शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 07:55 IST

कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ‘क्लिष्ट प्रश्न सोडवणं!’ या पुढच्या काळात सोपे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतर्‍च सोडवेल! माणसाच्या नशिबी येतील ते गुंतागुंतीचे प्रश्नच!

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते, डॉ. यश वेलणकर

‘क्लिष्ट प्रश्न’ नेमकं म्हणायचं तरी कशाला? आपल्या दैनंदिन कामामध्ये सरळसोटपणे साध्य होईल,  ‘पाटय़ा टाकून’ प्रश्न सुटतील असं मानणं म्हणजे आपलं काम एकदम सोपं असेल असं गृहीत धरणं झालं. या उलट आपल्या कामामध्ये बहुपदरी प्रश्न असतील, अनेक अंगांनी त्यांचा विचार करावा लागेल, कुठल्याही निर्णयाचे परिणाम एकमेकांवर होऊ शकतील आणि त्यातून भलतंच काहीतरी घडू शकेल अशी ही कल्पना आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात यासाठी ‘रिग्रेशन टेस्टिंग’ नावाची एक उत्तम कल्पना असते. तिचा सोपा अर्थ असा- कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी दोष शिल्लक राहिलेले असल्याचं लक्षात आल्यावर ते दोष काढून टाकण्यासाठी त्यात बदल केल्यावर आता सॉफ्टवेअर ठीकठाक सुरू आहे ना हे कसं तपासायचं? अर्थातच आधी आढळलेले दोष आता नाहीत ना हे बघायचं; पण तिथेच थांबायचं नाही. आधीचे दोष काढून टाकताना चुकून भलतेच नवे दोष तर आपल्या बदलांमुळे निर्माण झाले नाहीत ना, हेही बघायचं. म्हणजेच नजरेला जे प्रश्न दिसत होते ते तर सोडवायचेच; पण जे दिसत नाहीत तेही पडताळून बघायचे.अनेक अंगांनी विचार करून क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं शोधायची सवय अंगात बाणवायची कशी? यासाठी व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये आणि खासकरून उत्तम संस्थांमध्ये अनेक ‘केस स्टडीज’ घेतल्या जातात. त्यात एखाद्या कूटप्रश्नाकडे अनेक अंगांनी बघण्याची सवय विद्याथ्र्याना लावली जाते. जे अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकत नसतील अशांनी पुस्तकं, मासिकं, इंटरनेट अशा माध्यमांमधून अशा ‘केस स्टडीज’चा जरूर अभ्यास करावा. आपल्या जवळपासचे लोक निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतात. त्यांच्या कामादरम्यान त्यांना अशा कोणत्या क्लिष्ट प्रश्नांचा सामना करावा लागला आणि त्यातून शेवटी कसा मार्ग निघाला हे बरेचदा ऐकण्यासारखं असतं. त्यातून आपल्याला या मुद्दय़ासंबंधीची अगदी अनुभवलेली माहिती मिळू शकते. अगदी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, स्वयंपाकी, घरकाम करणारे इथपासून ते मोठमोठय़ा कंपन्यांमधले अधिकारी या सगळ्यांना निरनिराळ्या प्रकारच्या क्लिष्ट प्रश्नांचा सामना करावा लागलेला असतो. त्या सगळ्यांचे अनुभव महत्त्वाचे असू शकतात. कठीण प्रसंगी मनाचा संयम ढळू न देणं, अनेक मुद्दय़ांचा विचार करून योग्य निर्णयार्पयत पोहोचण्याचा प्रय} करणं, अवघड निर्णय घेणं, काहीवेळा आपले निर्णय चुकतील हे गृहीत धरून थोडा धोका पत्करणं हे गुण ज्याच्याकडे असतील तो उद्याच्या जगातला यशस्वी माणूस ठरणार आहे. उद्याच्या जगात कदाचित सोपे सोपे निर्णय आपल्याला घ्यावेच लागणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि त्याच्याशी संबंधित असलेली इतर तंत्रज्ञानं असे निर्णय घेऊन टाकतील. विलक्षण वेगानं असे निर्णय ते आपल्यासमोर ठेवतीलही. त्या निर्णयांचं सुयोग्य मिश्रण करणं आणि त्यातून अंतिम निर्णय घेणं ही कदाचित माणसाची जबाबदारी असू शकेल. उद्याचे प्रश्न वेगळे असतील; त्यांची उत्तरंही वेगळ्या पद्धतीनं शोधावी लागतील. 

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?

1. एखाद्या समस्येच्या कल्पनेनंच बरीच माणसं गोंधळतात, अनेकदा नक्की काय करायचं हेच समजत नाही. अशावेळी मन अस्वस्थ होत असेल तर आपलं लक्ष शरीरावर नेऊन त्या अस्वस्थतेमुळे शरीरात काही बदल होत आहेत का हे जाणावे. त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि समस्येतील विविध घटकांचे विश्लेषण शक्य होते.2. त्यातील कोणते घटक आपण बदलू शकतो याचं भान आले की, उत्तर शोधणं सोपं जातं. आपण बदल करू शकत नाही अशा घटकांचा विचार करीत न राहता आपल्या प्रभाव क्षेत्नावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं की, मनाची कुंठित अवस्था दूर होते. कोणत्या दिशेने प्रयत्न करायचं हे लक्षात येतं. त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली की आपलं प्रभाव क्षेत्न वाढू लागतं.3. हे कौशल्य वापरताना चार पायर्‍या असतात. प्रथम आपल्याला नक्की काय साधायचं आहे, आपलं ध्येय काय आहे हे ठरवावं लागतं. त्यानंतर क्रि टिकल थिंकिंग करून हे ध्येय साध्य करण्याचे कोणकोणते पर्याय, विविध मार्ग असू शकतात याचा विचार आवश्यक असतो.4. प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे लक्षात घेऊन त्यातील एक पर्याय निवडावा लागतो. हा झाला प्लॅन ए, तो निरूपयोगी ठरला, तर दुसरा पर्याय कधी वापरायचा म्हणजे प्लॅन बी याचेही नियोजन करावे लागते. ही झाली तिसरी पायरी !5. या सर्वाची प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे चौथी पायरी. असे केल्याने गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे सोपे होते. मात्न अशा समस्या समजून घेऊन ध्येय निश्चित करणे ही पहिली पायरी खूप महत्त्वाची असते.6. क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या समस्यांपासून पळून न जाता त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य माइण्डफुलनेसच्या नियमित सरावाने वाढते.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन