शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

फ्रस्ट्रेशन? टोटल गायब!

By admin | Updated: September 18, 2014 19:47 IST

सकाळी कॉलेजला जायला निघायचं तर घरातच उशीर होतो. कारण आपण उशिरा उठलेलो असतो, मग बस चुकते, धावतपळत पोहचावं तर सर लेक्चरला वर्गात घेतच नाहीत, कलकल होते.

सकाळी कॉलेजला जायला निघायचं तर घरातच उशीर होतो. कारण आपण उशिरा उठलेलो असतो, मग बस चुकते, धावतपळत पोहचावं तर सर लेक्चरला वर्गात घेतच नाहीत, कलकल होते. कॉलेजच्या ऑफिसात कामासाठी जावं तर तिथला माणूस जागेवर सापडत नाही, मित्र अचानक अभ्यास करायला येणार नाही असं कळवतो. पाऊस रीपरीप करतो. आपण छत्रीच आणलेली नसते. आणि असं बरच काही हे  एका पाठोपाठ एक त्याच एका दिवशी घडतं जातं. एकही गोष्ट धड होत नाही, सुरळीत होत नाही..
एखादा दिवस असा उजाडतो की, एकही अगदी एकही काम आपल्या मनासारखं होत नाही आणि मग त्या चिडचिडलेल्या, उद्विग्न  अवस्थेत आपण म्हणतो, हे सगळंच फ्रस्ट्रेटिंग आहे. टोटल फ्रस्ट्रेटिंग आहे. 
फ्रस्ट्रेशन जगात असताच कामा नये असं कितीही वाटलं तरी तसं जग अस्तित्वात नाही हेच खरं! कधी माणसं, कधी परिस्थिती तर कधी आपण स्वत:च स्वत:ला नाउमेद करत राहतो. त्यामुळे अशा अवस्थेत जगायचं तर  सर्व फ्रस्ट्रेशन्ससह जगायची तयारी करायला हवी.
ती कशी करणार? त्यासाठी आपण आपला दृष्टिकोन नीट तयार करायला हवा.
तो कसा करायचा?
आपल्या आयुष्यात रोज सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच घडायला हव्या आहेत हा हट्ट अनेक अडथळे निर्माण करतो. खरंतर ही अपेक्षा अवाजवी आहे, आपल्या मनासारखं व्हावं असं वाटण्यात काही गैर आहे असं अजिबात नाही. पण त्या अपेक्षेत असणारा आग्रहीपणा, हट्टीपणा मात्र त्रासदायक आहे. म्हणजेच आपल्या विचारांमधले  हट्टी, दुराग्रही सलणारे विचारच फ्रस्ट्रेशनच टोक गाठतात. त्या विचारांनी आपल्याला अजिबात मदत होत नाही. 
मदत कशानं होते?
तर जगाकडून आपणच योग्य अपेक्षा ठेवायला शिकलं पाहिजे. प्रत्येकवेळी गोष्टी माझ्या मनासारख्या घडणार नाहीत याचं भान स्वत:त जागं करणं महत्त्वाचं, ते भान कायम ठेवण्याचं स्कील शिकता आलं पाहिजे.
ते कसं जमेल?
फ्रस्ट्रेशन कशामुळे येतं आणि त्यातल्या आपल्या नियंत्रणात असणार्‍या गोष्टी कोणत्या आणि आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी कोणत्या याचं वर्गिकरणं करणं शिकायला पाहिजे. फ्रस्ट्रेशन ते वर्गिकरण करायला खरंतर शिकवते.  ते शिकलं आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला तर अनेक गोष्टीतलं फ्रस्ट्रेशन टाळता येऊ शकतं. आपल्या नियंत्रणात असणार्‍या गोष्टींचा वापर करून समस्येतून मार्ग काढू शकतो. 
काहीच करता येत नाही, परिस्थिती आवाक्यात नाही असं वाटून घेण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, आपण किमान तेवढं तरी करूच शकतो ही भावना जास्त दिलासा आणि उमेद देणारी असते.
मागचंच एक उदाहरण घ्या. सीए करणार्‍या सनयचं.  सनयने सीए करत असतानाच र्जमन भाषेचाही क्लास लावला होता. सीएचा हा पण अँटेम्प्ट हुकला, पण नेहमीसारखी चिडचिड करत फ्रस्ट्रेट न होता त्यानं काही गोष्टी करायचं ठरवलं. त्याच्या कण्ट्रोलमधे काय काय आहे याची यादीच केली.
१) पुन्हा एकदा अभ्यास करून पुढचा अँटेम्प्ट देणं.  
२) एवढा अभ्यास करून आपण कुठे कमी पडतोय याची एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसोबत चर्चा करणं. 
३) र्जमन भाषेची पुढची  लेव्हल जॉईन करणं.
४) उमेद न सोडणं 
५) स्वत:च्या मानसिक स्वास्थ्याची, भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणं. त्यासाठी रोज व्यायाम करणं, समुपदेशनाला जाणं. 
६) स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास ठेवणं. 
सगळं संपलं असा हिरमोड झालेल्या सनयनला हे एवढं आपण करूच शकतो असं लक्षात आल्यानं एकदम हुरूप आला. पॉझिटिव्हली तो पुन्हा अभ्यासाला लागला.
म्हणजेच समोर आलेल्या नाऊमेद करणार्‍या परिस्थितीला आपण योग्य दृष्टिकोन ठेवून सामोरे गेलो तर त्याचा निश्‍चितच खूप उपयोग होऊ शकतो. मुख्यत: यामध्ये आपण आपला पेशन्सही वाढतो.  
मात्र हे असं पॉझिटिव्हली न घेता आपण मी फार फ्रस्ट्रेट झालोय म्हणून खचून गेलो तर मात्र  कोणत्याही गोष्टीत या फ्रस्ट्रेशनचाच अडथळा निर्माण व्हायला लागतो. आपल्या विकासाच्या वाटेवर त्यामुळे गाडं अडतं आणि आपणच आपल्या वाटेत अडथळे तयार करतो. 
त्यामुळे फ्रस्ट्रेट झालो म्हणून रडत बसू नका. आपल्या कण्ट्रोलमधे काय आहे याचा विचार करा आणि जे करणं शक्य आहे ते तातडीनं कराच!
- संज्योत देशपांडे