शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उगीच पावसाला नाट नका लावू!

By admin | Updated: July 18, 2016 17:02 IST

मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहता ती एकंदरीत सध्या बरी आहे. बहुतांश ठिकाणी रान आबादानी झालंय.

- रमेश भोसलेमराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहता ती एकंदरीत सध्या बरी आहे. बहुतांश ठिकाणी रान आबादानी झालंय. दुष्काळाचं सावट काहीअंशी का होईना पण कमी होताना दिसत आहे. बळीराजानेही आपले शेत पुजून पेरणी करून टाकली, त्यामुळे पेरणी झालेल्या शेतात आणि भेगाळलेल्या भुईत चिटुकले अंकुर डोकावतायत. या अंकुरांमुळे दुष्काळाची जखम आताशी कुठे खपली धरू पाहत आहे. ती पूर्णपणे बरी होण्यास अजून बराच वेळ लागणार हे निश्चित. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आठ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेची कामे केलेली आहेत, तसेच काही सेवाभावी संस्थानी पुढाकार घेत आपल्या उपक्रमातून पाणी अडवण्याचे चांगले काम केल्यामुळे चोहीकडे पाण्याची स्थिती बरी आहे. तरीदेखील लातूर जिल्ह्यातील १४२, उस्मानाबाद ११०, बीड १४४, जालना १ अशा एकूण ३९७ प्रकल्पांतील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही. गेल्या वर्षातील जुलै महिन्याच्या तुलनेत यावेळी जुलैपर्यंत स्थिती नक्कीच चांगली आहे. सध्या पाणी तरी वरवर दिसतेय, नद्या, ओढे, नाले, धबधबे वाहतानाचे विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे; पण याच दृश्यांना भुरळून तरुणाई आणि काही पाऊसवेडी मंडळी या पावसाचा आनंद लुटण्यासाठी अन् मनसोक्त चिंब भिजण्यासाठी डोंगरकड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्याकंडे सैराटपणे निघाले आहेत. आपल्याच तालात नाचायचे, पाण्यात बागडायचे धबधब्यासमोर उभे राहून मित्रांसोबत सेल्फी काढायचा, मस्त मौजमजा करायची, चिंब भिजलेले असताना गरम चहाचा झुरका घेत ‘काय मस्त चहा आहे’ असे म्हणत आणि छोट्याशा एखाद्या विनोदावर एक मेकांच्या हातावर टाळी देत हास्यांचे गुलकंद चोहीबाजूने उधळताना अनेक दृश्य तुम्हा आम्हाच्या नजरेस पडतील. बेधुंद, बेमालुम सभोवतालच्या जगाशी त्यांना काही देणेघेणे नाही.खरंच सर्व काही अलबेल झालंय? एकाच पावसाने सर्व परिस्थिती बदलली आहे का? जनावरांच्या चाऱ्याचा अन् माणसाच्या अन्नाचा प्रश्न या एका पावसाने कायमचा सुटणार आहे का? मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला फोटो एवढेच विश्व आहे का? की त्यापलीकडेही आणखी जग शिल्लक आहे. हे प्रश्न आहेत रात्रंदिवस शेतात मेहनत घेणारऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील जनाबाईसारख्या अनेक पावसाळे खाल्लेल्या महिला शेतकऱ्यांचे. तिला माहितीए की, अजून बळीराजाच्या पदरात धान्याची रास पडण्यास बराच अवकाश आहे. आताशी बीज अंकुराला आलाय ते मोठे होईल, कणाकणाने वाढेल, कणसात दाणा भरेल, कपाशीला बोंडे लागतील, मोत्यांच्या राशी भरतील, तेव्हा कुठे त्याच्या खळ्यावर अन् माळ्यावर धान्याचे पोते दिसेल. सर्व काही एका क्षणात आणि एका झटक्यात होण्यासारखे यात काहीच नाही. तंत्रज्ञान जरी हायटेक झालेले असले तरी निसर्ग मात्र अजून तसाच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपले फोटो टाकताना जरासा विचार करायला हवा. चार वर्षांच्या दुष्काळझळा सोसलेल्या आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर तरी असं हावरट प्रदर्शन जरा वाईट दिसतंय. दुष्काळाच्या जखम अजून खूप ओल्या आहेत..