शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

कोरोनानंतर कसे असेल क्रीडाविश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:55 IST

खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर विजय मिळवल्यानंतर प्रेक्षक पुन्हा स्टेडियममध्ये येतील? परदेशात सराव करणे पहिल्यासारखे सोपे असेल? अशा खेळांचे काय होईल, ज्यात सामाजिक अंतर राखता येणार नाही? कोरोनातून सावरल्यानंतर खेळ आणि खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली.सचिन तेंडुलकर (क्रिकेटपटू)नक्कीच संपूर्ण जग आज सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. माझ्या मते चेंडूला थुंकी लावताना खेळाडू काही काळ सतर्क राहतील. ही गोष्ट कायम त्यांच्या लक्षात राहील.अभिनव बिंद्रा (नेमबाज)खेळ लोकांना एकमेकांशी जोडतात. शिवाय जगभरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात खेळांचे योगदान असते. भविष्यात सुरक्षा आणि संरक्षणावर अधिक लक्ष दिले जाईल, मात्र खेळांप्रति असलेले आकर्षण कधीच कमी होणार नाही. कोरोनानंतरची परिस्थिती भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. कदाचित अनेक विदेशी स्पर्धा आणि शिबिरे होणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये भारताला क्रीडा पाया मजबूत करण्याची संधी मिळू शकते.बजरंग पुनिया (मल्ल)कुस्ती शारीरिक संपर्कवाला खेळ आहे. कुस्तीमध्ये तुम्ही कोणत्याही शारीरिक संपर्काला टाळू शकत नाही. मात्र माझ्या मते यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. मला या खेळामध्ये कोणत्याही बदलाची शक्यता दिसत नाही. सामने नक्कीच अधिक अटीतटीचे होतील. सर्व खेळाडू मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करतील.मेरी कोम (बॉक्सर)सर्व प्रकारच्या गोष्टी पहिल्यासारख्या सुरू होण्यासाठी प्रार्थना करत आहे. हा विषाणू सर्वांचा शत्रू असून याला कुणीही समजू शकलेला नाही. खेळांमध्ये बदल होतील. माझा खेळात शारीरिक संपर्क होतो आणि वैयक्तिकरीत्या मी चिंतित आहे की, आम्ही ही अडचण कशी टाळू शकतो. माझ्या मते सरावही वैयक्तिक होऊ शकतो. प्रेक्षकांच्या बाबतीत म्हणायचे, तर ते सामने पाहण्यास येतील. एक नक्की की, स्पर्धेत स्वच्छतेचा स्तर खूप उंचावेल.बायचुंग भुतिया (फुटबॉलपटू)आजच्या युगात टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे भाग आहेत आणि यामुळे स्टेडियममधील प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे क्रीडा व्यवसाय प्रभावित होईल, असे मला वाटत नाही. उलट यामुळे टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक फायदा होईल.