झिम्बाब्वे
By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30
टी-२० क्रिकेट : मालिका बरोबरीत

झिम्बाब्वे
ट -२० क्रिकेट : मालिका बरोबरीतझिम्बाब्वेचा पहिला विजय : भारतावर १० धावांनी मातहरारे : चामू चिभाभाच्या (६७) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर ग्रीम क्रेमरच्या (१८ धावांत ३ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर झिम्बाब्वेने रविवारी भारताचा १० धावांनी पराभव केला आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ७ बाद १४५ धावांची समाधानकारक मजल मारली आणि भारताचा डाव ९ बाद १३५ धावांत रोखला. या पराभवासह भारताची झिम्बाब्वे दौऱ्याची सांगता झाली. या पराभवामुळे भारताचे वन-डे मालिकेप्रमाणे टी-२० मालिकेतही क्लीन स्वीप देण्याचे स्वप्न भंगले.भारताच्या युवा संघाने या दौऱ्यात तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला तर टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा हा भारताविरुद्ध पहिला विजय आहे. यापूर्वी झिम्बाब्वेने भारताविरुद्ध सर्व तीन टी-२० सामने गमाविले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतातर्फे रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ४२ धावा केल्या. १२ धावांच्या अंतरात चार बळी गमावणे भारतासाठी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे (४) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याच्या स्थानी आलेल्या उथप्पाने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा पवित्रा स्वीकारला.