शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जॉब हॉपर्स नकोत? का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:55 IST

सतत नोकरी बदलणं फॅशनेबल असलं तरी फायद्याचं असेलच असं नाही.

ठळक मुद्देसतत नोकरी बदलताय? सावधान!

- नितांत पाटील

नेक्स्ट बेस्ट ऑपॉच्र्युनिटी.हे सध्या मिलेनिअल्स पिढीच्या म्हणजे तरुण मुलांच्या जगातले महत्त्वाचे शब्द आहेत. एकदा नोकरीला चिकटलं आणि तिथंच आयुष्य काढलं हे तर आता कालबाह्य प्रकरण झालं. आता नवीन शब्द आहे, जॉब हॉपिंग. सतत-पटापट नोकर्‍या अनेकजण बदलतात. त्यातून त्यांना भराभर प्रमोशन मिळतं, पगार वाढतो, आपल्याला मार्केटमध्ये किंमत आहे असंही वाढतं. त्याउलट जे एकाच कंपनीत अनेक वर्षे काम करतात, तिथल्या मालकांनाही वाटायला लागतं की एवढे लोक नोकर्‍या बदलत असताना या व्यक्तीनं नोकरी बदलली नाही, म्हणजे याचं स्किल कमी असणार किंवा याला बाहेर कुणी नोकरीवर ठेवत नसणार, त्यामुळे त्याची पगारवाढ आणि एकूण करिअरवाढही मंदावते.प्रत्यक्षात हे खरं नसतं, एकाजागी उत्तम काम करणारी माणसंही आपल्या कामात परफेक्शन कमावतात, विषयतज्ज्ञ असतात आणि चारदोन हजार रुपये पगार वाढतो म्हणून आहे त्या कंपनीला सोडत धावत सुटत नाही. अर्थात असा विचार करणारे थोडेच, सध्या काळ आहे तो जॉब हॉपिंगचा. तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी नोकरी करणं हेच अनेक मुलांना आउटडेटेड वाटतं. आपण ‘सडतोय’ एकाच जागी असा फील येतो. सेन्ससवाइड या कंपनीने अलीकडेच केलेल्या सव्र्हेनुसार 56 टक्के लोक सांगतात की, त्यांनी गेल्या 16 महिन्यांत एक ते तीनदा नोकरी बदलली आहे. अर्थात हे सारे नोकरदार आयटी, टेलिकॉम या क्षेत्रातले अधिक प्रमाणात आहेत. जुलै ते ऑगस्ट 2018 या काळात हा सव्र्हे करण्यात आला. या सव्र्हेत सहभागी झालेल्या 85 टक्के तरुण नोकरदारांना वाटतं की किती काळ नोकरी एकाच कंपनीत केली याला काही महत्त्व नाही. किती स्किल आहे, किती संधी मिळाली, किती पगार वाढला आणि पद वाढलं  याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे 60 टक्के तरुणांना असं वाटतं की, नोकरी बदलली तरच पगार चटकन वाढतो अन्यथा वाढत नाही. 43 टक्के तर आवजरून सांगतात की सतत नाही पण ठरावीक काळानंतर नोकरी बदलली तर आपल्या रेझ्युमची ताकद वाढते. मात्र का बदलतात हे तरुण नोकर्‍या?तर त्याची साधारण तीन कारणं दिसतात. एक म्हणजे नव्या नोकरीत वाटलं होतं तसं, अपेक्षेप्रमाणे काम वाटय़ाला आलं नाही. दुसरं म्हणजे जिथं काम करतो, तिथलं वातावरण चांगलं नाही, प्रोफेशनल नाही आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चांगली, नव्या कामाची, जास्त पगाराची नोकरी मिळाली.हे चित्र एकीकडे, दुसरीकडे मात्र आता हे जॉब होपर्स नोकरी देणार्‍यांच्या डोक्याला ताप होऊन बसले आहेत. त्यामुळे या सव्र्हेत सहभागी 87 टक्के नोकरी देणारे, व्यवस्थापनातले लोक सांगतात की, जे पटापट नोकर्‍या बदलतात असं रेझ्युममध्ये दिसतं, त्यांना आता आम्ही मुलाखतीलाच बोलावत नाही, नोकरी देण्याचा तर प्रश्नच नाही.जॉब हॉपिंग करणं चांगलं की वाइट यावरची चर्चा निरंतर सुरूच राहणार आहे, त्याचे फायदे-तोटेही आहेतच; पण ते करतानाही यापुढे तारतम्य ठेवावं लागेल, हे उघड दिसतं आहे.