- प्राची पाठक
गेले काही महिने लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने आपल्याला घरात कोंडून ठेवल्यासारखं झालं आहे. त्यात घरात जागा कमी आणि माणसं जास्त असतील तर सतत तेच ते लोक आणि तेच ते वाद-संवाद असा कंटाळादेखील आलेला आहे. एरवीही जेव्हा आपण सतत म्हणत असतो की चेंज हवा, चेंज हवा, त्यात अशा परिस्थितीत इतके महिने गेल्यावर काहीतरी वेगळं करणं हवंसं वाटेल, हे ओघानं आलंच.मग आपण काय करतो? नेटवर काही मजेदार मिळतं का ते सर्च करतो. खाण्यापिण्यासाठी काही वेगळं शोधत राहतो. घरी कितीही वेगवेगळ्या डिशेस केल्या तरीही आपल्याला बाहेरचं काही खावंसं वाटत असतंच. जणू घरच्या अन्नाने तोंडाची चवच उडाली आहे, अशी फिलिंग आलीये अनेकांना. नेहमीचे हॉटेल्स, फूड जॉइंट्स, कट्टे खुणावत असतात. मनात कोरोनाची भीती घेऊनसुद्धा आपल्या नेहमीच्या फूड जॉइण्टवरून जरासं काहीतरी तरी मागवूच, असं आपल्याला वाटत राहतं. त्या निमित्ताने आपण नेट सर्फ करायला लागतो. एक शोधता शोधता आणखीन काय काय आपल्याला हवंय, ते आठवून आठवून ऑर्डर करत राहतो. कुठे काय कोणत्या स्कीममध्ये मिळतं आहे, कुठे कसला सेल सुरू आहे, हेही सर्व घरी बसून ‘चेंज हवा, चेंज हवा’ करत आपण शोधत राहतो. घरातल्या वाण सामानापासून अनेक गोष्टी नेटवरून ऑर्डर करता येतात. एरवीही आपण ते करतच असतो कधीमधी. परंतु, यावेळी मात्न एकीकडे आपण घरात बर्यापैकी अडकून पडलो आहोत. दुसरीकडे मात्न बाहेर गेलं की कोरोनाची भीतीही वाटतेय. त्यामुळे, घरबसल्या काही वस्तू मिळणं ही सोय नक्कीच आहे. फक्त ती सोय म्हणजे आपलं मन रमवायचं साधन होऊन बसली आहे का, ते स्वतर्ला विचारायचं. या ऑनलाइन खरेदीवर आपण किती वेळ रेंगाळलेले असतो, ते शोधायचं. त्यावर आपण जास्त वेळ घालवू लागलो आणि गरज नसलेल्या अनेक गोष्टीदेखील उगाच ऑर्डर करत बसलो, तर अपने अंदर कि घंटी बजनी चाहिये. आपल्याला आलेल्या प्रचंड कंटाळ्यामुळे आपण नुसतीच अनावश्यक खरेदी करत सुटलो आहोत का? घरी बसून मी कसं सगळं ऑर्डर केलं, हे कोणाला दाखवून देण्यासाठी असं होत आहे का? सतत काहीतरी विकत घ्यावं, ऑर्डर करावं असं आपल्याला का वाटतं आहे, ते स्वतर्ला विचारायचं. कोरोना काळात अनेकांच्या नोकर्याही गेलेल्या आहेत. कोणाचे कामाचे पैसे मिळालेले नाहीत. कॉलेजला परीक्षा पास करून नवीन नोकरीला लागू, असं स्वप्न पाहणार्यांनादेखील मोठा ब्रेक लागला आहे. परीक्षा होणार की नाही? आपल्या नोकरीचं काय? असे अनेक प्रश्न समोर आहेत. असं असताना हातात भरपूर पैसा असो की बेताचाच पैसा असो, आपण भान विसरून चेंज हवा करत शॉपिंग करत सुटलो आहोत का, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.
चेंज हवा, चेंज हवा म्हणत जगण्यात चेंज होत नसतो, त्यासाठीही एक उत्तम रूटीन लागतं.ते आहे का आपलं, विचारा स्वतर्ला!
* आपल्याला नेमका कंटाळा आला आहे म्हणून चेंज हवा आहे की, आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, असा आळस आला आहे, हा फरक समजून घेता येईल. *चेंज हा जरा वेळच असतो. चेंज म्हणून काही करून झाल्यावर पुन्हा आपल्याला रूटीनच्या पटरीवरच धावायचं असतं. *कुठेतरी फिरायला जाऊन परत आल्यावर आपण शेवटी त्याच वातावरणामध्ये, त्याच घरात, त्याच माणसांमध्ये राहणार असतो, तर परिस्थितीपासून निव्वळ पळ काढण्यासाठी जर असा चेंज शोधला, तर त्यातून निराशाच पदरी पडेल. *त्यापेक्षा समजून-उमजून आणि सर्वांना सामावून घेतलेला चेंज आपल्याला खरोखर रिफ्रेश करू शकेल. शेवटी काय की आपल्या कंटाळ्याशी बोलायला शिकायचं. * चेंज हवा म्हणजे नेमकं काय हवं, कसं आणि कधी हवं, याचंसुद्धा नीट प्लॅनिंग करायचं. तरच या बोअर होण्याच्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकेल.
(प्राची मानसशास्रसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)