शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

झूठ बोले खुद को काटे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 02:00 IST

आपण इतरांशी तर खोटं बोलतोच, स्वत:शी तर त्याहून जास्त वेळा बोलतो. सतत कारणं देत, खोटंनाटं सांगत स्वत:लाच फसवतो. का कशासाठी? का खोटं बोलतो आपण?

प्रज्ञा शिदोरे

माणूस. फसवणूक करण्यात माहीर. इतरांचीच नाही तर अनेकदा स्वत:ची फसवणूकही अगदी सहज करत असतो. ज्यागोष्टी खोट्या आहेत त्यावरही माणूस पटकन विश्वास ठेवू शकतो. आणि त्याउलट ज्या बरोबर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायला खूप वेळ घेतो. आपण आपल्या आयुष्यात अशी अनेक गोष्टींत फसवाफसवी करत असतो. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असो नाहीतर आपलं आयुष्य ज्यावर बेतलेलं आहे अशा सर्वच गोष्टींबद्दल आपण खोटं बोलत असतो. म्हणजे अगदी आज आपण किती खाल्लं, आपलं वजन किती आहे, इथपासून ते आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात, आपलं व्यसनांबद्दल काय मत आहे किंवा आपल्याला कोणत्या राजकीय पक्षाबद्दल सध्यातरी आपुलकी वाटते आहे. हे सगळंच अनेकदा फसव्या समाजांवर आधारलेलं असतं. हे कमीच म्हणून आपण आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या विषयांबद्दल सुद्धा खरी मतं मांडत नसतो. जसं, आपण अमुक एका व्यक्तीशीच का लग्न केलं, किंवा आपण कामाचं क्षेत्र हेच का निवडलं?एवढंच काय तर आपण खोटं बोलतो का, या प्रश्नालाही आपण कदाचित खोटंच उत्तर देऊ!असं सगळं खोटंखोटं वागून खोट्या जगात राहून आपल्याला त्रास होतंच असतो. हे आपल्यालाही कळत असतं. आपण मग माणूस खोटं का बोलतो? डॉक्टर कोर्टनी वॉरनच्या मते आपण खोटं बोलतो कारण, सत्य पचवण्याची, किंवा ऐकण्याची ताकद आपल्या स्वत:मध्येच नसते. दुसºयांचं जाऊद्या हो, पण एखादी गोष्ट जी आपण करत असतो ती आपल्यालाच खरंतर मान्य नसते, पण मोह, सवय, सामाजिक वलय किंवा इतर काही कारणांमुळे आपण ती मान्य करत नसतो. स्व:लाच! म्हणून आपण आपल्या अनेक निर्णयांबद्दल, सवयी आणि निवडींबद्दल काही समाजमान्य उत्तरं तयार ठेवतो. तीच ती सोईस्कर उत्तरं देऊन मोकळे होतो. याचं एक महत्त्वचं कारण म्हणजे आपली स्वत:चीच आपल्या निर्णयांचे परिणाम पेलायची तयारी झालेली नसते.डॉक्टर वॉरन म्हणतात की आपली ही खोटं बोलण्याची सवय आपण तान्हं असल्यापासून सुरु होते. तेंव्हाच आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला माणूस म्हणून तयार करत असते. त्या परिस्थीशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वत:ला फसवून वागत असतो. त्यांच्यामते आपले विचारही आपल्याला फसवत असतात. जसं जर आपण डाएट करत असू आणि आपण एक बिस्कीट खाल्ले तर आपण तो अख्खा दिवस वेडंवाकडं खातो कारण आपलं डाएट तर खराब झालंच आहे ना,मग खा आता!हे सगळं नेमकं कसं घडतं ते तुम्ही डॉक्टर वॉरनच्या या टेड टॉकमध्ये जरुर ऐका. आपण का खोटं बोलतो, आणि मुख्यत: खोटं बोलायला कसं शिकतो याची अतिशय सखोल पण सोप्या शब्दांतली ही मांडणी आपल्याला आपलंच एक रुप दाखवते.या फसवणुकीमुळे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण माणूस आहोत ही! त्यामुळे चुका झाल्या म्हणजे काहीतरी आक्र ीत घडलं आहे, आपण असं केलंच कस असं आपल्या मनाला वाटायला लागत. त्या लपवण्यासाठी आपण खोटेपणा करतो. ज्या गोष्टी आपल्याला कधीच टाळता येत नाही अशा गोष्टींपासून पाळण्यासाठी आपण खोटं बोलतो. पण स्वत:ला हे सांगत नाही की मी चुकलो. माणूस आहे, चुकूच शकतो. चूक मान्य केली, सुधारली की खोटं बोलण्याचा काय प्रश्न.पण आधी आपण स्वत: स्वत:शीच करत असलेला खोटेपणा ओळखायला हवा. तसं केल्यास आपल्याला मानिसक शांती लाभते असं मानसशास्त्रज्ञ ज्युडी केटलर म्हणतात. आणि न केल्यास आपल्याला खूप दु:खाचा सामना करावा लागतो, पश्चाताप तुम्हाला घेरतो. तुम्हाला कोणत्याच कामात टिकून राहता येत नाही असं डॉक्टर वॉरन म्हणतात.आपण सगळ्यांनीच असा दुसºयाशी आणि स्व:शी असलेला खोटारडेपणा केला आहेच. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नसलो तरी भविष्य नक्कीच बदलू शकतो.क्षणिक आनंदासाठी आपलय माझं भविष्य पणाला लावायचं नाही हे ठरवूच शकतो.त्यासाठी हा लेख वाचा आणि टेड टॉक पहा.

पाहाटेड टॉक - ‘ऑनेस्ट लायर्स’ https://www.youtube.com/watch?v=YpEeSa6zBTE&t=5sवाचान्यूयॉर्क टाइम्स मधला लेख वाचाहाऊ ऑनेस्टी कॅन मेक यु अ हॅपी पर्सनhttps://www.nytimes.com/2017/09/19/well/mind/how-honesty-could-make-you-happier.html

किती खरं बोललो याची डायरीज्युडी केटलर हे मानसशास्त्रज्ञ सच्चेपणाबद्दल बोलताना एक ‘आॅनेस्टी जर्नल’ ठेवण्याबद्दल सुचवतात.म्हणजे एक सच्चेपणाची रोजीनीशी.यामध्ये अशा घटनांबद्दल लिहायचं जेव्हा तुम्हाला खोटं बोलण्याचा, सत्य टाळण्याचा मोह झाला, लोकांनाही बोलताना किंवा अगदी स्वत: विचार करतानाही. आण ितेंव्हा तुम्ही काय केलंत आणि का हे लिहून काढायचं. अशा प्रकारच्या सवयीमुळे आपण स्वत:ला स्वच्छ दिसू लागतो आणि ओळखायला लागतो. असं झाल्यावर लोकांचं मन न दुखावता त्यांना सत्याची जाणीव करून देणंही आपल्याला सहज जमेल असं केटलर म्हणतात. त्यानं आपल्याला खोटेपणाची खोल कुठेतरी बोच राहते आणि मुख्य म्हणजे त्याला उत्तम होण्याची संधी आपण नाकारतो.