शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

भालाफेक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणारी अन्नू राणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:07 IST

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीर्पयत धडक मारणारी पहिली भारतीय. पदक हुकलं तरी तिची ही झेप मोठी आहे..

ठळक मुद्देभालाफेकसारख्या खेळात भारतीय खेळाडू दिसत नसताना अन्नूचं हे यश म्हणून कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

-नितांत महाजन

अन्नू राणी.हे नावही गेल्या आठवडय़ात बातम्यांमध्ये झळकलं. मात्र बातमीत गायब व्हावं असं या मुलीचं कर्तृत्व नाही.अन्नू राणीनं नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत आठवं स्थान मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. तिचं पदक हुकलं मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीर्पयत पोहचलेली ती पहिलीच भालाफेकपटू.आपण सगळेच शाळा-कॉलेजात भालाफेक आणि थाळीफेक-गोळाफेक शिकतो. मात्र या मुलीच्या नशिबात एकेकाळी तेही नव्हतं. मेरठ जवळच्या बहादूरपूर नावच्या छोटय़ाशा गावात शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. गाव आणि कुटुंब दोन्ही कट्टर. मुलींनी चूल सांभाळावी हाच शिरस्ता. मात्र अन्नूचा भाऊ वेगळा होता. ती त्याच्यासोबत क्रिकेट खेळायची. क्रिकेट खेळताना तिच्या भावालाच वाटलं की, हीची अप्पर बॉडी स्ट्रॉँग आहे. हातात प्रचंड ताकद आहे. तिनं अ‍ॅथलेटिक्समध्ये काहीतरी करावं.म्हणून त्यानं तिला सुचवलं की तू भालाफेकचा सराव कर आणि या खेळात काहीतरी भारी कर!पण भाला होता कुठं?उसाची शेती, मोकळी वावरं. मग हातात ऊस घेऊन तो फेकायचा सराव तिनं सुरू केला. बरेच दिवस तसा सराव केल्यावर बांबू तासून एक टोकदार भाला तिनं स्वतर्‍च बनवला. मग त्या बांबूच्या भाल्यावर सराव केला.भावानं मग पैसे जमवले आणि मेरठला तिचं औपचारिक ट्रेनिंग सुरू झालं. आपल्या बहिणीनं या खेळातच प्रगती करावी म्हणून तिच्या भावानं राबराब राबून पैसे कमावले आणि तिच्या प्रशिक्षणाची सोय केली.सुरुवातीला तिच्या वडिलांचा यासार्‍याला विरोध होता. मुलींनी घराबाहेर पडून असं खेळणंच त्यांना मान्य नव्हतं. मात्र अन्नूची आणि तिच्या भावाची जिद्द पाहून तेही तयार झाले. आणि पुढे अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनने अंजूला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. अन्नू सांगते, ‘खेळ ही आपल्याकडे कुणाला महत्त्वाची गोष्ट वाटतच नाही. त्यात मुलींनी खेळणं म्हणजे काहीतरी भलतंच. योग्य वयात, लहानपणीच खरं तर उत्तम ट्रेनिंग मिळालं तर आपण खेळात खूप प्रगती करू शकू. मात्र मला जे मिळालं त्यातही मी खूश आहे, अजून प्रय} करत राहणारच आहे.’अन्नू भालाफेकीत नॅशनल चॅम्पिअन आहेच मात्र जागतिक स्पर्धेच्या भालाफेक अंतिम फेरीत  पहिली भारतीय  म्हणून पोहचण्याचा मानाचा शिरपेचही आता तिच्याकडे आहे.या स्पर्धेत ती आठव्या स्थानी राहिली, पदक हुकलं मात्र तिची कामगिरी अशी होती की, त्यामुळं ही मुलगी पुढं जाईल असं अनेकांना वाटत होतं.पदक हुकलं मात्र अन्नू म्हणते तसं, ‘संघर्ष माणसाला खूप काही शिकवतो. पुढे जाण्याची प्रेरणा देतो. टिकवून ठेवतो स्पर्धेत, मीही अजून संघर्ष करतच राहीन.’भालाफेकसारख्या खेळात भारतीय खेळाडू दिसत नसताना अन्नूचं हे यश म्हणून कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.