शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

बस हो गयी दोस्ती !

By admin | Updated: October 14, 2016 12:58 IST

खरंतर मला पाकिस्तानला जायचं होतं. पण यावर्षीच्या ‘दीपोत्सव’साठी एनएच 44 चा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनाच ‘किक’ बसली !

- मेघना ढोके

खरंतर मला पाकिस्तानला जायचं होतं. पण यावर्षीच्या ‘दीपोत्सव’साठी एनएच 44 चा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनाच ‘किक’ बसली !अख्खा देश पालथा घालणारी रोडट्रिप! असलं भन्नाट काम कोणाला करायला मिळणार?तसंही प्रवास ही एक नशा असते. त्याची चटक लागते. एका प्रवासानं दिलेली नशा थोडे दिवस टिकते. पुन्हा वाटतं की जावं आता फिरायला बाहेर खुल्या वातावरणात, वेगळ्या जगात, वेगळ्या माणसांत! रुटीन जगण्याचा मेणचट हात सुटतो इतकी ती नशा जालीम असते..आपल्याच देशाची दोन टोकं, कन्याकुमारी ते काश्मीर; त्यांना जोडणाऱ्या सगळ्यात मोठ्या हायवेनं प्रवास करायचा, तोही पूर्णत: अनप्लॅन्ड! कंप्लिट भटकं आयुष्य जगायचं. ते करतानाच आपला देश पाहायचा, समजून घ्यायचा. लाइफ आॅन अ हायवे या कल्पनेतच थरार होता. वाटलं, आता पाकिस्तान नंतर; आधी आपलाच देश नीट पाहून घेऊ, माणसांनाच नाही तर देशालाही अवचित गाठू..माझं मन तत्काळ ‘आनंद’ मोडवरच शिफ्ट झालं. बाबू मोशायचा आनंद. तो मस्त कलंदर सांगून गेलाय ना की, ‘हर एक बॉडी एक ट्रान्समीटर होती है, उससे निकली व्हायब्रेशन को पकडा, रिअ‍ॅक्ट किया, बस हो गयी दोस्ती..!’- ओळखीची ना पाळखीची अशी ‘व्हायब्रण्ट’ माणसं आपल्यालाही भेटतील अशी आशा मनाशी ठेवून निघाले टीमबरोबर!सर्व प्रकारचे चष्मे, समज, गैरसमज आणि आपलं ‘शहरी’ शहाणपण यांचं एक गाठोडं करून घरीच ठेवलं आणि जे जसं दिसेल ते तसं पाहायचं हे एवढंच स्वत:ला चारचारदा बजावलं.जायचं कुठून कुठं हे निश्चित होतं, पण बाकी काहीही ठरवलेलं नव्हतं. कुणाला भेटायचं, कुठं राहायचं, रिझर्व्हेशन.. असलं काहीही प्लॅनिंग केलं नाही. भाषाही न समजणाऱ्या भागातून जाताना आपलं कसं होणार, भर पावसाळ्यात रात्रीबेरात्री आपण कुठं निवारा शोधणार असा काहीही विचार केला नाही. एक नक्की होतं : नॅशनल हायवे ४४ सोडायचा नाही, हा देश आणि हा हायवे हेच आपलं रस्त्यावरचं घर!प्रवास सुरू केला आणि जी माणसं भेटली, त्यांनी या देशाकडे पाहण्याची माझी समजच बदलून टाकली..इथं रस्त्यावर माणसं भेटतात तेव्हा ती दिलखुलासपणे बोलतात, तुम्हाला ‘आपलं’ मानतात. कसलेही भेदाभेद करत नाहीत, तुमचं ओळखपत्र मागत नाहीत की तुम्ही कोण कुठले अशा संशयी चौकशा करत नाहीत. उलट जुजबी ओळखीवर तुम्हाला जेवायला घरी या असा आग्रह करतात आणि ते करताना तुमच्या जातीपाती, हुद्दा, रुबाब, पगारपाणी विचारत बसत नाहीत..माणसं फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात आणि प्रचंड विश्वासानं सहज मन आणि घराची दारंही तुमच्यासाठी उघडतात. एकमेकांची भाषाही समजत नसताना अशी कितीतरी गरीब, सामान्य माणसांची दारं माझ्यासाठी उघडली. तेव्हा मलाच अनेकदा प्रश्न पडला की, आपण काय म्हणून माणसांना गरीब आणि सामान्य असं म्हणतो आहोत?