शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

यंदा गणपतीत निसर्गाशी दोस्ती कशी  करता  येईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 4:17 PM

गणोशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करतानाही अनेक पर्यावरणपूरक समाजोपयोगी कामं करता येतील. गरज आहे ती फक्त मोठय़ा मनानं मदतीचा हात पुढे करण्याची.

-  आनंद पेंढारकर, पर्यावरण चळवळीतले कार्यकर्ते

1) पर्यावरणपूरक गणपतीची संकल्पना रुजवणं-रु जणं महत्त्वाचं आहेच. त्यासह इतरही विविध कुठले प्रयत्न हरेकजण गाव-शहर पातळीवर करू शकतो?

-सेलिब्रेट रिस्पॉन्सिबली असा संदेश देणारे काही उपक्रम आम्ही करतो. अगदी सगळेच सण कसे पर्यावरणाशी सांधा जुळवत, स्नेह कायम राखत साजरे करता येतील हा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे पाहा ना, संक्रांत असेल, तेव्हा पक्षी पतंगाच्या मांजाने जखमी होतात. होळीला रासायनिक रंगांचा अनेकांना त्नास होतो. भरपूर पाणी वाया जातं. होळी रंगाचा उत्सव आहे, पाण्याचा नाही. शिवाय अनेक विषारी रंग वापरले जातात. निसर्गातून ओरबाडून जे जे बाजारात विकायला ठेवलं जातं ते स्वीकारू नये.आता गणोशोत्सव येतो आहे. पूर्वी घरातलीच मूर्ती उत्सवाच्या काळात ठेवली जायची.  सार्वजनिक गणोशोत्सव पुढे लोकमान्य टिळकांनी सुरू केला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक प्रबोधन-संघटनाचा मार्ग हा हेतू होता. तेव्हाही मूर्ती लहानच होत्या.आताही आपण घरच्या घरी गणपती बनवले, आपल्याच बागेतून, परसातून माती आणून मूर्ती तयार केली तर होऊ शकतं.शाडूनेही बनवता येते. याचं विसर्जनही घरातच करता येतं. केरळमध्ये नारळाच्या झावळ्यांची विणून मूर्ती बनवली जाते.आणि विसर्जन म्हणजे तरी काय? निसर्गातून जे घेतलंय ते निसर्गाला परत दिलं पाहिजे.प्लास्टर ऑफ पॅरिस हा काही निसर्गाचा भाग नाही हे आपण कधी लक्षात घेणार? शिवाय औरंगाबाद हायकोर्टाने मागे निर्णयही दिला होता, की पाण्याचे स्रोत तुम्ही गणपतीच्या मूर्ती विसर्जित करून दूषित करू शकत नाही. याकडे दुर्लक्ष करायला नको.

2) यंदा गणपतीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सण साजरा करताना कुठकुठले मध्यममार्ग असू शकतात?सध्या तर पॅनडेमिक अॅक्ट लागू आहे. तुम्ही रस्त्यामध्ये मंडप बनवता. जमाव जमतो. यातून कोरोनाचा संसर्ग झाला तर कोण जबाबदारी घेणार? सध्या सतत रुग्णवाहिका, महापालिकेच्या गाडय़ा फिरत असतात. त्यांच्या वाहतुकीत, रु ग्णसेवेत विघ्न आलं तर ते तुमचं-आमचंच नुकसान ठरणार ना!हे लक्षात घेणं हीच तर सामाजिक जबाबदारी आहे. घराबाहेर न जाता घरच्या घरी आपण सण उत्साहात साजरा करू शकतो.गणपती मंडळांची सामाजिक शक्ती मोठी असते. ही मंडळे यावर्षी डीजे, लायटिंग, मूर्तीचा खर्च टाळून प्लाङमा डोनेशन ड्राइव्ह आयोजित करू शकतील. गणोश मंडळांनी मनावर घेतलं तर ही संख्या वाढू शकते. धान्यवाटपही केलं जाऊ शकतं. या काळात याहून मोठं देवा-धर्माचं काम काही नाही. डॉक्टर्स-पोलिसांचं काम न वाढवणं हीसुद्धा या काळात समाजसेवाच आहे. कित्येक पोलीस, डॉक्टरांनी कोरोनाकाळात जीव गमावलाय.ऑनलाइन शिक्षण सुरू होण्याच्या काळात आमच्या संस्थेकडे अनेक विनंत्या आल्यात, की आम्हाला सेकंडहॅण्ड तरी लॅपटॉप, मोबाइल पाहिजे. अशा काही गोष्टी गरजू विद्याथ्र्याना दान करता येतील. गणपती तर बुद्धीची देवता आहे.तंत्नज्ञानाचा असा विधायक उपयोग करता येईल.केरळमध्ये टीव्हीवर लोकल चॅनल्सच्या माध्यमातून एकाचवेळी सगळ्या विद्याथ्र्याना ऑनलाइन शिक्षण देण्याची योजना यशस्वीपणो राबवली जातेय. आपण असे टीव्ही वस्त्यांमध्ये दान करून हे आपल्या राज्यातही सुरू करू शकतो.या काळात आत्महत्या खूप वाढल्यात. आम्ही समुपदेशनाचं कामही करतो. एक-दोन केसेसमध्ये आम्ही लोकांचे जीवही वाचवू शकलो. असे काही उपक्र म गणोशोत्सवानिमित्त हाती घेता येतील. रोजगारासंबंधीचे उपक्रम आयोजित केले जाऊ शकतात.अनेक गरजू माणसं, पण ती स्वाभिमानी आहेत, त्यांना सतत मदत घेणं नको वाटतं. ते म्हणतात, आमच्या हाताला काम द्या. काही महिलांना आम्ही मास्क बनवण्याचं काम उभं करून दिलं. हे मंडळेही करू शकतात. विवाहेच्छुक मुला-मुलींचं जेनेटिक काउन्सेलिंग आयोजित करता येऊ शकेल. अर्थात सध्या ऑनलाइन आणि येत्या काळात प्रत्यक्ष करता येईल.गणोशोत्सव मंडळे ज्या स्पर्धा घेतात त्याही ऑनलाइन आयोजित केल्या जाऊ शकतात. गणपतीचे ई-दर्शन हा एक खूप चांगला पर्याय या काळात असू शकतो. तो सगळ्यांकडून अंमलात आणला गेला पाहिजे.

3) पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे यानिमित्तानं जाता येईल, असं तुम्ही म्हणताय, ते अधिक तपशीलवार सांगा.यावर्षी कोरोना आहे, आपत्ती येतात.  कोरोनाकाळात जगणं बदललंय तर त्याचा चांगला फायदा घ्या. घरून काम करणं, आरोग्याची काळजी घेणं, कार पुलिंग यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या एरव्हीही कायम करत राहाता येतील. त्यातून प्रदूषण कमी होईल, क्वॉलिटी ऑफ लाइफ सुधारेल. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग नकोय. फिजिकल डिस्टन्सिंग मात्न पाहिजे. जगणं साधं-सोपं, निसर्गाला हानी न पोहोचवणारं बनवणं हा कोरोनासारख्या संकटांना रोखण्याचा एक उपाय असू शकतो.त्याचा पुढेही अंगीकार करायला पाहिजे. निसर्ग जपायला पाहिजे.

मुलाखत आणि शब्दांकन-शर्मिष्ठा भोसले