शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

झटकेपट वजन कमी करणारं यो यो डाएट करताय? मग सावध व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:11 IST

अनेकांची तक्रार, काहीही करा, वजन कमीच होत नाही. कमी झालं तरी झर्रकन वाढतं, असं का?

ठळक मुद्देत्यामुळे डाएट कधीपर्यंत करू, या प्रश्नाचं उत्तर एकच आयुष्यभर!  आणि व्यायाम कधीर्पयत तर तोही आयुष्यभर !!

- डॉ. यशपाल गोगटे

वजन कमी करणं, ही सध्या बहुसंख्य तरुणांची समस्या असते. गेल्या आठवडय़ात आपण पाहिलंच की, नुस्तं व्यायाम करण्याशी नाही तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींशीही वजनाचा संबंध आहे. नियमित व्यायाम करण्याचे फायदे तर आहेतच. करण्याबद्दलची माहिती आपण मागील काही लेखांमधून जाणून घेतली. तसं अनेकजण उत्साहानं आहाराचे नियम आखतात. व्यायाम जोमानं करतात. वजन कमीही होतं. पण वजन कमी झाल्यावर पुढे काय? ते कमी झालेलं वजन टिकवून कसं ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो सगळेच विचारतात की, वजन नेमकं किती कमी करावं?   अनेकजण वजन कमी करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनात 10-15-25 किलो असे काहीसे भन्नाट आकडे असतात. इतकं वजन सहजासहजी कमी होत नसतं. त्यामुळे वजन कमी करायला सुरुवात केल्यावर अपेक्षित यश मिळत नाही. आपण इतकं काही करतोय, इतके दिवस करतोय तरी म्हणावं तसं वजन कमी होत नाही असं म्हणत काहीजण निराशेपोटी व्यायाम करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं सोडून देतात. आणि म्हणतात काहीही करा, वजन कमीच होत नाही. याचं मुख्य कारण हेच की, आपण किती वजन कमी करायचो, याचा वस्तुनिष्ठ विचारच करत नाही. मग नक्की वजन कमी किती करावं? तर त्याचा एक नियम आहे. तुमच्या वजनाच्या पाचटक्के एवढे वजन कमी केलं तरी वजन कमी करण्याचे, चयापचयाचे आजार नियंत्रित राहण्याचे फायदे आपल्याला मिळतात. म्हणजेच 60 किलो वजन असणार्‍या तरुणीनं तीन किलो वजन कमी केलं तरी तिला त्या वजन कमी करण्याचा फायदा होतो. तेवढं होतंय का कमी, याचा सुरुवातीला विचार करा.वजन कमी केल्यावर ते टिकवून ठेवणंदेखील तेवढंच महत्त्वाचं असतं. झटकन वजन कमी करणं मग ते परत वाढवणं आणि नंतर परत कमी करणं या प्रकाराला ‘यो-यो’ असं म्हटलं ेजातं. ते शरीराला जास्त नुकसान करतं. त्यामुळे थोडंसंच जरी वजन कमी केलं तरीपण ते जास्त काळ तसंच टिकवून ठेवणं महत्त्वाचं. तर ते अधिक फायद्याचं ठरतं.

वजन उतरायला लागल्यावर काही काळानं कितीही प्रयत्न केला तरी वजन उतरत नाही. त्याला वजनाचा ‘प्लॅटो फेज’ असं म्हणतात. प्लॅटो फेजवर मात मिळवण्याकरता खाण्याकडे लक्ष देणं व योग्य व्यायाम करत राहणं हे गरजेचं असतं. आपण हे नियमित केलं तर प्लॅटो फेज आपोआप तुटते. वजन पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होते. व्यायाम कमी करण्यासाठी जसं आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचे असतं. तसंच कमी झालेलं वजन टिकवून ठेवण्याकरता व्यायाम करणं गरजेचं आहे.वजनाबद्दलची एक कायमची असलेली तक्र ार म्हणजे, माझं वजन कमी होतं; पण ते परत जैसे थे वाढून जातं. या वजनवाढीला ‘रिबॉउण्ड वेट गेन’ असं म्हणतात. याची अनेक कारणं  आहेत. मुख्य म्हणजे मेंदूत हायपोथॅलॅमसमधील वजनाचा एक सेट पॉइंट. पूर्वी जेव्हा दुष्काळ येत असे तेव्हा हा सेट पॉइंट वजनाला खूप कमी होऊ देत नसे. पण आता अनेकांची बरीच चांगली स्थिती असतानाच्या आजकालच्या काळात तो वजन कमी करण्यास बाधक ठरतो. वजन कमी व्हायला लागलं की शरीरात काही हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे वजन पुन्हा वाढायला लागतं. यामुळेच वजन कमी करणं ही तात्पुरती योजना नसून यावर कायमस्वरूपी उपाय करावा लागतो. बरेचवेळा लग्नासाठी किंवा पार्टीसाठी किंवा इतर काही खास फंक्शनसाठी म्हणून वजन कमी केलं जातं. ते कार्य पूर्ण झालं की मग वाट्टेल ते खाणं, हादडणं, व्यायाम न करणं सुरू होऊन जातं. अशावेळेसही वजन परत वाढायला लागतंच.