शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 07:55 IST

कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ‘क्लिष्ट प्रश्न सोडवणं!’ या पुढच्या काळात सोपे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतर्‍च सोडवेल! माणसाच्या नशिबी येतील ते गुंतागुंतीचे प्रश्नच!

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते, डॉ. यश वेलणकर

‘क्लिष्ट प्रश्न’ नेमकं म्हणायचं तरी कशाला? आपल्या दैनंदिन कामामध्ये सरळसोटपणे साध्य होईल,  ‘पाटय़ा टाकून’ प्रश्न सुटतील असं मानणं म्हणजे आपलं काम एकदम सोपं असेल असं गृहीत धरणं झालं. या उलट आपल्या कामामध्ये बहुपदरी प्रश्न असतील, अनेक अंगांनी त्यांचा विचार करावा लागेल, कुठल्याही निर्णयाचे परिणाम एकमेकांवर होऊ शकतील आणि त्यातून भलतंच काहीतरी घडू शकेल अशी ही कल्पना आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात यासाठी ‘रिग्रेशन टेस्टिंग’ नावाची एक उत्तम कल्पना असते. तिचा सोपा अर्थ असा- कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी दोष शिल्लक राहिलेले असल्याचं लक्षात आल्यावर ते दोष काढून टाकण्यासाठी त्यात बदल केल्यावर आता सॉफ्टवेअर ठीकठाक सुरू आहे ना हे कसं तपासायचं? अर्थातच आधी आढळलेले दोष आता नाहीत ना हे बघायचं; पण तिथेच थांबायचं नाही. आधीचे दोष काढून टाकताना चुकून भलतेच नवे दोष तर आपल्या बदलांमुळे निर्माण झाले नाहीत ना, हेही बघायचं. म्हणजेच नजरेला जे प्रश्न दिसत होते ते तर सोडवायचेच; पण जे दिसत नाहीत तेही पडताळून बघायचे.अनेक अंगांनी विचार करून क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं शोधायची सवय अंगात बाणवायची कशी? यासाठी व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये आणि खासकरून उत्तम संस्थांमध्ये अनेक ‘केस स्टडीज’ घेतल्या जातात. त्यात एखाद्या कूटप्रश्नाकडे अनेक अंगांनी बघण्याची सवय विद्याथ्र्याना लावली जाते. जे अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकत नसतील अशांनी पुस्तकं, मासिकं, इंटरनेट अशा माध्यमांमधून अशा ‘केस स्टडीज’चा जरूर अभ्यास करावा. आपल्या जवळपासचे लोक निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतात. त्यांच्या कामादरम्यान त्यांना अशा कोणत्या क्लिष्ट प्रश्नांचा सामना करावा लागला आणि त्यातून शेवटी कसा मार्ग निघाला हे बरेचदा ऐकण्यासारखं असतं. त्यातून आपल्याला या मुद्दय़ासंबंधीची अगदी अनुभवलेली माहिती मिळू शकते. अगदी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, स्वयंपाकी, घरकाम करणारे इथपासून ते मोठमोठय़ा कंपन्यांमधले अधिकारी या सगळ्यांना निरनिराळ्या प्रकारच्या क्लिष्ट प्रश्नांचा सामना करावा लागलेला असतो. त्या सगळ्यांचे अनुभव महत्त्वाचे असू शकतात. कठीण प्रसंगी मनाचा संयम ढळू न देणं, अनेक मुद्दय़ांचा विचार करून योग्य निर्णयार्पयत पोहोचण्याचा प्रय} करणं, अवघड निर्णय घेणं, काहीवेळा आपले निर्णय चुकतील हे गृहीत धरून थोडा धोका पत्करणं हे गुण ज्याच्याकडे असतील तो उद्याच्या जगातला यशस्वी माणूस ठरणार आहे. उद्याच्या जगात कदाचित सोपे सोपे निर्णय आपल्याला घ्यावेच लागणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि त्याच्याशी संबंधित असलेली इतर तंत्रज्ञानं असे निर्णय घेऊन टाकतील. विलक्षण वेगानं असे निर्णय ते आपल्यासमोर ठेवतीलही. त्या निर्णयांचं सुयोग्य मिश्रण करणं आणि त्यातून अंतिम निर्णय घेणं ही कदाचित माणसाची जबाबदारी असू शकेल. उद्याचे प्रश्न वेगळे असतील; त्यांची उत्तरंही वेगळ्या पद्धतीनं शोधावी लागतील. 

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?

1. एखाद्या समस्येच्या कल्पनेनंच बरीच माणसं गोंधळतात, अनेकदा नक्की काय करायचं हेच समजत नाही. अशावेळी मन अस्वस्थ होत असेल तर आपलं लक्ष शरीरावर नेऊन त्या अस्वस्थतेमुळे शरीरात काही बदल होत आहेत का हे जाणावे. त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि समस्येतील विविध घटकांचे विश्लेषण शक्य होते.2. त्यातील कोणते घटक आपण बदलू शकतो याचं भान आले की, उत्तर शोधणं सोपं जातं. आपण बदल करू शकत नाही अशा घटकांचा विचार करीत न राहता आपल्या प्रभाव क्षेत्नावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं की, मनाची कुंठित अवस्था दूर होते. कोणत्या दिशेने प्रयत्न करायचं हे लक्षात येतं. त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली की आपलं प्रभाव क्षेत्न वाढू लागतं.3. हे कौशल्य वापरताना चार पायर्‍या असतात. प्रथम आपल्याला नक्की काय साधायचं आहे, आपलं ध्येय काय आहे हे ठरवावं लागतं. त्यानंतर क्रि टिकल थिंकिंग करून हे ध्येय साध्य करण्याचे कोणकोणते पर्याय, विविध मार्ग असू शकतात याचा विचार आवश्यक असतो.4. प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे लक्षात घेऊन त्यातील एक पर्याय निवडावा लागतो. हा झाला प्लॅन ए, तो निरूपयोगी ठरला, तर दुसरा पर्याय कधी वापरायचा म्हणजे प्लॅन बी याचेही नियोजन करावे लागते. ही झाली तिसरी पायरी !5. या सर्वाची प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे चौथी पायरी. असे केल्याने गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे सोपे होते. मात्न अशा समस्या समजून घेऊन ध्येय निश्चित करणे ही पहिली पायरी खूप महत्त्वाची असते.6. क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या समस्यांपासून पळून न जाता त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य माइण्डफुलनेसच्या नियमित सरावाने वाढते.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन