शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

फ्रस्ट्रेशन? टोटल गायब!

By admin | Updated: September 18, 2014 19:47 IST

सकाळी कॉलेजला जायला निघायचं तर घरातच उशीर होतो. कारण आपण उशिरा उठलेलो असतो, मग बस चुकते, धावतपळत पोहचावं तर सर लेक्चरला वर्गात घेतच नाहीत, कलकल होते.

सकाळी कॉलेजला जायला निघायचं तर घरातच उशीर होतो. कारण आपण उशिरा उठलेलो असतो, मग बस चुकते, धावतपळत पोहचावं तर सर लेक्चरला वर्गात घेतच नाहीत, कलकल होते. कॉलेजच्या ऑफिसात कामासाठी जावं तर तिथला माणूस जागेवर सापडत नाही, मित्र अचानक अभ्यास करायला येणार नाही असं कळवतो. पाऊस रीपरीप करतो. आपण छत्रीच आणलेली नसते. आणि असं बरच काही हे  एका पाठोपाठ एक त्याच एका दिवशी घडतं जातं. एकही गोष्ट धड होत नाही, सुरळीत होत नाही..
एखादा दिवस असा उजाडतो की, एकही अगदी एकही काम आपल्या मनासारखं होत नाही आणि मग त्या चिडचिडलेल्या, उद्विग्न  अवस्थेत आपण म्हणतो, हे सगळंच फ्रस्ट्रेटिंग आहे. टोटल फ्रस्ट्रेटिंग आहे. 
फ्रस्ट्रेशन जगात असताच कामा नये असं कितीही वाटलं तरी तसं जग अस्तित्वात नाही हेच खरं! कधी माणसं, कधी परिस्थिती तर कधी आपण स्वत:च स्वत:ला नाउमेद करत राहतो. त्यामुळे अशा अवस्थेत जगायचं तर  सर्व फ्रस्ट्रेशन्ससह जगायची तयारी करायला हवी.
ती कशी करणार? त्यासाठी आपण आपला दृष्टिकोन नीट तयार करायला हवा.
तो कसा करायचा?
आपल्या आयुष्यात रोज सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच घडायला हव्या आहेत हा हट्ट अनेक अडथळे निर्माण करतो. खरंतर ही अपेक्षा अवाजवी आहे, आपल्या मनासारखं व्हावं असं वाटण्यात काही गैर आहे असं अजिबात नाही. पण त्या अपेक्षेत असणारा आग्रहीपणा, हट्टीपणा मात्र त्रासदायक आहे. म्हणजेच आपल्या विचारांमधले  हट्टी, दुराग्रही सलणारे विचारच फ्रस्ट्रेशनच टोक गाठतात. त्या विचारांनी आपल्याला अजिबात मदत होत नाही. 
मदत कशानं होते?
तर जगाकडून आपणच योग्य अपेक्षा ठेवायला शिकलं पाहिजे. प्रत्येकवेळी गोष्टी माझ्या मनासारख्या घडणार नाहीत याचं भान स्वत:त जागं करणं महत्त्वाचं, ते भान कायम ठेवण्याचं स्कील शिकता आलं पाहिजे.
ते कसं जमेल?
फ्रस्ट्रेशन कशामुळे येतं आणि त्यातल्या आपल्या नियंत्रणात असणार्‍या गोष्टी कोणत्या आणि आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी कोणत्या याचं वर्गिकरणं करणं शिकायला पाहिजे. फ्रस्ट्रेशन ते वर्गिकरण करायला खरंतर शिकवते.  ते शिकलं आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला तर अनेक गोष्टीतलं फ्रस्ट्रेशन टाळता येऊ शकतं. आपल्या नियंत्रणात असणार्‍या गोष्टींचा वापर करून समस्येतून मार्ग काढू शकतो. 
काहीच करता येत नाही, परिस्थिती आवाक्यात नाही असं वाटून घेण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, आपण किमान तेवढं तरी करूच शकतो ही भावना जास्त दिलासा आणि उमेद देणारी असते.
मागचंच एक उदाहरण घ्या. सीए करणार्‍या सनयचं.  सनयने सीए करत असतानाच र्जमन भाषेचाही क्लास लावला होता. सीएचा हा पण अँटेम्प्ट हुकला, पण नेहमीसारखी चिडचिड करत फ्रस्ट्रेट न होता त्यानं काही गोष्टी करायचं ठरवलं. त्याच्या कण्ट्रोलमधे काय काय आहे याची यादीच केली.
१) पुन्हा एकदा अभ्यास करून पुढचा अँटेम्प्ट देणं.  
२) एवढा अभ्यास करून आपण कुठे कमी पडतोय याची एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसोबत चर्चा करणं. 
३) र्जमन भाषेची पुढची  लेव्हल जॉईन करणं.
४) उमेद न सोडणं 
५) स्वत:च्या मानसिक स्वास्थ्याची, भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणं. त्यासाठी रोज व्यायाम करणं, समुपदेशनाला जाणं. 
६) स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास ठेवणं. 
सगळं संपलं असा हिरमोड झालेल्या सनयनला हे एवढं आपण करूच शकतो असं लक्षात आल्यानं एकदम हुरूप आला. पॉझिटिव्हली तो पुन्हा अभ्यासाला लागला.
म्हणजेच समोर आलेल्या नाऊमेद करणार्‍या परिस्थितीला आपण योग्य दृष्टिकोन ठेवून सामोरे गेलो तर त्याचा निश्‍चितच खूप उपयोग होऊ शकतो. मुख्यत: यामध्ये आपण आपला पेशन्सही वाढतो.  
मात्र हे असं पॉझिटिव्हली न घेता आपण मी फार फ्रस्ट्रेट झालोय म्हणून खचून गेलो तर मात्र  कोणत्याही गोष्टीत या फ्रस्ट्रेशनचाच अडथळा निर्माण व्हायला लागतो. आपल्या विकासाच्या वाटेवर त्यामुळे गाडं अडतं आणि आपणच आपल्या वाटेत अडथळे तयार करतो. 
त्यामुळे फ्रस्ट्रेट झालो म्हणून रडत बसू नका. आपल्या कण्ट्रोलमधे काय आहे याचा विचार करा आणि जे करणं शक्य आहे ते तातडीनं कराच!
- संज्योत देशपांडे