शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

बाप्पा लवकर बुद्धी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:30 AM

जी मंडळं लोकांच्या मदतीला धावतात, त्यांचं कौतुक; पण जे केवळ गर्दी खेचतात त्यांचं काय?

ठळक मुद्देकेवळ डीजे. आरडाओरडा, नृत्य, दंगा या मंडळांना आपण तरी का वर्गणी द्यावी?

 अक्षय सिनकर

नवसाला पावतो, हाकेला धावतो असा हा अमुक-अमुक राजा. अशी चर्चा आता सर्वत्र दिसते. लोकही रांगा लावून दर्शनाला तासन्तास उभे राहतात. मंडळाची स्पर्धा ठीक आहे हो, पण त्या स्पर्धेत बाप्पाला का घेता, असा प्रश्न मनात येतोच.लोकमान्य टिळकांनी सर्वाना एकत्रित आणण्यासाठी, सार्वजनिक सलोखा आणि बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. लोक एकत्र येतील, उत्सवाचा आनंद घेतील व आपल्या समोरील समस्यांवर तोडगा निघेल असंही असेल त्यांच्या मनात; पण आता तसं काही उरलंय का?मंडळाकडूनच ‘आमचा गणपती नवसाला पावतो हं..’ अशी वाक्यं हमखास कानी पडू लागतात. एखाद्या गणपतीला चोवीस-चोवीस तास रांग लावून नंतर त्याच साधं दर्शनसुद्धा होऊ नये असं का होत असेल?अमुकच एक गणपती नवसाला पावतो मग आपला घरचा गणपती आपणच का आणतो? आपण मागितलेलं घरातला गणपती देणार नाही का? मुळात ज्याची मनोभावे पूजा करायची त्याच्याकडेच आपण का मागत राहातो काही ना काही सतत?देव श्रद्धेचा, भक्तीचा  भुकेला आहे. त्याला आपण पैसे आणि सोनं अर्पण करून काय मिळवतो?अकरा दिवसात मोठं मोठय़ा मंडळांकडे खूप रक्कम जमा होते. सामाजिक भान ठेवून काही मंडळं त्या  जमलेल्या रकमेतून सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की रक्तदान शिबिर असो, विद्याथ्र्यासाठी करिअर मार्गदर्शन असो, विविध प्रकारचे व्याख्यान असो अशी असंख्य कामे मंडळांकडून केली जातात. म्हणजे न सांगतादेखील गणपती आपल्यामागे उभा राहतोच की. आता बघाच की, पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीत जी मदत मंडळांनी व काही सामाजिक संस्थांसह गणपती मंडळांनी  केली ते याचेच तर उदाहरण आहेत. जे चांगलं काम करतात, त्यांचा आदर्श घ्यावा. त्या मंडळांचं कौतुक करावं. मात्र केवळ डीजे. आरडाओरडा, नृत्य, दंगा या मंडळांना आपण तरी का वर्गणी द्यावी?आपणच विचार करायला हवा.