शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काचेचं छत फोडणारे खेलरत्न....देवेंद्र झाझडिया आणि सरदार सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 07:11 IST

जो समाज या खेळाडूंना मोजतच नाही, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणं तर सोडाच, त्या कर्तृत्वाला मोजतही नाही, त्या समाजात एका पॅराअ‍ॅथलटिला आणि हॉकीपटूला क्रीडाक्षेत्राला सर्वोच्च पुरस्कार मिळतो, ही घटना आपल्याला काय सांगते?

चिन्मय लेले

जे जग आपल्याला मोजतच नाही, आपल्या कर्तृत्वाला कर्तृत्वही समजत नाही, ज्या जगाच्या लेखी आपलं अस्तित्वच नाही, त्या जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यावर कसं वाटत असेल?-विचारा देवेंद्र झाझडिया आणि सरदार सिंगला!-अर्थात बहुसंख्यांना आता असा प्रश्न पडला असेल की हे दोघं कोण?त्यांना कुठला सर्वोच्च पुरस्कार मिळाला, कशाबद्दल मिळाला? आणि त्यांनाच का मिळाला बाकी कुणी नव्हतं का?हे प्रश्न हीच तर आपल्या समाजात खरी शोकांतिका आहे गुणवत्तेची आणि आपल्या मानसिकतचेही! आणि हा दोष गुणी माणसांचा नाही, तर समाज म्हणून आपल्या बेफिकीरीचा आणि बेदरकार वृत्तीचा आहे!झालं असं की, गेल्या आठवड्यात पॅराअ‍ॅथलिट आॅलिम्पिकपटू देवेंद्र झाझडिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना राष्टÑपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला!देशाच्या क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाºया खेळाडूंना या पुरस्कारानं नावाजलं जातं. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे देशाच्या पायी सर्वोच्च क्रीडासेवा रुजू केल्याचं प्रमाणपत्रच जणू! तो पुरस्कार एका पॅराअ‍ॅथलिटला मिळणं आणि सर्वार्थानं दुर्लक्षित हॉकी आणि हॉकीपटूस मिळणं, ही खरंतर अत्यंत भूषणावह गोष्ट आहे आणि तितकीच बोलकीही, सूचकही!आजही आपल्या समाजात एक मोठं ग्लास सिलिंग आहे. म्हणजे काय तर समाजच ठरवून टाकतो अनेकांच्या क्षमतांचं स्वातंत्र्य. आकाशात उंच रेषा मारल्या जातात, समाज सांगतो ही तुमची सीमा, उडा पण इथवरच! यापलिकडे उडण्याचं बळ अनेकांच्या पखांत नाही असं ठरवून टाकण्याचा बेदरकारपणा समाजच करतो. पण काचेच्या दृश्य अदृश्य सीमारेषा तोडूनफोडून आपली स्वप्नं पूर्ण करणं ज्यांना जमतं, त्या साºयांना बळ देणारी अशी ही घटना आहे.ज्या देशात क्रिकेटपलीकडे अन्य खेळांची आणि त्यातल्या गुणवत्तेची नोंद घेणं आता कुठं सुरू झालं आहे, त्या देशात दिव्यांग खेळाडू, त्यांची स्वप्नं, गुणवत्ता हे सारं कोण मोजणार? त्यांना खेळाडू असं तरी मानतो का आपला समाज?देवेंद्रचंच उदाहरण घ्या, त्यानं २००४ आणि २०१६ या दोन्ही वर्षी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक आणलं. पण त्या पदकाचं काय मोल, काय कौतुक झालं आपल्या समाजात?-फारच जेमतेम.तेच हॉकीचंही!मात्र हा सारा दुर्लक्षित भूतकाळ मागे सोडून एक नवीन उमेद निर्माण व्हावी, देशात क्रीडासंस्कृतीचं वातावरण खºया अर्थानं रुजावं अशी आशा वाटावी म्हणून यंदा देण्यात आलेल्या या खेलरत्न पुरस्कारांकडे पाहता येऊ शकतेल.हे पुरस्कार फक्त खेळापुरते मर्यादित नाहीत, बुरसटलेल्या मानसिकतेपलीकडे जाऊन गुणवत्तेचा सन्मान करणं आपल्यालाही जमू शकतं हे आपल्याच समाजाला सांगणारी ही घटना आहे.म्हणून या पुरस्काराच्या निमित्तानं आपणही देवेंद्र आणि सरदार सिंगला भेटायला हवं.त्यांच्याकडे असलेल्या दुर्दुम इच्छाशक्तीचं आणि मेहनतीचं इंजेक्शन टोचून घ्यावं जमल्यास स्वत:लाही!आणि मुख्य म्हणजे कुणाच्याही क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आपली नजरही त्यातून बदलता आली तर बदलून घ्यावी.