे सोलापूरमध्ये नान्नज येथे माळढोक आणि इतर प्राण्यांना  एका फटाक्याच्या कारखान्यामुळे धोका निर्माण झाला होता. या खटल्यात राष्ट्रीय हरित लवादाने हा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. अशा अनेक खटल्यांमध्ये काम करण्याची संधी हर्षदला मिळाली.    पर्यावरणाच्या संदर्भातील खटल्यांच्या बाबतीत, यामुळे विकासकामांना खीळ बसते असा आरोप केला जातो. हर्षद म्हणतो, भारतासारख्या विकसनशील देशांसाठी विकास नक्कीच गरजेचा आहे. मात्र त्यासाठी पर्यावरण आणि परिसंस्थेचा नाश करण्याची गरज नाही. मेट्रो ट्रेन, मोनोरेल सारखे प्रकल्प वृक्षतोड किंवा इतर प्रदूषणांच्या मार्गानी पर्यावरणाचं नुकसान करत असतील तर  थोडा विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाला पूरक अशी नीती ठरवून हे प्रकल्प तडीस नेले पाहिजेत. पर्यावरण साक्षरता शालेय शिक्षणातूनच आल्यास या प्रदूषणाला कमी करता येईल. कायद्याचा वापर करून आपण निसर्ग वाचवू शकतो, नियमावर बोट ठेवणं उत्तम.