शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शिक्षक झालोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:50 IST

डीएड व्हायच्या स्वप्नानं गुंगारा दिला; पण मी मागे हटलो नाही. संगमनेर, औरंगाबाद, पुणे प्रवास करत शिकत राहिलो आणि..

- रवींंद्र सदाशिव लंगोटेकोपरगाव. अहमदनगर जिल्ह्यातील साखरसम्राटांचं गाव. तर मी तिथला. कोपरगावातील एसएसजीएम या महाविद्यालयात अकरावीला विज्ञान शाखेत मी प्रवेश घेतला; पण गणित आणि इंग्रजीच्या भीतीने एका महिन्यातच शाखा बदलून कला शाखा निवडली. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहू लागलो. कला शाखा म्हटली की त्यावेळी फक्त डीएड करायचं एवढंच डोक्यात यायचं. त्यावेळी डीएडची अवस्था चांगली होती. मागासवर्गीय कोट्यातून डीएडला प्रवेश मिळेल असं निश्चित वाटत असतानाच त्यावर्षी केवळ एका गुणाने मला प्रवेश मिळाला नाही. शिक्षक होण्याचं स्वप्न धुळीस मिळतं की काय असं वाटायला लागलं. बीएला प्रवेश घेतला. पण वर्गात लक्ष लागेना. बरोबरचे मित्र डीएड करत होते. अस्वस्थ वाटत होतं. कॉलेज सोडून काम करायचा विचार करायचा ठरवलं.त्यावेळी संगणक शिक्षणाचे विशेष आकर्षण. नवीनच एमएससीआयटी हा शासनाचा कोर्स सुरू झाला होता. त्या कोर्सला प्रवेश घेतला. मग एका सायबर कॅफेत कामाला लागलो. संगणकाचं बरंचसं ज्ञान मिळालं. सायबर कॅफेत काम करत असताना नोकरीची आशा कुठे दिसत नसल्याने स्वत:चा सायबर कॅफे सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. कोपरगाव जवळ संगमनेर तालुक्यात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर सायबर कॅफे सुरू केला. घरच्यांचा पाठिंबा होता. सायबर कॅफेचा व्यवसाय तेजीत सुरू होता. रात्री ९-१० वाजेपर्यंत इंजिनिअर विद्यार्थी इंटरनेट वापरत असल्याने इकडे-तिकडे फिरायला वेळच मिळत नसे. माझ्या सायबर कॅफेत वेगवेगळ्या राज्यांची, गावांची मुले-मुली येत असत. बºयाच विद्यार्थ्यांशी माझी मैत्रीही झाली होती. गावापासून दुसºया तालुक्यात व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे अडचणी खूप येत होत्या. त्यात गावाकडील मित्र व नातेवाईक यांची ओढ नेहमी लागून राहायची. अशा परिस्थितीत व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं अवघड होत होते. अडीच वर्षांनी सायबर कॅफे बंद करून मी गावी आलो. पुढं काय, हा प्रश्न होताच. पुन्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला गेलो. मोठं शहर. वडिलांची मावशी रांजणगाव एमआयडीसीमध्ये राहात असल्याने मला त्या ठिकाणी निवारा मिळाला व कामही. मी एका वायर इन्सुलेशन कंपनीत काम करू लागलो. काम तसे हेल्पर म्हणूनच होते. तिथे काम करता करता इतर मित्रांच्या ओळखीने एका नामांकित कंपनीत तात्पुरत्या स्वरूपात कामाला लागलो. कामाचे तास फार. दमून जायचो.याच काळात मी पुन्हा कॉम्प्युटर शिकायचं ठरवलं. कोर्स करायचं ठरवलं. मग पुण्याला जायचं. पुण्यात राहण्याचा प्रश्न येईल यासाठी दौंड शहरात माझे चुलते राहतात, तिथं राहायचं ठरवलं. रेल्वे पकडायची व पुण्याला यायचे हा नित्यनेम सुरू झाला. पुण्यात मी जे शिक्षण घेत होतो ते शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअर घेत असत. सर्व शिक्षण इंग्रजीत होते. त्यात मी कला शाखेचा विद्यार्थी म्हणजे इंग्रजी तोडकीमोडकी. पण मला प्रात्यिक्षक ज्ञान असल्याने माझा तिथे निभाव लागला. पुण्यात मी रमू लागलो होतो. तिकडे महाविद्यालयातील सोबतचे मित्र शिक्षक झालेले होते. मी अजूनही बेकारच होतो. पण कॉम्प्युटर उत्तम येत होतं.आता पुढे काय? हा प्रश्न तसाच मागेमागे येत होता. त्यात कोपरगावला एका आदिवासी आश्रमशाळेत अनुसूचित जमातीचे शिक्षक पाहिजेत अशी जाहिरात निघाली. तिथं मला नोकरी मिळाली. पुढे माझे बीए मी पूर्ण केले. त्याचबरोबर डीएडची पदवीही घेतली. आणि आता एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, टाकळी, ता. कोपरगाव जि. अहमदनगर इथं शिक्षक म्हणून काम करतो आहे.(कोपरगाव, जि. अहमदनगर)

 

टॅग्स :Teacherशिक्षकAhmednagarअहमदनगर