शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

DRS लाभ उठवण्यात विराटसेना ठरतेय फेल

By admin | Updated: February 27, 2017 18:56 IST

पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 -  विराट कोहलीने अल्पावधीतच  आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. पण पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे. ती उणीव म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना डीआरएसचा पुरेपूर फायदा उठवण्यात संघाला येत असलेले अपयश.  
गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपासूम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. भारताने डीआरएसचा स्वीकार केल्यापासून फलंदाजीदरम्यान, 13 वेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली. त्यापैकी केवळ चार वेळा पंचांचा निर्णय बदलण्यात भारताला यश मिळाले.  तर गोलंदाजीदरम्यान भारताने 42 वेळा मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले, पण त्यातील केवळ दहा वेळाच भारताचे अपील यशस्वी ठरले. 
बराच काळ डीआरएसपासून दूर राहिलेल्या भारतीय संघामध्ये या प्रणालीबाबत अननुभवीपणा प्रकर्षाने जाणवतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुणे कसोटीतही भारतीय संघाने क्षेत्ररक्षण करताना चार वेळा डीआरएस वापरला, पण चारही वेळा भारताच्या पदरी निराशा पडली. दुसरीकडे फलंदाजीमध्ये भारताने तीन वेळी डीआरएसच वापर केला, पण त्यातील केवळ एक वेळच भारताला यश मिळाले.