शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लग्नं रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:04 PM

शेतीला पाणी नाही,उत्पादनाला भाव नाही,शेतमालाला बाजारपेठ नाही..आता तरशेती करणाऱ्या तरुणाच्यावयाची तिशी उलटली तरीलग्नाला मुलगी मिळत नाही.

- हिनाकौसर खान-पिंजार शेतीला पाणी नाही,उत्पादनाला भाव नाही,शेतमालाला बाजारपेठ नाही..आता तरशेती करणाऱ्या तरुणाच्यावयाची तिशी उलटली तरीलग्नाला मुलगी मिळत नाही.‘मागच्या सात वर्षांपासून मोठा मुलगा शेती करतोय. घरची स्थिती बरी आहे. लहान मुलगा इंजिनिअर झालाय. थोरल्यासाठी तीन वर्षांपासून मुलगी शोधतोय पण शेती करतो म्हटल्यावर स्थळं येणंच बंद झालीत. लहान मुलाला मात्र नोकरी लागल्याबरोबर स्थळ चालून आलं. आता थोरल्याच्या लग्नाची फार काळजी लागलीय. शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा नको म्हणत्यात.’- एक वैतागलेले बाबा सांगत होते.**‘आजतोवर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव नव्हता. आता शेतकऱ्यांच्या शेतीच करणाऱ्या पोरांनाही बायको मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. मुलाची नोकरी साधी असल तरी चालल पण शेतकरी नको. अगदी दहा एकर जागा, मुलगा एकुलता एक असेल तरीही मुली आणि त्यांचे आईबाप ‘शेतकरी मुलगा’ म्हटलं की पुढं काही बोलतच नाहीत. आमचा पुतण्या गेली पाच वर्षं झाली मुलगी शोधतोय. आता तर तो लग्नाचं नाव काढलं तरी वैतागतो. - एक काका उदास होत सांगत होते.**‘आज खेड्यात जमीन असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चं दुकान असलं तरी लवकर लग्न होतं पोरांचं. मी पण शेतकरीच. मात्र पोरीला कधी काही कमी पडू दिलं नाही. लाडात वाढली ती. मग तिचं लग्न लावून देताना हयगय कशी करणार? मुलाचं गाव जर दुष्काळी पट्ट्यात असेल, घरी गायगुरं असतील आणि पाणी भरायला हंडे घेऊन लांब कोसावर जावं लागत असेल तर पोरीला कसं द्यायचं त्या गावी?’- पोरीचा शेतकरी बापही आपली सल सांगतो. **ही सारी माणसं काय सांगताहेत? ते सांगताहेत शेतीचा प्रश्न आता जगण्यात कसे वेगवेगळे पेच निर्माण करतोय. त्यातलाच एक म्हणजे शेतकरी नवरा नको म्हणण्याची मुलींची मानसिकता. खेड्यातल्या मुलींनाही शहरी, नोकरीवालाच मुलगा हवा अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो. शेतीच करतो मुलगा असं सांगितलं तर सर्वार्थानं अनुरूप मुलाशीही लग्न करायला मुली तयार होत नाहीत. शिकलेल्या मुली तर लग्न करून खेड्यापाड्यात यायलाच तयार नाहीत असं चित्र आहे. त्यावरून मुलींवर टीका, शिक्षणाचे परिणाम असे शेरेही सर्रास मारले जातात. मात्र फक्त याच कारणांमुळे शेती करणाऱ्या मुलांची लग्नं होत नाहीत, की त्यांची लग्नं न जुळण्याची अन्यही काही कारणं आहेत?आणि शोधलंच तर याशिवाय अन्य कारणं, शेती करणाऱ्या उपवर मुलांचे प्रश्न नेमके काय दिसतात?आणि ती कारणं सांगतात की, शेतकरी मुलाला तो शेतीच करतो म्हणून नकार मिळण्यापेक्षा शेतीतली असुरक्षितता, शेतीत न मिळणारी उत्पन्नाची हमी यामुळेही उपवर शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. कारण शेतीतली असुरक्षितता लग्न करताना मुलींना घाबरवून सोडते. या साऱ्या कारणांची पुष्टी केली आहे ती अलीकडेच ४५ गावांत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून!