शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षक झालोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:50 IST

डीएड व्हायच्या स्वप्नानं गुंगारा दिला; पण मी मागे हटलो नाही. संगमनेर, औरंगाबाद, पुणे प्रवास करत शिकत राहिलो आणि..

- रवींंद्र सदाशिव लंगोटेकोपरगाव. अहमदनगर जिल्ह्यातील साखरसम्राटांचं गाव. तर मी तिथला. कोपरगावातील एसएसजीएम या महाविद्यालयात अकरावीला विज्ञान शाखेत मी प्रवेश घेतला; पण गणित आणि इंग्रजीच्या भीतीने एका महिन्यातच शाखा बदलून कला शाखा निवडली. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहू लागलो. कला शाखा म्हटली की त्यावेळी फक्त डीएड करायचं एवढंच डोक्यात यायचं. त्यावेळी डीएडची अवस्था चांगली होती. मागासवर्गीय कोट्यातून डीएडला प्रवेश मिळेल असं निश्चित वाटत असतानाच त्यावर्षी केवळ एका गुणाने मला प्रवेश मिळाला नाही. शिक्षक होण्याचं स्वप्न धुळीस मिळतं की काय असं वाटायला लागलं. बीएला प्रवेश घेतला. पण वर्गात लक्ष लागेना. बरोबरचे मित्र डीएड करत होते. अस्वस्थ वाटत होतं. कॉलेज सोडून काम करायचा विचार करायचा ठरवलं.त्यावेळी संगणक शिक्षणाचे विशेष आकर्षण. नवीनच एमएससीआयटी हा शासनाचा कोर्स सुरू झाला होता. त्या कोर्सला प्रवेश घेतला. मग एका सायबर कॅफेत कामाला लागलो. संगणकाचं बरंचसं ज्ञान मिळालं. सायबर कॅफेत काम करत असताना नोकरीची आशा कुठे दिसत नसल्याने स्वत:चा सायबर कॅफे सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. कोपरगाव जवळ संगमनेर तालुक्यात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर सायबर कॅफे सुरू केला. घरच्यांचा पाठिंबा होता. सायबर कॅफेचा व्यवसाय तेजीत सुरू होता. रात्री ९-१० वाजेपर्यंत इंजिनिअर विद्यार्थी इंटरनेट वापरत असल्याने इकडे-तिकडे फिरायला वेळच मिळत नसे. माझ्या सायबर कॅफेत वेगवेगळ्या राज्यांची, गावांची मुले-मुली येत असत. बºयाच विद्यार्थ्यांशी माझी मैत्रीही झाली होती. गावापासून दुसºया तालुक्यात व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे अडचणी खूप येत होत्या. त्यात गावाकडील मित्र व नातेवाईक यांची ओढ नेहमी लागून राहायची. अशा परिस्थितीत व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं अवघड होत होते. अडीच वर्षांनी सायबर कॅफे बंद करून मी गावी आलो. पुढं काय, हा प्रश्न होताच. पुन्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला गेलो. मोठं शहर. वडिलांची मावशी रांजणगाव एमआयडीसीमध्ये राहात असल्याने मला त्या ठिकाणी निवारा मिळाला व कामही. मी एका वायर इन्सुलेशन कंपनीत काम करू लागलो. काम तसे हेल्पर म्हणूनच होते. तिथे काम करता करता इतर मित्रांच्या ओळखीने एका नामांकित कंपनीत तात्पुरत्या स्वरूपात कामाला लागलो. कामाचे तास फार. दमून जायचो.याच काळात मी पुन्हा कॉम्प्युटर शिकायचं ठरवलं. कोर्स करायचं ठरवलं. मग पुण्याला जायचं. पुण्यात राहण्याचा प्रश्न येईल यासाठी दौंड शहरात माझे चुलते राहतात, तिथं राहायचं ठरवलं. रेल्वे पकडायची व पुण्याला यायचे हा नित्यनेम सुरू झाला. पुण्यात मी जे शिक्षण घेत होतो ते शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअर घेत असत. सर्व शिक्षण इंग्रजीत होते. त्यात मी कला शाखेचा विद्यार्थी म्हणजे इंग्रजी तोडकीमोडकी. पण मला प्रात्यिक्षक ज्ञान असल्याने माझा तिथे निभाव लागला. पुण्यात मी रमू लागलो होतो. तिकडे महाविद्यालयातील सोबतचे मित्र शिक्षक झालेले होते. मी अजूनही बेकारच होतो. पण कॉम्प्युटर उत्तम येत होतं.आता पुढे काय? हा प्रश्न तसाच मागेमागे येत होता. त्यात कोपरगावला एका आदिवासी आश्रमशाळेत अनुसूचित जमातीचे शिक्षक पाहिजेत अशी जाहिरात निघाली. तिथं मला नोकरी मिळाली. पुढे माझे बीए मी पूर्ण केले. त्याचबरोबर डीएडची पदवीही घेतली. आणि आता एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, टाकळी, ता. कोपरगाव जि. अहमदनगर इथं शिक्षक म्हणून काम करतो आहे.(कोपरगाव, जि. अहमदनगर)

 

टॅग्स :Teacherशिक्षकAhmednagarअहमदनगर