शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

निर्माण

By admin | Updated: July 28, 2016 17:46 IST

मनातल्या अस्वस्थ प्रश्नांना कृतिशील उत्तरं देणारी एक प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेत सहभागी होण्याची एक नवी संधी

- आॅक्सिजन टीमशिक्षण-नोकरी-करिअर, पैसा, नाकासमोरचं जगणं आणि स्वत:पुरतं पाहणं याहूनही वेगळं आणि जास्त आनंददायी असं जीवनात काही असतं का? केवळ पैसे कमावण्यापलीकडे अधिक अर्थपूर्ण जगणं आपल्याला शक्य आहे का?आपल्या कौशल्यांचा, क्षमतांचा उपयोग आपण समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी करू शकतो का? हे आणि असे बरेच प्रश्न पडतात तुम्हाला? वाटतं कधी की, आपण सेटल होणार म्हणजे नक्की काय होणार? नेमकं काय हवं आपल्याला आपल्या आयुष्याकडून? किंवा कधी वाटतं का, की नुस्त्या व्यवस्थेला शिव्या घालत बसण्यापेक्षा आणि आपल्याच घरात टीव्हीसमोर बसून चिंता करणं आणि सोशल मीडियावर तावातावानं मत मांडणं यापलीकडे आपण काही करू शकतो का? समाजाचे नंतर, आधी आपल्या आनंदाचे, आपल्या जगण्याचे नक्की प्रयोजन काय असे प्रश्न छळतात तुम्हाला?ज्यांना असे प्रश्न पडतात, छळतात त्यांनी नुस्ता शाब्दिक खल न करत बसता या प्रश्नांचा कृतिशील शोध घ्यावा यासाठी डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुरू केलेली एक शिक्षणप्रक्रि या म्हणजे निर्माण.‘निर्माण’ म्हणजे शिकण्या-समजण्यापासून आपणच आपला शोध घेण्याची एक प्रक्रिया आहे. आणि गेली काही वर्षे तरुण मुलंमुली या प्रक्रियेत सहभागी होत नव्या अनुभवांचा भाग होत आहेत. सामाजिक काम करताना स्वत:ची ध्येयंही गवसत आहेत.‘निर्माण’ प्रक्रि येचा एक भाग म्हणून तीन शिबिरांची एक मालिका विकसित करण्यात आली आहे. ‘सर्च’, गडचिरोली येथे होणाऱ्या या शिबिरांदरम्यान स्वत:ची ओळख, आजूबाजूच्या समाजाची, निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्न आणि सोडविण्याच्या विविध पद्धती, प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांसोबत संवाद अशा विविध टप्प्यांमधून शिबिरार्थी प्रवास करतात. स्वत:बद्दल आणि समाजाबद्दल अधिक समृद्ध समज असणारे अनेकजण आपल्या आयुष्यात शिक्षण संपल्यावर पुढे काय या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण उत्तर स्वत:चं स्वत: शोधतात. २००६-१६ या काळात निर्माण प्रक्रियेतल्या सहा बॅचेसमध्ये महाराष्ट्रभरातील ८०० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले. यापैकी सुमारे १२० जण हे आज सामाजिक समस्यांवर तोडगे शोधणारं काम मनापासून पूर्णवेळ करत आहेत.समाजातील विविध समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारू इच्छिणाऱ्या युवांना संघटित करणं व त्यांना आवश्यक मार्गदर्शन, कौशल्य व पोषक वातावरण उपलब्ध करून देणं हे निर्माणचं ध्येय आहे. विचार, भावना व कृती या तीनही अंगांनी स्वत:ची रु ंदी व खोली वाढविण्याचा प्रयत्न याद्वारे तरुण मुलामुलींना करता येतो. आपणही या वाटेनं जावं, स्वत:ला शोधावं, जगण्याला गांभीर्यानं शोधत मग पुढचा आयुष्याचा निर्णय घ्यावा त्यांच्यासाठी निर्माण आता यावर्षीही एक संधी घेऊन येत आहे. निर्माणप्रक्रियेत सहभागी होण्याची ही संधी आहे.इच्छा असेल, तर निर्माणच्या या निवडप्रक्रियेत जाऊन स्वत:ला नक्की जोखून पाहता येईल!संपर्क कुठे करायचा?* निर्माणची सातवी बॅच येत्या जानेवारीपासून येथे सुरू होत आहे. * यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक निवडप्रक्रिया आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज http://nirman.mkcl.org या संकेत स्थळावरून डाउनलोड करता येईल. * प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ आॅगस्ट, २००६ आहे. * माहितीसाठी https://www.facebook.com/nirmanforyouth/ हे फेसबुक पेज पाहा किंवा या ईमेलवरही संपर्क साधता येईल.nirmaanites@gmail.com वयोमर्यादा :१८ ते २८ या वयोगटातील तरुण-तरुणींना यात सहभागी होता येईल.अधिक माहितीसाठी९८९०३३३३६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.