शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

विराट म्हणतो, इंग्लंडसोबत व्हावी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल

By admin | Updated: June 13, 2017 16:44 IST

भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र

 ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅंम्पियन्स  ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत.  त्यातच भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र पाकिस्तान नव्हे तर इंग्लंडबरोबर अंतिम लढत व्हावी, असे वाटते. 
भारतीय दूतावासाकडून लॉर्डसवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला, "उपांत्य फेरीत तुमचा विरोधी संघ कोण आहे याला आम्ही फार महत्त्व देणार नाही. या स्पर्धेची साखळी फेरी आव्हानात्मक होती. आता आम्ही अंतिम फेरीपासून केवळ एक विजय दूर आहोत. तसेच 18 तारखेला भारत आणि इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. आता दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली तर क्रिकेटप्रेमींना ही लढत पाहायला मिळेल." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. तर  दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. 
लॉर्डसवर भारतीय दूतावासाने टीम इंडियासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे उपस्थित होते. " भारताच्या प्रत्येक सामन्याला क्रिकेटप्रेमींची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती पाहिली की बरे वाटते. वातावरण चांगले असेल तर क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडपेक्षा चांगली जागा दुसरी असू शकत नाही. सध्या येथे चेंडू नेहमीप्रमाणे स्विंग होत नाही आहे, पण ढगाळ वातावरण असले की फलंदाजी करणे कठीण होत आहे. इंग्लंडमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो," असेही विराटने यावेळी सांगितले.