टपरीवर चहाचे पैसेही न घेणारे, रात्री बेरात्री कुठं जाता आता म्हणत स्वत:च्या ढाब्यावर राहण्याची सोय करतो म्हणणारे आणि एवढं करूनही आपण काहीच केलं नाही असं वाटून डोळ्यात पाणी आणून निरोप देणारे..मनाची भाषा बोलणारी आणि मायेची नाती जोडणारी अशी माणसं या प्रवासात सर्वत्र भेटली..इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे, आणि जो तो आपापल्या कहाणीचा हिरो. जरा त्यांच्या मनातल्या मातीला थोडं उकरलं की माणसं बोलतात, आपल्या स्वप्नांविषयी, झगडण्याविषयी, कष्टांविषयी आणि आयुष्यात काहीतरी घडवण्याविषयी..मला अजून आठवताहेत गच्च पावसाळी रात्री हैदराबादच्या चकाचक झळाळत्या हायटेक सिटीत भेटलेले, एका बड्या औषध कंपनीच्या खाली कंदिलाच्या उजेडात चहाची टपरी चालवणारे व्यंकट रेड्डीकाका. पावसात भिजत चहा पीत गप्पा मारल्या त्यांच्याशी तर ते सांगत होते की, त्यांना चार मुली! मुलगा नाहीच. मुलींनी हट्ट केला म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी गाव सोडून हे काका हैदराबादेत आले. ते सांगत होते, ‘मेरी बेटी कहती है, एक दिन ये हायटेक सिटीमें सबसे बडे कांच के आॅफिस की बॉस बनूंगी; मैं कौन होता उसे रोकनेवाला?मुलींना गर्भात मारणारे आईबाप माध्यमांमध्ये सतत भेटतात; पण मुलींसाठी जिवाचं रान करणारे आईबाप आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी, धडाडीच्या मुली या प्रवासात किती भेटल्या असतील, त्याची गणतीच नाही.असे किती किस्से, किती कहाण्या. हिमतीच्या, कष्टाच्या, उमेदीच्या आणि संघर्षाच्याही..जुनी ओझी मानगुटावर न बाळगता, नव्यानं काहीतरी घडवू पाहणारे, ठेचा खात झगडणारे तरुण आणि तरुणीही भेटल्या. आपण प्रयत्न केले तर आपली स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा त्यांच्या नजरेत दिसली.मी परत आले ती या उमेदीची ताकद घेऊनच.रस्त्यावर काही हजार किलोमीटर प्रवास केला असं कुणाला सांगितलं तर लोक अजूनही विचारतात, एकटी मुलगी होतीस तू टीममध्ये? आणि हा रात्री-बेरात्रीचा प्रवास? भीती नाही वाटली?- खरं तर हा प्रश्नच कुठं उद्भवला नाही इतका ‘सभ्य’ देश मला तरी या प्रवासात भेटला. रात्रीबेरात्री हॉटेल्स, टोलनाक्यांवर महिला काम करताना सर्वत्र दिसल्या. कुणी आपल्या बाईपणाचा बाऊ करत नव्हतं. आणि माझ्या टीममधल्या पुरुष सहकाऱ्यांसह देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना वाट्टेल त्या वेळी रस्त्यावर भटकताना, जो भेटेल त्याच्याशी गप्पांची मैफल जमवताना मी ‘स्त्री’ आहे, याचे साधे सिग्नल्ससुद्धा कुणी दिले नाहीत.माझा अनुभव तरी हेच सांगतो की, हा देश आपण माध्यमांत रोज उठून वाचतो-पाहतो तितका भयानक नाहीये बायकांसाठी! अशा किती कहाण्या सांगता येतील. पण त्या कहाण्यांपेक्षाही मोलाची आहे मी कमावलेली नजर आणि त्याहून मोठी आहे मी बॅगेत गच्च भरून आणलेली उमेद आणि चांगुलपणावरची श्रद्धा..ती उमेद मला आता आयुष्यभर पुरेल, हे नक्की!(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com